शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईअंतर्गत शिक्षणाची संधी

By admin | Updated: April 28, 2016 03:11 IST

भरमसाठ शुल्क भरण्याची कुवत नसल्याने कित्येक पालकांना आपल्या पाल्यांना येथे शिकवता येत नाही.

अरुणकुमार मेहत्रे,

कळंबोली- नामांकित शाळांमध्ये आपल्या पाल्यांना शिक्षण घेता यावे, अशी पालकांची इच्छा असते. मात्र भरमसाठ शुल्क भरण्याची कुवत नसल्याने कित्येक पालकांना आपल्या पाल्यांना येथे शिकवता येत नाही. परंतु आरटीई कायद्याअंतर्गत वंचित व दुर्बल घटकांतील १,७७७ पालकांचे आपल्या मुलांना हायफाय शाळेत शिक्षण देण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. आरटीईअंतर्गत आॅनलाइन पद्धतीने २५ टक्के प्रवेश प्रक्रि येसाठी २५ एप्रिल रोजी सोडत काढण्यात आली. त्यामध्ये पहिल्या फेरीत बऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे. पालकांनी त्वरित त्या त्या शाळेत जाऊन प्रवेश घ्यावेत, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहेपनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, खारघर, कामोठे, कळंबोली या भागात मोठ्या प्रमाणात खासगी शैक्षणिक संस्था आहेत. विशेषकरून डीएव्ही, सेंट जोसेफ, न्यू होरायझन यासारख्या विविध नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळविण्याकरिता धनदांडग्यापासून मध्यमवर्गीय पालकांची उडी पडते. कित्येकांना शुल्क भरण्याची तयारी असतानाही प्रवेश मिळत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर नर्सरीला प्रवेश घेतला तरच या शाळेमध्ये पहिलीला प्रवेश मिळतो. त्यामुळे पूर्व प्राथमिककरिता मोठ्या प्रमाणात नामांकित आणि ठरावीक शाळांना मागणी आहे. मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात असल्याने दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश पूर्वी मिळत नव्हता. कारण हे शुल्क त्यांच्या पालकांच्या खिशाला परवडणार नव्हते आणि आजही नाही. मात्र राज्य शासनाने शिक्षणाचा अधिकार हा कायदा संमत केला. त्यानुसार दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांकरिता २५ टक्के जागा ठेवण्याची सक्ती करण्यात आली आहे. प्रवेशप्रक्रि येत विद्यार्थ्यांना घरापासून एक किमी ते तीन किमी अंतरावरच्या शाळेत प्रवेश देण्याचे आदेश राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. त्यानुसार पनवेल परिसरातील शाळांमध्ये लवकरच २५ टक्के प्रवेश प्रक्रि या आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रि येत संबंधित शाळांमधून आॅनलाइन प्रवेश अर्ज भरून घेण्यात आले. याकरिता पालकांच्या मदतीसाठी मदत केंद्रही उभारण्यात आले होते. या व्यतिरिक्त विविध राजकीय पक्ष त्याचबरोबर सामाजिक संस्थांनी याकरिता जनजागृती केली. खांदा वसाहतीत माजी नगरसेवक शिवाजी थोरवे यांनी याकरिता खास मदत केंद्र सुरू केले होते. त्यांनी एकूण १०७ अर्ज भरून घेतले त्यापैकी पहिल्या टप्प्यात ४० विद्यार्थ्यांचे सोडतीत नाव आले आहे. थोरवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पालकांना कागदपत्राच्या जमवाजमवीला मदत केली. त्याचबरोबर तहसीलदार दीपक आकडे, नायब तहसीलदार बी. टी. गोसावी, कल्याणी कदम यांनी सुध्दा पुढाकार घेऊन आरटीई प्रवेशाकरिता जे काही दाखले आवश्यक आहेत ते त्वरित पालकांना उपलब्ध करून दिले.