शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

‘जय विदर्भ’ला विरोध का?

By admin | Updated: November 12, 2014 01:02 IST

विदर्भाचा मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वतंत्र राज्याच्या संकल्पनेला मूर्त रूप येईल, अशी वैदर्भीय जनतेची सार्वत्रिक इच्छा असताना या भागातील आमदारांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय विदर्भ’चा नारा दिला

सेनेविरुद्ध संताप : विदर्भाचा जयजयकार केला तर बिघडले कुठे?

नागपूर: विदर्भाचा मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वतंत्र राज्याच्या संकल्पनेला मूर्त रूप येईल, अशी वैदर्भीय जनतेची सार्वत्रिक इच्छा असताना या भागातील आमदारांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय विदर्भ’चा नारा दिला म्हणून शिवसेनेने आक्षेप घेणे आणि त्यानंतर आमदारांना तंबी देणे याच्या संतप्त प्रतिक्रिया विदर्भात उमटल्या आहेत. शिवसेनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच भाजपने या मुद्यावर त्यांची भूमिका स्पष्ट करून विदर्भाचा आवाज अधिक बुलंद करावा, अशी मागणी होत आहे.भाजपने सुुरुवातीपासूनच स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थन केले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी या मुद्यावर मतेही मागितली. जनतेनेही त्यांना कौल दिला. त्यामुळे भाजपचे केंद्र आणि राज्यात सरकार आल्यावर लोकांच्या स्वतंत्र राज्याविषयी अपेक्षा वाढल्या आहेत. त्याचेच प्रतिबिंब म्हणून नागपूरमधील भाजपचे आमदार अनुक्रमे विकास कुंभारे, कृष्णा खोपडे आणि सुधाकर देशमुख यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय विदर्भ’चा नारा दिला. मात्र यामुळे राजकारण पेटले. शिवसेनेने त्यावर आक्षेप घेतल्याने त्याच्या तीव्र भावना विदर्भात उमटल्या आहेत. शिवसेनेच्या विदर्भ विरोधी भूमिकेचा भाजपचे नागपूरमधील आमदार आणि विदर्भवादी नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. यापूर्वीही नागपूरमध्ये होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात दोन्ही सभागृहात विदर्भातील अनेक आमदारांनी विविध प्रस्तावावरील चर्चे दरम्यान ‘जय विदर्भ’चा नारा दिला. मात्र त्यावेळी त्याला कोणी विरोध केला नाही. ‘जय विदर्भ ’म्हणणे हा गुन्हा आहे काय, असा सवाल करतानाच सेनेचा विरोध अनाकलनीय असल्याची भावना सामान्य जनतेत व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)जय विदर्भ म्हणणे घटनाविरोधी नाहीजय विदर्भचा नारा देणे घटना विरोधी किंवा नियमबाह्य नाही, विदर्भ हा महाराष्ट्राचाच भाग आहे. त्यामुळे शिवसेनेचा आक्षेप अयोग्य ठरतो. शिवसेनेचे सदस्यही ‘जय भवनी जय शिवाजी’ असा नारा देतातच. भवानी हे देवीचे नाव आहे. मग त्यावरही आक्षेप घ्यायचा काय. मी आमदार असताना अनेक वेळा जय विदर्भाचा नारा दिला आहे. वामनराव चटप, ज्येष्ठ विदर्भवादी व माजी आमदारहा तर व्यक्तिस्वातंत्र्यावर घालाघटनेच्या चौकटीत राहून प्रत्येकाला त्याच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आमदार म्हणून विदर्भाचा नारा देणे चुकीचे नाही. तो त्यांचा अधिकार आहे. शिवसेना ही काही राज्याची मालक नाही, कोणी काय बोलावे हे ठरविणारा हा पक्ष कोण ?. जय विदर्भ म्हणण्यावर आक्षेप घेणे म्हणजे आमदारांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालण्यासारखे आहे.राम नेवले, निमंत्रक,विदर्भ राज्य आंदोलन समिती