शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षांत धारच नाही

By admin | Updated: December 24, 2014 00:44 IST

उपराजधानीत होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाला सपशेल अपयश आले असून, त्यांच्यात धारच नसल्याची टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या

नारायण राणे यांची स्वपक्षावरच टीका : चौकशी टाळण्यासाठी बचावात्मक पवित्रा घेतल्याचा आरोपनागपूर : उपराजधानीत होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाला सपशेल अपयश आले असून, त्यांच्यात धारच नसल्याची टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्वत:वरील चौकशी टाळण्यासाठी बचावात्मक पवित्रा घेतल्याचा टोलादेखील त्यांनी मारला. मंगळवारी नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान राणे यांनी सर्वच पक्षांना ‘टार्गेट’ केले. यावेळी आमदार नीतेश राणेदेखील उपस्थित होते.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उघडपणे वेगळ्या विदर्भाचे समर्थन करीत असताना विरोधक मात्र मूग गिळून शांत बसले आहेत. वस्तुत: विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेणे अपेक्षित असते. परंतु काँग्रेस व राष्ट्रवादीने सत्ताधाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा अंकुश ठेवलेला नाही, या शब्दात राणे यांनी आपले परखड मत व्यक्त केले. या अधिवेशनात सरकारचादेखील कुठलाही प्रभाव नाही. जनतेला सरकारकडून कुठलाही दिलासा मिळालेला नाही. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस अतिशय कळकळीने विदर्भावर बोलायचे. परंतु सत्तेत आल्यानंतर त्यांनी विदर्भासाठी काहीच दिले नाही. बोलणे सोपे असते, परंतु प्रत्यक्ष कृती कठीण असते, असा टोला राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. सरकारने जाहीर केलेले सात हजार कोटींचे पॅकेज फसवे असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेनेने तर सत्तेसाठी लाचारी पत्करली असून, या पक्षाचे अस्तित्व आणि ध्येयधोरणे धुळीला मिळाली आहेत. एकूणच हे सरकार केवळ आश्वासने देणारे ‘ज्योतिषी’ व ‘लेटलतीफ’ सरकार असल्याचेदेखील ते म्हणाले.(प्रतिनिधी)खडसेंनी अर्थसंकल्प पाहिला का?अगोदरच्या आघाडी सरकारने राज्याची तिजोरी रिकामी केल्याचा आरोप खडसे यांनी केला. परंतु त्यांनी अर्थसंकल्प पाहिला आहे का, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र नव्हे तर गुजरात दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे खडसेंच्या दाव्यात काहीच तथ्य नाही, असे ते म्हणाले.मुंबईला राज्यापासून तोडण्याचा डावमुंबईच्या विकासासाठी वेगळी समिती स्थापन करून त्याचे अध्यक्षपद पंतप्रधानांकडे देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गुजरातमधील सूरत, अहमदाबादच्या विकासासाठी पंतप्रधानांची समिती नेमण्यात आली नव्हती. मुंबईचे महत्त्व कमी करून राज्यापासून तोडण्याचा हा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला. विदर्भाचा विकास करीत असताना जर कोकणच्या निधीला कात्री लावण्याचा प्रयत्न केला तर जोरदार आंदोलन करू, असा इशारादेखील त्यांनी दिला.