शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

...तरच होईल स्मार्ट शहर !

By admin | Updated: July 2, 2015 00:44 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्मार्ट शहर’ योजनेत महाराष्ट्रातील १० शहरांची निवड केली जाणार असली तरी याकरिता ३७ शहरांमध्ये स्पर्धा आहे. पाणीपुरवठा, वीजपुरवठा, कचरा व्यवस्थापन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्मार्ट शहर’ योजनेत महाराष्ट्रातील १० शहरांची निवड केली जाणार असली तरी याकरिता ३७ शहरांमध्ये स्पर्धा आहे. पाणीपुरवठा, वीजपुरवठा, कचरा व्यवस्थापन या निकषांबरोबरच जे शहर स्मार्ट होण्याकरिता २५० कोटी रुपये उभारू शकेल, त्याचाच या यादीत समावेश केला जाणार आहे.देशातील १०० स्मार्ट शहरांकरिता मोदी सरकारने यंदा ७ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महाराष्ट्रातील एक लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ३७ शहरांना केंद्र सरकारने निश्चित केलेले निकष पूर्ण करून स्मार्ट शहरांच्या स्पर्धेत सहभागी होण्याचा आदेश नगरविकास विभागाने दिला आहे. जुलैअखेरपर्यंत या ३७ शहरांमधून १० शहरांची निवड करून केंद्राला प्रस्ताव सादर करायचा आहे. याकरिता राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. महापालिकांचे आयुक्त व नगरसेवक यांनी आपले शहर स्मार्ट शहरांच्या योजनेत सहभागी होण्याबाबत जनमताचा कानोसा घेऊन निर्णय करायचा आहे.स्मार्ट शहराच्या योजनेत सहभागी होणाऱ्या शहरात पुरेसा पाणीपुरवठा, वीजपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्थापन असणे आवश्यक आहे. साहजिकच मुंबई, ठाणे यासारख्या शहरांतील वाहतूक समस्या व कचरा व्यवस्थापन हे प्रश्न सोडवण्याचे त्यांच्यापुढे आव्हान असेल तर सोलापूर किंवा तत्सम छोट्या शहरांकरिता पाणीपुरवठ्याची समस्या हे सर्वात मोठे आव्हान असू शकते. प्रत्येक शहरांना त्यांच्यापुढील आव्हानांचा विचार करून स्मार्ट शहर होण्याकरिता कुठल्या बाबींची पूर्तता करावी लागेल ते निश्चित करावे लागेल. (विशेष प्रतिनिधी)केंद्र सरकार प्रत्येक शहराला ५०० कोटींचा निधी मंजूर करणार असून तेवढाच म्हणजे ५०० कोटींचा निधी राज्य सरकारला उभा करायचा आहे. ज्या १० शहरांचा या योजनेत समावेश होईल, त्या प्रत्येक शहराला राज्य सरकार आपल्या तिजोरीतून २५० कोटी रुपये देणार असले तरी त्या शहराला २५० कोटी उभे करून आपला हिस्सा द्यावा लागणार आहे.