शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

भ्रष्टाचाराचे रॅकेट उघड करा - राज ठाकरे

By admin | Updated: July 28, 2014 14:34 IST

महामार्ग ते गल्लीबोळ्यातील रस्त्यांपर्यंतच्या कामामध्ये भ्रष्टाचार केला जात असून हा सर्व भ्रष्टाचार उघड करा असे आदेश राज ठाकरेंनी मनसे पदाधिका-यांना दिले आहेत.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. २८ - महामार्ग ते गल्लीबोळ्यातील रस्त्यांपर्यंतच्या कामामध्ये भ्रष्टाचार केला जात आहे. नित्कृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे करदात्यांना खड्ड्यातून मार्ग काढावा लागतो. पदपथावरही फेरीवाल्यांना मोकळीक दिली जाते. हा सर्व भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणा असे आदेश मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिका-यांना दिले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विरोधकांवर टीकेची तोफ डागतील अशी चिन्हे आहेत. काम करणा-यांनाच पक्षात पद दिले जाईल असे खडे बोलही त्यांनी पदाधिका-यांना सुनावले आहेत. 
सोमवारी मुंबईत राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिका-यांची बैठक बोलवली होती. यात राज ठाकरेंनी खड्ड्यांवरुन मुंबई महापालिकेवर टीका केली.  'रस्त्याच्या कामासाठी टेंडर काढायचे, सहा महिन्यांत खराब होईल असा रस्ता बांधायचा. त्या रस्त्यावरील खड्ड्यांसाठी संबंधित ठेकेदाराला जाब विचारायचा सोडून खड्डे भरण्यासाठी आणखी एक ठेकेदार नेमायचा' असे उद्योग मुंबई महापालिकेत सुरु असल्याची टीका त्यांनी केली. पादचा-यांसाठी बांधण्यात येणा-या पदपथावरही फेरीवाल्यांना मोकळीक दिली जाते. दादरमध्ये एका फेरीवाल्याने चक्क आयुक्त सीताराम कुंटे यांच्या नावानेच पावती फाडली. यावरुन भ्रष्टाचाराने यंत्रण किती पोखरली आहे हे दिसते. भ्रष्टाचाराचे असे सर्व रॅकेट उघड करा असे राज ठाकरेंनी पदाधिका-यांना सांगितले. 
मनसेच्या रस्ते आस्थापना विभागाच्या कामकाजाविषयीही राज ठाकरेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. रस्ते, पदपथ हे महत्त्वाचे विषय असून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असतो. पण तुम्ही भ्रष्टाचाराऐवजी भलतीकडेच लक्ष देता असे त्यांनी विभागातील पदाधिका-यांना सुनावले. 'तुम्ही चांगल काम कराल मी तुम्हाला पुढे आणीन' अशी ग्वाही देत त्यांनी पदाधिका-यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. 
 
बेळगावप्रश्नी केंद्र सरकार गप्प का? राज ठाकरेंचा सवाल
कर्नाटकमध्ये मराठी भाषिकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीप्रकरणी केंद्र सरकार गप्प का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेदरम्यान राज यांनी मारहाणीच्या घटनेचा निषेध करत भाजप-शिवसेनेला हा प्रश्न विचारला. तसेच सीमाप्रश्नासंबंधी मुख्यमंत्री गंभीर नाहीत असेही ते यावेळी म्हणाले. इतर राज्यातील नागरिक, राजकारणी त्यांच्या भाषेशी, अस्मितेशी १०० टक्के प्रामाणिक असतात, मात्र आपल्याच राज्यात असा प्रकार दिसत नाही असे सांगत इथले राजकारणी 'बिनकण्याचे' असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
येळ्ळूरच्या मराठी भाषिकांनी उभारलेला ‘महाराष्ट्र राज्य - येळ्ळूर’ फलक कर्नाटक पोलिसांनी जमीनदोस्त केला व या कारवाईला विरोध करण्यासाठी गेलेल्यांवर अमानुषपणे लाठीमार केला. तसेच अनेकांच्या घरात घुसून त्यांच्या वस्तूंची तोडफोड करत अनेक वाहनांचेही पोलिसांनी नुकसान केले.