शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

भाजपात दुफळीचे आव्हान

By admin | Updated: October 20, 2014 05:29 IST

भाजपा-शिवसेना या पक्षांमधील अनेकांची माथी सत्तेत बसल्यावर बिघडतात याचे अनेक दाखले १५ वर्षांपूर्वी अनुभवायला मिळाले होते

संदीप प्रधान, मुंबईभाजपा-शिवसेना या पक्षांमधील अनेकांची माथी सत्तेत बसल्यावर बिघडतात याचे अनेक दाखले १५ वर्षांपूर्वी अनुभवायला मिळाले होते. भाजपात या घडीला मुख्यमंत्रिपदाचे चार-पाच दावेदार असल्याने भविष्यात अंतर्गत संघर्ष टाळण्याचे आव्हान या पक्षासमोर असेल. शिवसेनेला सोबत घेतल्यावर मात्र कुणाला तरी वडीलधाऱ्याच्या भूमिकेत राहावे लागेल, तरच सरकार संघर्षाविना कारभार करू शकेल.भाजपाला सत्ता दिसू लागताच गेल्या दोन दिवसांत या पक्षातील मुख्यमंत्रिपदाचे स्पर्धक आक्रमक झाले होते. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रिपद जाणार, असे दिसताच विनोद तावडे यांनी मुख्यमंत्रिपदाकरिता कुणीही फ्रंटनर नाही, असे मत व्यक्त केले. पंकजा मुंडे यांनी आपण मास लीडर असून मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमधील अन्य नेते मेट्रो लीडर असल्याची प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्रिपदाकरिता पक्षाकडे चार-पाच दावेदार आहेत व हे पक्षांतर्गत लोकशाहीचे लक्षण आहे, हे दावे करणे सोपे असले तरी मुख्यमंत्रिपदाच्या नियुक्तीमधील ठिणगी भविष्यात सरकारमध्ये अंतर्गत संघर्षाचा वणवा पेटवणार नाही, याची कुठलीही खात्री देता येणार नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर एकनाथ खडसे व सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते त्यांच्या हाताखाली सरकारमध्ये काम करणार का? अशावेळी त्यांच्यावर कोणती जबाबदारी राहील? तावडे व पंकजा यांच्या महत्त्वाकांक्षांना आवर घालण्याची जबाबदारी मोदी की शहा पार पाडणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाल्याखेरीज भाजपाची आगामी वाटचाल कशी असेल, ते सांगता येणार नाही. भाजपात राष्ट्रवादीशी छुपी हातमिळवणी केलेल्यांचा एक गट असून, राष्ट्रवादीशी संघर्ष करणाऱ्यांचा गट आहे. भाजपा अंतर्गत तसेच शिवसेना-भाजपामधील याच मतभेदांना रुंद करण्याचा प्रयत्न भाजपाच्या सरकारला स्वत:हून पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीकडून केला जाईल. मीडिया देखील या प्रयत्नांना खतपाणी देईल. भाजपाच्या अनेक नेत्यांना वृत्तपत्रांच्या बातम्यांकरिता गॉसिप पुरवण्यामध्ये रस आहे, ही बाब लपून राहिलेली नाही.