शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

पहिल्या यादीनंतर मिळणार अर्ज पडताळणीची संधी

By admin | Updated: July 1, 2017 03:07 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत गुरुवारी सायंकाळी ५ वाजता संपली. मात्र, तोपर्यंत हजारो विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झालेली नव्हती.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत गुरुवारी सायंकाळी ५ वाजता संपली. मात्र, तोपर्यंत हजारो विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झालेली नव्हती. त्यामुळे आपण प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर पडलो, असे वाटल्याने विद्यार्थी तणावाखाली आले, पण पहिल्या यादीनंतर पुन्हा अर्ज पडताळणीची संधी देण्यात येणार असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. अकरावी प्रवेशात पारदर्शकता यावी, म्हणून आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी पहिला अर्ज भरला, तेव्हा त्यांना कोणत्याही अडचणी आल्या नाहीत, पण अर्ज २ भरायला सुरुवात केल्यावर, अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. आॅनलाइन प्रक्रियेत गोंधळ झाल्याने, दोन दिवस अर्ज भरण्याची मुदत वाढवून दिली होती. त्यानुसार, गुरुवार, दि. २९ जूनला सायंकाळी ५ वाजता अर्ज भरण्याची मुदत संपली. या वेळी पहिला अर्जाची ५ हजार ७२२ विद्यार्थ्यांची पडताळणी पूर्ण झालेली नव्हती, तर अर्ज २ ची १ हजार २६७ विद्यार्थ्यांची पडताळणी पूर्ण झालेली नव्हती. अर्ज पडताळणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांचे अर्ज भरून पूर्ण होत नाहीत. त्यामुळे हे हजारो विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर पडले आहेत, पण हे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर पडले नसल्याचे शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी स्पष्ट केले. पहिल्या यादीत या विद्यार्थ्यांची नावे लागणार नाहीत, पण त्यानंतर, विद्यार्थ्यांना पुन्हा अर्जात बदल करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्या वेळी हे विद्यार्थी अर्ज पडताळणी पूर्ण करू शकतील, असे चव्हाण यांनी सांगितले.