शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

विरोधी पक्षांत धारच नाही

By admin | Updated: December 24, 2014 00:44 IST

उपराजधानीत होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाला सपशेल अपयश आले असून, त्यांच्यात धारच नसल्याची टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या

नारायण राणे यांची स्वपक्षावरच टीका : चौकशी टाळण्यासाठी बचावात्मक पवित्रा घेतल्याचा आरोपनागपूर : उपराजधानीत होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाला सपशेल अपयश आले असून, त्यांच्यात धारच नसल्याची टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्वत:वरील चौकशी टाळण्यासाठी बचावात्मक पवित्रा घेतल्याचा टोलादेखील त्यांनी मारला. मंगळवारी नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान राणे यांनी सर्वच पक्षांना ‘टार्गेट’ केले. यावेळी आमदार नीतेश राणेदेखील उपस्थित होते.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उघडपणे वेगळ्या विदर्भाचे समर्थन करीत असताना विरोधक मात्र मूग गिळून शांत बसले आहेत. वस्तुत: विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेणे अपेक्षित असते. परंतु काँग्रेस व राष्ट्रवादीने सत्ताधाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा अंकुश ठेवलेला नाही, या शब्दात राणे यांनी आपले परखड मत व्यक्त केले. या अधिवेशनात सरकारचादेखील कुठलाही प्रभाव नाही. जनतेला सरकारकडून कुठलाही दिलासा मिळालेला नाही. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस अतिशय कळकळीने विदर्भावर बोलायचे. परंतु सत्तेत आल्यानंतर त्यांनी विदर्भासाठी काहीच दिले नाही. बोलणे सोपे असते, परंतु प्रत्यक्ष कृती कठीण असते, असा टोला राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. सरकारने जाहीर केलेले सात हजार कोटींचे पॅकेज फसवे असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेनेने तर सत्तेसाठी लाचारी पत्करली असून, या पक्षाचे अस्तित्व आणि ध्येयधोरणे धुळीला मिळाली आहेत. एकूणच हे सरकार केवळ आश्वासने देणारे ‘ज्योतिषी’ व ‘लेटलतीफ’ सरकार असल्याचेदेखील ते म्हणाले.(प्रतिनिधी)खडसेंनी अर्थसंकल्प पाहिला का?अगोदरच्या आघाडी सरकारने राज्याची तिजोरी रिकामी केल्याचा आरोप खडसे यांनी केला. परंतु त्यांनी अर्थसंकल्प पाहिला आहे का, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र नव्हे तर गुजरात दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे खडसेंच्या दाव्यात काहीच तथ्य नाही, असे ते म्हणाले.मुंबईला राज्यापासून तोडण्याचा डावमुंबईच्या विकासासाठी वेगळी समिती स्थापन करून त्याचे अध्यक्षपद पंतप्रधानांकडे देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गुजरातमधील सूरत, अहमदाबादच्या विकासासाठी पंतप्रधानांची समिती नेमण्यात आली नव्हती. मुंबईचे महत्त्व कमी करून राज्यापासून तोडण्याचा हा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला. विदर्भाचा विकास करीत असताना जर कोकणच्या निधीला कात्री लावण्याचा प्रयत्न केला तर जोरदार आंदोलन करू, असा इशारादेखील त्यांनी दिला.