शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

निलंबितांना पुन्हा सेवेत येण्याची संधी

By admin | Updated: March 14, 2016 02:24 IST

समाजात कायदा व सुव्यवस्थेचे काम करीत असताना जाणीवपूर्वक किंवा नकळतपणे गैरकृत्य, कसुरी केल्याप्रकरणी निलंबित असलेल्या कॉन्स्टेबलपासून पोलीस निरीक्षक दर्जापर्यंतच्या अधिकाऱ्यांना

जमीर काझी, मुंबईसमाजात कायदा व सुव्यवस्थेचे काम करीत असताना जाणीवपूर्वक किंवा नकळतपणे गैरकृत्य, कसुरी केल्याप्रकरणी निलंबित असलेल्या कॉन्स्टेबलपासून पोलीस निरीक्षक दर्जापर्यंतच्या अधिकाऱ्यांना पुन्हा ड्युटीवर हजर होण्याची संधी मिळाली आहे. मात्र, त्यासाठी निलंबन कालावधी व त्यांची चौकशी किमान वर्षभर प्रलंबित असली पाहिजे, तरच त्यांच्या चौकशी, गुन्ह्याच्या शिक्षेला अधीन राहून पुन्हा सेवेत येता येणार आहे.पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी त्याबाबत राज्य पोलीस दलातील सर्व घटकप्रमुखांना मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. निलंबित प्रकरणे चौकशी व खटल्याविना दीर्घकाळ प्रलंबित राहत असल्याने, अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर व्हावा आणि त्यांच्या सेवेचा खात्यालाही लाभ होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता घटकप्रमुखांना आपल्या कार्यक्षेत्रातील दर तीन महिन्यांनी निलंबन प्रकरणाचा आढावा घ्यावा लागणार आहे. त्याचबरोबर, मार्गदर्शक सूचनांमध्ये दिलेल्या निर्देशानुसार संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे.अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता, नैतिक अध:पतन, लाचलुचपत, खून, खुनाचा प्रयत्न व त्यासारख्या गंभीर प्रकरणात, गुन्हा दाखल किंवा गंभीर गैरवर्तनप्रकरणी संबंधितांविरुद्ध संबंधित न्यायालयात आरोपपत्र किंवा अभियोग दाखल झाल्यास.विभागीय चौकशीत दोषारोप पत्र बजाविल्यानंतरच्या त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या न्यायालयीन कार्यवाही व विभागीय चौकशीच्या अधीन राहून निलंबनातून मुक्तता दोषारोप पत्राव्यतिरिक्त फक्त कर्तव्यात केलेल्या कृताकृत कसुरी (कमिशन-ओमिशन)बाबत विभागीय चौकशी चालू करण्यासंदर्भात चालू करावी किंवा नाही, याबाबत गुणवत्तेवर निर्णय.संबंधिताला न्यायालयाने दोषमुक्त केले असल्यास, त्याविरुद्ध जर वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल असून, कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला स्थगनादेश नसलेल्यांना तथापि ज्या प्रकरणात एखाद्यावर एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल असतील व एकातून दोषमुक्त असल्यास आणि अन्य गुन्ह्याप्रकरणी चौकशी सुरू असल्यास निलंबनाचा आढावा घेतला जाईल.एक वर्षाच्या आत विभागीय चौकशी संबंधित कार्यवाही पूर्ण झाली नसल्यास.पोलीस अधिनियमानुसार तरतूदवेगवेगळ्या पोलीस घटकांतील कार्यालयातील सक्षम प्राधिकाऱ्याकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयात भिन्नता असते. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ व त्या अंतर्गत तयार करण्यात आलेले नियम म्हणजे महाराष्ट्र पोलीस (शिक्षा व अपील) नियम १९५६ च्या तरतुदीनुसार पुन्हा सेवेत घेतले जाणार आहे.