शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
2
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
3
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
4
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
5
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
6
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
7
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
8
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
9
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
10
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
11
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
12
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
13
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
14
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
15
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
16
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
17
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
18
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
19
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
20
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...

खुल्या प्रवर्गातील पूर्वीच्या जागा टिकविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 05:10 IST

मुख्यमंत्र्यांची ग्वाही; देशातील एकूण रोजगाराच्या २५ टक्के रोजगार महाराष्ट्रात

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विविध समाजघटकांना आरक्षण दिल्याने खुल्या प्रवर्गातील जागांवर गदा आली असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, ‘खुल्या प्रवर्गांसाठी २०१८ पूर्वी असलेल्या जागा कोणत्याही परिस्थितीत टिकविल्या जातील’, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.

भाजपचा निवडणूक संकल्पनामा जाहीर करण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये जेवढ्या जागा २०१८ पूर्वी खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध होत्या तेवढ्या नक्कीच कायम राहतील आणि भविष्यात त्यात टप्प्याटप्प्याने वाढ केली जाईल. एखाद्या समाजघटकाला आरक्षण देताना खुल्या प्रवर्गावर आपले सरकार कधीही अन्याय होऊ देणार नाही.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकरी कर्जमाफीवरुन फडणवीस सरकारला लक्ष्य बनविले आहे. त्याचा समाचार घेताना मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही पारदर्शक कर्जमाफी दिली. आघाडी सरकारच्या काळात कर्जमाफीत झालेले घोटाळे कॅगच्या अहवालात आले आहेतच. सरकारमधील लोकांशी संबंधित संस्थांची कर्जे त्या निमित्ताने माफ केली. त्यांच्या काळात विदर्भाला दिलेली कर्जमाफी आम्ही एका जिल्ह्याला दिली. मराठवाड्याबाबतही तसेच घडले. विरोधकांजवळ खरेतर सांगण्यासारखे काहीही नाही. त्यांनी एक बोट आमच्याकडे दाखविले की चार बोटे त्यांच्याकडे असतात.

देशातील एकूण रोजगाराच्या २५ टक्के रोजगार हे गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात निर्माण झाले आहेत.त्यांच्या काळात किती रोजगार निर्माण झाले हे त्यांनी सांगावे.

कलम ३७० मुळे त्यांना चिमटासंपूर्ण देश काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यासाठी एकसंध झाला होता. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्याला विरोध केला. कलम ३७० चा मुद्दा आम्ही काढला की यांचा तो चेहरा उघडा पडतो. पण यांना कितीही चिमटे बसले तरी आम्ही प्रचारात ३७० चा मुद्दा काढणारच, असेही मुख्यमंत्री म्हणाले. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, सरचिटणीस सरोज पांडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.पीएमसी बँकेसाठी पंतप्रधानांना भेटणारनिर्बंध घालण्यात आलेल्या पीएमसी बँकेतील ठेवीदारांना त्यांचा सगळा पैसा परत मिळावा यासाठी आपण पंतप्रधान, केंद्रीय वित्त मंत्र्यांची लवकरच भेट घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या बँकेचेप्रकरण रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारित असले तरी संपत्ती जप्त करण्यापासून अटकेपर्यंतची कारवाई ईडीने केलेली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस