शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

विरोधक प्रभावशून्य

By admin | Updated: July 25, 2015 01:36 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशासनावर पकड नाही. तलाठ्यापासून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत भ्रष्टाचार सुरू असून, भ्रष्ट मंत्र्यांची

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशासनावर पकड नाही. तलाठ्यापासून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत भ्रष्टाचार सुरू असून, भ्रष्ट मंत्र्यांची पाठराखण करणाऱ्या फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी माजी मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. अजित पवार व छगन भुजबळ सोडले तर विरोधकांची भाषणे प्रभावशून्य असल्याचा घरचा अहेरही राणे यांनी दिला आहे.राणे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा प्रस्ताव फेटाळला. मात्र यापूर्वीची कर्जमाफी ही भाजपाच्या मागणीनुसार झाली होती. केंद्र सरकार महाराष्ट्राचे महत्त्व कमी करत असताना फडणवीस मूग गिळून बसले आहेत. भ्रष्टाचार बोकाळला असून, आठ महिन्यांत जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे.उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या मुखपत्रातून होणाऱ्या टीकेमुळे केवळ लोकांची करमणूक होत असल्याचा टोला लगावून राणे म्हणाले की, भाजपा उद्धव ठाकरे यांची दिशाभूल करत आहे. भाजपाने ठाकरे यांच्या अनेक मुद्द्यांना बगल देऊनही लाचारीने ते सत्तेत बसले आहेत. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर ते सत्तेत राहिले नसते. रामदास कदम यांनी पर्यावरण या शब्दाचा अचूक अर्थ सांगितला तर मी वाट्टेल ते हरेन, असा चिमटा राणे यांनी त्यांना काढला. (विशेष प्रतिनिधी)