शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

निलंबितांना पुन्हा सेवेत येण्याची संधी

By admin | Updated: March 14, 2016 02:24 IST

समाजात कायदा व सुव्यवस्थेचे काम करीत असताना जाणीवपूर्वक किंवा नकळतपणे गैरकृत्य, कसुरी केल्याप्रकरणी निलंबित असलेल्या कॉन्स्टेबलपासून पोलीस निरीक्षक दर्जापर्यंतच्या अधिकाऱ्यांना

जमीर काझी, मुंबईसमाजात कायदा व सुव्यवस्थेचे काम करीत असताना जाणीवपूर्वक किंवा नकळतपणे गैरकृत्य, कसुरी केल्याप्रकरणी निलंबित असलेल्या कॉन्स्टेबलपासून पोलीस निरीक्षक दर्जापर्यंतच्या अधिकाऱ्यांना पुन्हा ड्युटीवर हजर होण्याची संधी मिळाली आहे. मात्र, त्यासाठी निलंबन कालावधी व त्यांची चौकशी किमान वर्षभर प्रलंबित असली पाहिजे, तरच त्यांच्या चौकशी, गुन्ह्याच्या शिक्षेला अधीन राहून पुन्हा सेवेत येता येणार आहे.पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी त्याबाबत राज्य पोलीस दलातील सर्व घटकप्रमुखांना मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. निलंबित प्रकरणे चौकशी व खटल्याविना दीर्घकाळ प्रलंबित राहत असल्याने, अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर व्हावा आणि त्यांच्या सेवेचा खात्यालाही लाभ होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता घटकप्रमुखांना आपल्या कार्यक्षेत्रातील दर तीन महिन्यांनी निलंबन प्रकरणाचा आढावा घ्यावा लागणार आहे. त्याचबरोबर, मार्गदर्शक सूचनांमध्ये दिलेल्या निर्देशानुसार संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे.अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता, नैतिक अध:पतन, लाचलुचपत, खून, खुनाचा प्रयत्न व त्यासारख्या गंभीर प्रकरणात, गुन्हा दाखल किंवा गंभीर गैरवर्तनप्रकरणी संबंधितांविरुद्ध संबंधित न्यायालयात आरोपपत्र किंवा अभियोग दाखल झाल्यास.विभागीय चौकशीत दोषारोप पत्र बजाविल्यानंतरच्या त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या न्यायालयीन कार्यवाही व विभागीय चौकशीच्या अधीन राहून निलंबनातून मुक्तता दोषारोप पत्राव्यतिरिक्त फक्त कर्तव्यात केलेल्या कृताकृत कसुरी (कमिशन-ओमिशन)बाबत विभागीय चौकशी चालू करण्यासंदर्भात चालू करावी किंवा नाही, याबाबत गुणवत्तेवर निर्णय.संबंधिताला न्यायालयाने दोषमुक्त केले असल्यास, त्याविरुद्ध जर वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल असून, कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला स्थगनादेश नसलेल्यांना तथापि ज्या प्रकरणात एखाद्यावर एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल असतील व एकातून दोषमुक्त असल्यास आणि अन्य गुन्ह्याप्रकरणी चौकशी सुरू असल्यास निलंबनाचा आढावा घेतला जाईल.एक वर्षाच्या आत विभागीय चौकशी संबंधित कार्यवाही पूर्ण झाली नसल्यास.पोलीस अधिनियमानुसार तरतूदवेगवेगळ्या पोलीस घटकांतील कार्यालयातील सक्षम प्राधिकाऱ्याकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयात भिन्नता असते. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ व त्या अंतर्गत तयार करण्यात आलेले नियम म्हणजे महाराष्ट्र पोलीस (शिक्षा व अपील) नियम १९५६ च्या तरतुदीनुसार पुन्हा सेवेत घेतले जाणार आहे.