शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

‘आधारवाडी’च्या कचऱ्याचाच बोभाटा

By admin | Updated: August 6, 2016 03:19 IST

डम्पिंगचा प्रश्न हा के वळ कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील नाही.

डोंबिवली : डम्पिंगचा प्रश्न हा के वळ कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील नाही. सगळ्याच उपनगरांत आणि देशभरात तो गाजतो आहे. हा प्रश्न यंत्रणांसाठी डोकेदुखी विषय ठरला आहे. आधारवाडी डम्पिंगच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. जागरूक नागरिकाने जनहित याचिका दाखल केल्याने या डम्पिंगची सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे, असे वक्तव्य कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केले.‘रोटरी क्लब आॅफ डोंबिवली सौदामिनी’तर्फे ब्राह्मणसभेत गुरुवारी सायंकाळी ‘आप की अदालत ’ हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी मंजूषा सेल्यूडकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या फेरीसाठी पालिकेने केंद्र सरकारकडे फेरप्रस्ताव पाठवला आहे. त्याची यादी १५ आॅगस्टला जाहीर होणार आहे. या यादीत कल्याण-डोंबिवलीची घोषणा होणे अपेक्षित आहे. शहरे स्मार्ट करण्यासाठी महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहेत. मात्र, त्यात नागरिकांचा सहभाग हवा आहे. स्मार्ट सिटीसाठी त्यांनीही स्मार्ट होण्याची गरज आहे. त्यांच्या सवयी बदलण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. शहरातील १० माणसांनी चांगले वागायचे ठरवल्यास अकरावी व्यक्ती त्यांच्या चांगल्या कृतीचे नक्कीच अनुकरण करीत स्मार्ट होण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वास देवळेकर यांनी व्यक्त केला. इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्टनंतरच ‘क्लस्टर’ची अंमलबजावणीशहरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी क्लस्टर योजना लागू करण्याचा ठराव महासभेने मंजूर केला आहे. त्यासाठी इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट तयार करण्यासाठी कंत्राटदार नेमला आहे. या अहवालानंतर क्लस्टर योजना अमलात आणली जाणार आहे. त्यातून धोकादायक इमारतींच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे देवळेकर यांनी स्पष्ट केले. २०२० पासून २४ तास पाणी कल्याण-डोंबिवली ही शहरेस्मार्ट करण्याचा केंद्र व राज्य सरकारचा निर्धार आहे. मात्र, सरकारच्या निधीवर महापालिकेची मदार न ठेवता शिवसेनेने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार ही शहरे स्मार्ट करण्याचा आमचा निर्धार आहे. २०२० पासून शहरातील नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा केला जाईल, अशी योजना महापालिकेने हाती घेतली आहे. (प्रतिनिधी)>फेरीवाल्यांचा प्रश्न सवयीशी निगडितशहरातील फेरीवाल्यांचा विषय हा नागरिकांच्या सवयीशी निगडित आहे. जोपर्यंत नागरिक फेरीवाल्यांकडून भाजी घेणे बंद करणार नाहीत, तोपर्यंत फेरीवाले हटणार नाहीत, याकडे देवळेकर यांनी लक्ष वेधले.केंद्र सरकारने फेरीवाल्यांचे धोरण ठरवल्याशिवाय त्यांच्याविरोधात कारवाई करू नका, असे आदेश दिले आहेत. महापालिका धोरण ठरवत आहे. त्यानंतर, त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल. महापालिकेने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले आहे. त्यांच्यासाठी फेरीवाला झोन तयार केले जाणार आहेत. >प्रमुख चौकांत सीसीटीव्हीशहरातील गुन्हे रोखण्यासाठी प्रमुख चौकांत महापालिकेच्या निधीतून सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. मीटर व शेअर रिक्षांचे पर्याय देणारशहरात रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यांना शेअर भाडे परवडते. सकाळ-सायंकाळ शेअर रिक्षा चालते. मात्र, काही प्रवाशांना मीटरची आवश्यकता आहे. मीटर व शेअर हे दोन्ही पर्याय प्रवासासाठी उपलब्ध करून दिले जातील.>विकास आराखड्यासाठी समितीमहापालिकेने तयार केलेल्या विकास आराखडा १९९६ मधील आहे. त्याची मुदत २०१६ अखेरीस संपत आहे. हा आराखडा नव्याने तयार करताना नागरिक समिती स्थापन करून त्यांना विकास आराखडा कसा हवा, यावर विचारविनिमय केला जाईल.