शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

‘जय विदर्भ’ला विरोध का?

By admin | Updated: November 12, 2014 01:02 IST

विदर्भाचा मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वतंत्र राज्याच्या संकल्पनेला मूर्त रूप येईल, अशी वैदर्भीय जनतेची सार्वत्रिक इच्छा असताना या भागातील आमदारांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय विदर्भ’चा नारा दिला

सेनेविरुद्ध संताप : विदर्भाचा जयजयकार केला तर बिघडले कुठे?

नागपूर: विदर्भाचा मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वतंत्र राज्याच्या संकल्पनेला मूर्त रूप येईल, अशी वैदर्भीय जनतेची सार्वत्रिक इच्छा असताना या भागातील आमदारांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय विदर्भ’चा नारा दिला म्हणून शिवसेनेने आक्षेप घेणे आणि त्यानंतर आमदारांना तंबी देणे याच्या संतप्त प्रतिक्रिया विदर्भात उमटल्या आहेत. शिवसेनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच भाजपने या मुद्यावर त्यांची भूमिका स्पष्ट करून विदर्भाचा आवाज अधिक बुलंद करावा, अशी मागणी होत आहे.भाजपने सुुरुवातीपासूनच स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थन केले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी या मुद्यावर मतेही मागितली. जनतेनेही त्यांना कौल दिला. त्यामुळे भाजपचे केंद्र आणि राज्यात सरकार आल्यावर लोकांच्या स्वतंत्र राज्याविषयी अपेक्षा वाढल्या आहेत. त्याचेच प्रतिबिंब म्हणून नागपूरमधील भाजपचे आमदार अनुक्रमे विकास कुंभारे, कृष्णा खोपडे आणि सुधाकर देशमुख यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय विदर्भ’चा नारा दिला. मात्र यामुळे राजकारण पेटले. शिवसेनेने त्यावर आक्षेप घेतल्याने त्याच्या तीव्र भावना विदर्भात उमटल्या आहेत. शिवसेनेच्या विदर्भ विरोधी भूमिकेचा भाजपचे नागपूरमधील आमदार आणि विदर्भवादी नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. यापूर्वीही नागपूरमध्ये होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात दोन्ही सभागृहात विदर्भातील अनेक आमदारांनी विविध प्रस्तावावरील चर्चे दरम्यान ‘जय विदर्भ’चा नारा दिला. मात्र त्यावेळी त्याला कोणी विरोध केला नाही. ‘जय विदर्भ ’म्हणणे हा गुन्हा आहे काय, असा सवाल करतानाच सेनेचा विरोध अनाकलनीय असल्याची भावना सामान्य जनतेत व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)जय विदर्भ म्हणणे घटनाविरोधी नाहीजय विदर्भचा नारा देणे घटना विरोधी किंवा नियमबाह्य नाही, विदर्भ हा महाराष्ट्राचाच भाग आहे. त्यामुळे शिवसेनेचा आक्षेप अयोग्य ठरतो. शिवसेनेचे सदस्यही ‘जय भवनी जय शिवाजी’ असा नारा देतातच. भवानी हे देवीचे नाव आहे. मग त्यावरही आक्षेप घ्यायचा काय. मी आमदार असताना अनेक वेळा जय विदर्भाचा नारा दिला आहे. वामनराव चटप, ज्येष्ठ विदर्भवादी व माजी आमदारहा तर व्यक्तिस्वातंत्र्यावर घालाघटनेच्या चौकटीत राहून प्रत्येकाला त्याच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आमदार म्हणून विदर्भाचा नारा देणे चुकीचे नाही. तो त्यांचा अधिकार आहे. शिवसेना ही काही राज्याची मालक नाही, कोणी काय बोलावे हे ठरविणारा हा पक्ष कोण ?. जय विदर्भ म्हणण्यावर आक्षेप घेणे म्हणजे आमदारांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालण्यासारखे आहे.राम नेवले, निमंत्रक,विदर्भ राज्य आंदोलन समिती