शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

पहिल्या यादीनंतर मिळणार अर्ज पडताळणीची संधी

By admin | Updated: July 1, 2017 03:07 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत गुरुवारी सायंकाळी ५ वाजता संपली. मात्र, तोपर्यंत हजारो विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झालेली नव्हती.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत गुरुवारी सायंकाळी ५ वाजता संपली. मात्र, तोपर्यंत हजारो विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झालेली नव्हती. त्यामुळे आपण प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर पडलो, असे वाटल्याने विद्यार्थी तणावाखाली आले, पण पहिल्या यादीनंतर पुन्हा अर्ज पडताळणीची संधी देण्यात येणार असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. अकरावी प्रवेशात पारदर्शकता यावी, म्हणून आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी पहिला अर्ज भरला, तेव्हा त्यांना कोणत्याही अडचणी आल्या नाहीत, पण अर्ज २ भरायला सुरुवात केल्यावर, अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. आॅनलाइन प्रक्रियेत गोंधळ झाल्याने, दोन दिवस अर्ज भरण्याची मुदत वाढवून दिली होती. त्यानुसार, गुरुवार, दि. २९ जूनला सायंकाळी ५ वाजता अर्ज भरण्याची मुदत संपली. या वेळी पहिला अर्जाची ५ हजार ७२२ विद्यार्थ्यांची पडताळणी पूर्ण झालेली नव्हती, तर अर्ज २ ची १ हजार २६७ विद्यार्थ्यांची पडताळणी पूर्ण झालेली नव्हती. अर्ज पडताळणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांचे अर्ज भरून पूर्ण होत नाहीत. त्यामुळे हे हजारो विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर पडले आहेत, पण हे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर पडले नसल्याचे शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी स्पष्ट केले. पहिल्या यादीत या विद्यार्थ्यांची नावे लागणार नाहीत, पण त्यानंतर, विद्यार्थ्यांना पुन्हा अर्जात बदल करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्या वेळी हे विद्यार्थी अर्ज पडताळणी पूर्ण करू शकतील, असे चव्हाण यांनी सांगितले.