शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

...तरच होईल स्मार्ट शहर !

By admin | Updated: July 2, 2015 00:44 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्मार्ट शहर’ योजनेत महाराष्ट्रातील १० शहरांची निवड केली जाणार असली तरी याकरिता ३७ शहरांमध्ये स्पर्धा आहे. पाणीपुरवठा, वीजपुरवठा, कचरा व्यवस्थापन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्मार्ट शहर’ योजनेत महाराष्ट्रातील १० शहरांची निवड केली जाणार असली तरी याकरिता ३७ शहरांमध्ये स्पर्धा आहे. पाणीपुरवठा, वीजपुरवठा, कचरा व्यवस्थापन या निकषांबरोबरच जे शहर स्मार्ट होण्याकरिता २५० कोटी रुपये उभारू शकेल, त्याचाच या यादीत समावेश केला जाणार आहे.देशातील १०० स्मार्ट शहरांकरिता मोदी सरकारने यंदा ७ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महाराष्ट्रातील एक लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ३७ शहरांना केंद्र सरकारने निश्चित केलेले निकष पूर्ण करून स्मार्ट शहरांच्या स्पर्धेत सहभागी होण्याचा आदेश नगरविकास विभागाने दिला आहे. जुलैअखेरपर्यंत या ३७ शहरांमधून १० शहरांची निवड करून केंद्राला प्रस्ताव सादर करायचा आहे. याकरिता राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. महापालिकांचे आयुक्त व नगरसेवक यांनी आपले शहर स्मार्ट शहरांच्या योजनेत सहभागी होण्याबाबत जनमताचा कानोसा घेऊन निर्णय करायचा आहे.स्मार्ट शहराच्या योजनेत सहभागी होणाऱ्या शहरात पुरेसा पाणीपुरवठा, वीजपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्थापन असणे आवश्यक आहे. साहजिकच मुंबई, ठाणे यासारख्या शहरांतील वाहतूक समस्या व कचरा व्यवस्थापन हे प्रश्न सोडवण्याचे त्यांच्यापुढे आव्हान असेल तर सोलापूर किंवा तत्सम छोट्या शहरांकरिता पाणीपुरवठ्याची समस्या हे सर्वात मोठे आव्हान असू शकते. प्रत्येक शहरांना त्यांच्यापुढील आव्हानांचा विचार करून स्मार्ट शहर होण्याकरिता कुठल्या बाबींची पूर्तता करावी लागेल ते निश्चित करावे लागेल. (विशेष प्रतिनिधी)केंद्र सरकार प्रत्येक शहराला ५०० कोटींचा निधी मंजूर करणार असून तेवढाच म्हणजे ५०० कोटींचा निधी राज्य सरकारला उभा करायचा आहे. ज्या १० शहरांचा या योजनेत समावेश होईल, त्या प्रत्येक शहराला राज्य सरकार आपल्या तिजोरीतून २५० कोटी रुपये देणार असले तरी त्या शहराला २५० कोटी उभे करून आपला हिस्सा द्यावा लागणार आहे.