शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

विरोधक पळपुटे, गोंधळालाच प्राधान्य

By admin | Updated: December 24, 2015 02:24 IST

विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विदर्भातील प्रश्नांवर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा होती. परंतु विरोधी पक्षात उदासीनता होती. बेछूट आरोप करत गोंधळ घालण्याचे काम त्यांनी केले.

नागपूर : विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विदर्भातील प्रश्नांवर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा होती. परंतु विरोधी पक्षात उदासीनता होती. बेछूट आरोप करत गोंधळ घालण्याचे काम त्यांनी केले. महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची व उत्तराला थांबायचे नाही, असे पळपुटेपणाचे धोरण त्यांनी स्वीकारले होते, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी अधिवेशन संपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत केली.अधिवेशनाचा पहिला आठवडा विरोधकांनी गोंधळ घालून वाया घालविला. मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे व उत्तराच्या वेळी गोंधळ घालण्याचे काम त्यांनी केले. परंतु सत्तापक्षाने सकारात्मक भूमिका घेतली. अधिवेशनात विदर्भ-मराठवाड्याच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. पाच मंत्र्याविरोधात आरोप करणाऱ्यांनी हवे तर जनहित याचिका दाखल करावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले. गेल्या चार वर्षांत नापिकी असल्याने संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतीक्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने निर्णय देखील घेण्यात आले. विरोधकांकडून कर्जमाफीची मागणी केली जाते. परंतु मागील ७ हजार कोटींच्या कर्जमाफीत विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही. याचा लाभ प्रामुख्याने बँकांना झाला. ही बाब विचारात घेता शेतकऱ्यांसाठी १०५१२ कोटींचा विशेष कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यातून दुष्काळाने बाधित १५७४७ गावांतील शेतकऱ्यांना मदत, ५३ लाख १९ हजार शेतकऱ्यांना निविष्ठा स्वरूपात ७४१२ कोटींची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजवर जे विदर्भाला मिळाले नाही ते मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.पत्रपरिषदेला महसूलमंत्री एकनाथ खडसे, संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट, परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)