शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

दिल्ली-मुंबई कॉरिडॉरला शेतक-यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:32 IST

राज्यातील समृद्धी महामार्गासोबतच, आता दिल्ली-मुंबई कॉरिडॉर प्रकल्पालाही शेतक-यांनी विरोध केला आहे. प्रशासनाकडून सक्तीने जमीन संपादन सुरू असल्याचा आरोप करत

मुंबई : राज्यातील समृद्धी महामार्गासोबतच, आता दिल्ली-मुंबई कॉरिडॉर प्रकल्पालाही शेतक-यांनी विरोध केला आहे. प्रशासनाकडून सक्तीने जमीन संपादन सुरू असल्याचा आरोप करत, रायगड कॉरिडॉरविरोधी शेतकरी संघर्ष समितीने १ आॅगस्टपासून माणगाव प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे, शिवाय या प्रकल्पाविरोधात १५ दिवसांत उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.महाजन म्हणाल्या की, कागदोपत्री सक्ती केली जात नसल्याचे शासन म्हणत असले, तरी प्रत्यक्षात मात्र प्रशासन आणि गावातले दलाल जबरदस्तीने जमिनी संपादन करण्याचा संदेश देत आहेत. शेतकºयांच्या सह्या ज्या संमतीपत्रकावर घेतल्या जात आहेत, त्यात २०१३ च्या जमीन संपादन कायद्याला बगल देण्यात आली आहे. सरसकट एकरी १८ लाख ४० हजार रुपये भाव ठरवण्यात आला असून, घरे, झाडे, विहीर अशा गोष्टींचे मूल्यांकन केलेले नाही.धक्कादायक बाब म्हणजे, शेतकºयांकडून संमती पत्रकात ‘आम्ही नोकरी वा वाढीव नुकसानभरपाई मागणार नाही,’ असे लिहून घेतले जात आहे. शिवाय या विरोधात न्यायालयात धाव घेण्याचा अधिकारही संमती पत्रकात हिरावून घेण्यात आला आहे. त्यामुळे हे संमती पत्रक म्हणजेच शेतकºयांची शुद्ध फसवणूक आहे. या फसवणुकीच्या आणि शासनाच्या मनमानी व बेकायदेशीर कारभाराविरोधात मंगळवारपासून माणगाव प्रांत कार्यालयासमोर रमेश साळसकर, चिंतामण म्हस्के, संतोष कालवणकर, सुप्रिया झुमरे, शिवाजी नाडकर, क२ाशिनाथ वाढवळ या शेतकरी बांधवांसोबत बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.त्यामुळे सक्तीचे जमीन संपादन थांबवून, ६८ गावांतील शेतकºयांच्या सातबारावरील संपादनाचे शिक्के उठवा, तसेच फसवणुकीचे व्यवहार रद्द करून, या प्रकरणाची विशेष समितीकडून चौकशी करण्याची मागणी समितीने केली आहे.