शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

दिल्ली-मुंबई कॉरिडॉरला शेतक-यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:32 IST

राज्यातील समृद्धी महामार्गासोबतच, आता दिल्ली-मुंबई कॉरिडॉर प्रकल्पालाही शेतक-यांनी विरोध केला आहे. प्रशासनाकडून सक्तीने जमीन संपादन सुरू असल्याचा आरोप करत

मुंबई : राज्यातील समृद्धी महामार्गासोबतच, आता दिल्ली-मुंबई कॉरिडॉर प्रकल्पालाही शेतक-यांनी विरोध केला आहे. प्रशासनाकडून सक्तीने जमीन संपादन सुरू असल्याचा आरोप करत, रायगड कॉरिडॉरविरोधी शेतकरी संघर्ष समितीने १ आॅगस्टपासून माणगाव प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे, शिवाय या प्रकल्पाविरोधात १५ दिवसांत उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.महाजन म्हणाल्या की, कागदोपत्री सक्ती केली जात नसल्याचे शासन म्हणत असले, तरी प्रत्यक्षात मात्र प्रशासन आणि गावातले दलाल जबरदस्तीने जमिनी संपादन करण्याचा संदेश देत आहेत. शेतकºयांच्या सह्या ज्या संमतीपत्रकावर घेतल्या जात आहेत, त्यात २०१३ च्या जमीन संपादन कायद्याला बगल देण्यात आली आहे. सरसकट एकरी १८ लाख ४० हजार रुपये भाव ठरवण्यात आला असून, घरे, झाडे, विहीर अशा गोष्टींचे मूल्यांकन केलेले नाही.धक्कादायक बाब म्हणजे, शेतकºयांकडून संमती पत्रकात ‘आम्ही नोकरी वा वाढीव नुकसानभरपाई मागणार नाही,’ असे लिहून घेतले जात आहे. शिवाय या विरोधात न्यायालयात धाव घेण्याचा अधिकारही संमती पत्रकात हिरावून घेण्यात आला आहे. त्यामुळे हे संमती पत्रक म्हणजेच शेतकºयांची शुद्ध फसवणूक आहे. या फसवणुकीच्या आणि शासनाच्या मनमानी व बेकायदेशीर कारभाराविरोधात मंगळवारपासून माणगाव प्रांत कार्यालयासमोर रमेश साळसकर, चिंतामण म्हस्के, संतोष कालवणकर, सुप्रिया झुमरे, शिवाजी नाडकर, क२ाशिनाथ वाढवळ या शेतकरी बांधवांसोबत बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.त्यामुळे सक्तीचे जमीन संपादन थांबवून, ६८ गावांतील शेतकºयांच्या सातबारावरील संपादनाचे शिक्के उठवा, तसेच फसवणुकीचे व्यवहार रद्द करून, या प्रकरणाची विशेष समितीकडून चौकशी करण्याची मागणी समितीने केली आहे.