शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

भाजपात दुफळीचे आव्हान

By admin | Updated: October 20, 2014 05:29 IST

भाजपा-शिवसेना या पक्षांमधील अनेकांची माथी सत्तेत बसल्यावर बिघडतात याचे अनेक दाखले १५ वर्षांपूर्वी अनुभवायला मिळाले होते

संदीप प्रधान, मुंबईभाजपा-शिवसेना या पक्षांमधील अनेकांची माथी सत्तेत बसल्यावर बिघडतात याचे अनेक दाखले १५ वर्षांपूर्वी अनुभवायला मिळाले होते. भाजपात या घडीला मुख्यमंत्रिपदाचे चार-पाच दावेदार असल्याने भविष्यात अंतर्गत संघर्ष टाळण्याचे आव्हान या पक्षासमोर असेल. शिवसेनेला सोबत घेतल्यावर मात्र कुणाला तरी वडीलधाऱ्याच्या भूमिकेत राहावे लागेल, तरच सरकार संघर्षाविना कारभार करू शकेल.भाजपाला सत्ता दिसू लागताच गेल्या दोन दिवसांत या पक्षातील मुख्यमंत्रिपदाचे स्पर्धक आक्रमक झाले होते. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रिपद जाणार, असे दिसताच विनोद तावडे यांनी मुख्यमंत्रिपदाकरिता कुणीही फ्रंटनर नाही, असे मत व्यक्त केले. पंकजा मुंडे यांनी आपण मास लीडर असून मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमधील अन्य नेते मेट्रो लीडर असल्याची प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्रिपदाकरिता पक्षाकडे चार-पाच दावेदार आहेत व हे पक्षांतर्गत लोकशाहीचे लक्षण आहे, हे दावे करणे सोपे असले तरी मुख्यमंत्रिपदाच्या नियुक्तीमधील ठिणगी भविष्यात सरकारमध्ये अंतर्गत संघर्षाचा वणवा पेटवणार नाही, याची कुठलीही खात्री देता येणार नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर एकनाथ खडसे व सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते त्यांच्या हाताखाली सरकारमध्ये काम करणार का? अशावेळी त्यांच्यावर कोणती जबाबदारी राहील? तावडे व पंकजा यांच्या महत्त्वाकांक्षांना आवर घालण्याची जबाबदारी मोदी की शहा पार पाडणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाल्याखेरीज भाजपाची आगामी वाटचाल कशी असेल, ते सांगता येणार नाही. भाजपात राष्ट्रवादीशी छुपी हातमिळवणी केलेल्यांचा एक गट असून, राष्ट्रवादीशी संघर्ष करणाऱ्यांचा गट आहे. भाजपा अंतर्गत तसेच शिवसेना-भाजपामधील याच मतभेदांना रुंद करण्याचा प्रयत्न भाजपाच्या सरकारला स्वत:हून पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीकडून केला जाईल. मीडिया देखील या प्रयत्नांना खतपाणी देईल. भाजपाच्या अनेक नेत्यांना वृत्तपत्रांच्या बातम्यांकरिता गॉसिप पुरवण्यामध्ये रस आहे, ही बाब लपून राहिलेली नाही.