शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

विरोधकांची डाळ शिजू देणार नाही

By admin | Updated: October 8, 2014 23:02 IST

नारायण राणे : मसुरे येथील प्रचारसभेत मोदींवर टीका

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली २५ वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना जिल्ह्याची मागासलेला ही ओळख पुसून टाकण्याचे काम मी केले. आमदार, मंत्री, पालकमंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता या विविध पदांच्या माध्यमातून जिल्ह्यात आरोग्य, शिक्षणाच्या गरजा पूर्ण केल्या. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कुठेही कमी पडलो नाही. मी असेपर्यंत विरोधकांची डाळ शिजू देणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रचार समिती प्रमुख नारायण राणे यांनी केले. मसुरे येथील प्रचार सभेत ते बोलत होते. राणे म्हणाले, मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत पहिल्यांदाच अर्थसंकल्पात जिल्ह्यासाठी ९८ कोटी रूपये मंजूर करीत ३२ पुलांची कामे केली. पिण्याच्या पाण्यासाठी ११९ कोटी रूपये दिले, त्यामुळे टॅँकरमुक्ती मिळाली. रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य या सर्वच क्षेत्रांसाठी आपण भरघोस निधी दिला. १९९० साली या जिल्ह्याला ६ कोटी रूपये निधी उपलब्ध होत होता. मात्र आज १०५ कोटी रूपये निधी जिल्ह्यात नियोजनासाठी उपलब्ध होत आहेत. जिल्ह्याच्या विकासात मी कुठेही कमी पडलो नाही. आपली डाळ शिजणार नाही. या भितीपोटी मला विरोधक विरोध करीत आहेत. विरोध करण्यापलिकडे त्यांचे एकतरी काम दाखवा. कोकणात माझ्यासमोर सक्षमपणे उभा राहणारा अन्य पक्षातील एकतरी नेता दाखवा. पुणे- मुंबईशी स्पर्धा करणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्गचा विकास मला करावयाचा आहे. जिल्हावासियांमुळेच मला अनेक पदे मिळाली. यापुढील काळात तुमच्या उपकाराचे ऋण म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याला महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या नकाशावर समृद्ध जिल्हा म्हणून घडविण्याचा माझा संकल्प आहे, असे राणे म्हणाले. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा भाजपाचा कट असल्याचेही ते म्हणाले. यावेळी संदेश पारकर, दत्ता सामंत, अशोक सावंत, साईनाथ चव्हाण, बाळू कोळंबकर, संग्राम प्रभूगावकर, कृष्णनाथ तांडेल, सुहास हडकर, छोटू ठाकूर, पपन मेथर, गोपी पालव, सरोज परब, कांचन गावडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) उद्योग परत आणा धास्तावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही, असे वक्तव्य केले आहे. अरे काय बिशाद तुमची? आम्ही जिवंत असेपर्यंत महाराष्ट्रापासून मुंबई तोडू देणार नाही. एवढेच प्रेम असेल तर मुंबईतून पळविलेले उद्योग पूर्ववत महाराष्ट्रात आणा, अशी राणे यांनी टीका केली.