शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विरोधक पळपुटे, गोंधळालाच प्राधान्य

By admin | Updated: December 24, 2015 02:24 IST

विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विदर्भातील प्रश्नांवर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा होती. परंतु विरोधी पक्षात उदासीनता होती. बेछूट आरोप करत गोंधळ घालण्याचे काम त्यांनी केले.

नागपूर : विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विदर्भातील प्रश्नांवर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा होती. परंतु विरोधी पक्षात उदासीनता होती. बेछूट आरोप करत गोंधळ घालण्याचे काम त्यांनी केले. महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची व उत्तराला थांबायचे नाही, असे पळपुटेपणाचे धोरण त्यांनी स्वीकारले होते, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी अधिवेशन संपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत केली.अधिवेशनाचा पहिला आठवडा विरोधकांनी गोंधळ घालून वाया घालविला. मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे व उत्तराच्या वेळी गोंधळ घालण्याचे काम त्यांनी केले. परंतु सत्तापक्षाने सकारात्मक भूमिका घेतली. अधिवेशनात विदर्भ-मराठवाड्याच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. पाच मंत्र्याविरोधात आरोप करणाऱ्यांनी हवे तर जनहित याचिका दाखल करावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले. गेल्या चार वर्षांत नापिकी असल्याने संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतीक्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने निर्णय देखील घेण्यात आले. विरोधकांकडून कर्जमाफीची मागणी केली जाते. परंतु मागील ७ हजार कोटींच्या कर्जमाफीत विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही. याचा लाभ प्रामुख्याने बँकांना झाला. ही बाब विचारात घेता शेतकऱ्यांसाठी १०५१२ कोटींचा विशेष कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यातून दुष्काळाने बाधित १५७४७ गावांतील शेतकऱ्यांना मदत, ५३ लाख १९ हजार शेतकऱ्यांना निविष्ठा स्वरूपात ७४१२ कोटींची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजवर जे विदर्भाला मिळाले नाही ते मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.पत्रपरिषदेला महसूलमंत्री एकनाथ खडसे, संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट, परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)