शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण अर्थव्यवस्था सुदृढ झाली, तरच देश महासत्ता होईल!

By admin | Updated: February 6, 2016 00:10 IST

नितीन गडकरी यांचे प्रतिपादन; डॉ.पंदेकृविचा ३0 वा दीक्षांत समारंभ.

अकोला : देशाची ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. पाणी, वीज उपलब्ध नसल्याने शेती विकासाची गती खुंटली आहे. देशाला महासत्ता व्हायचे असेल, तर ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक परिस्थितीत बदल घडवून आणावे लागतील. त्यासाठी कृषी क्षेत्राच्या विकासासह रोजगार निर्मितीवर भर दयावा लागणार असून, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानावर आधारित कुशल मनुष्यबळ निर्मीती करावी लागणार असल्याचे प्रतिपादन शुक्रवारी केंद्रीय जड वाहतूक व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३0 वा दीक्षांत समारंभात गडकरी यांनी दीक्षांत दिले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी मंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती एकनाथ खडसे, इथिओपीयाचे माजी राजदूत टीबोर पी. नाझ (अमेरिका), डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी, कुलसचिव ओमप्रकाश अग्रवाल, कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार गोपिकीशन बाजोरीया, आ. रणधीर सावरकर, आ. अमित झनक, गोपी ठाकरे, डॉ. जयंत देसाई, विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बळवंत बथकल, डॉ. गोविंदराव भराड, डॉ. मोतीलाल मदान, डॉ. शरद निंबांळकर, डॉ. डी.एम. मानकर, डॉ. व्ही.एम.भाले, डॉ. महेंद्र नागदेवे आदिंची दीक्षांत पिठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना गडकरी यांनी कृषी विकासावर चिंता व्यक्त केली. अपुर्‍या सिंचन व्यवस्थेचा हा परिणाम असल्याचे ते म्हणाले. देशातील कृषी क्षेत्राचा विकास साधायचा असेल तर पाणी महत्वाचा घटक असून, त्याकरिता पावसाच्या पाण्याचे मुलस्थानी जलसंवर्धन करावे लागणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या जलयुक्त शिवार उपक्रमाचे त्यांनी कौतूक केले. कृषी विद्यापीठांनी कमी पावसात जास्त उत्पादन देणारे वाण विकसीत करण्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित दोन प्रकारचे मनुष्यबळ विकसीत करावे लागणार आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठांनी रोजगारभिमुख कुशल मनुष्यबळ निर्माण करावे. त्यासाठी महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांना संशोधनामध्ये कमालीची सुधारणा घडवून आणावी लागणार आहे. कोळशावर आधारित युरीया, मिथेन, इथेनॉलशी संबंधित उद्योगांकडे वळण्याचा सल्लाही त्यांनी दिला.भारत-अमेरिकेचे संबध दृढ करण्याच्या दृष्टीने दोन्ही राष्ट्रांचे ठोस प्रयत्न दिसत असल्याचे सांगून, मेक इन इंडिया मोहिमेंतर्गत आंतरराष्ट्रीय उद्योग भारतामध्ये अधिकाधिक गुंतवूणक करीत असल्याचे टीबोर पी. नाझ यांनी स्पष्ट केले. मागील दहा वर्षात भारत आणि अमेरिकेतील व्दिपक्षीय व्यापार सुमारे १0 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यत पोहोचला आहे. पुढील काही वर्षात तो ५00 अब्ज डॉलरपर्यत नेण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.या शतकामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत भारत, अमेरिका आणि चीन या देशांचा मोठा वाटा आहे, हे मान्य असले तरी अर्थशास्त्रज्ञांची मते मात्र भिन्न आहेत. अर्थशास्त्रज्ञांच्या मते भारत अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगाने वाढणारी आहे, असे ते म्हणाले. त्यांनी कृषी क्षेत्रापुढील आव्हानांचे विवेचन केले.कुलगुरू डॉ. दाणी यांनी कृषी विद्यापीठाने विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची माहिती प्रास्ताविकातून दिली. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विद्यापीठाला शेतकरी समुपदेशन केंद्र देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. सेंद्रिय शेती उत्पादन निर्यात करण्यासाठी गुणवत्ता तपासणी केंद्राची मागणीही त्यांनी केली. या दीक्षांत समारंभात कृषी अभ्यासक्रमाच्या १३८७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. उत्कृष्ट गुणांक प्राप्त करणार्‍या विविध शाखेच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना २७ सुवर्ण, १६ रौप्य पदके देऊन गौरविण्यात आले. २९ रोख व तीन पुस्तक स्वरू पात बक्षिसे यावेळी देण्यात आली.विद्यापीठात निवडणुकीचे राजकारण विद्यापीठात निवडणुकांच्या माध्यमातून राजकारण शिरल्याने त्याचे परिणाम अलीकडे दिसू लागले आहेत. ज्ञानाची विद्यापीठे राजकीय अड्डे न करता ज्ञानवंत, कुशल विद्यार्थी घडवावे, असा सल्लाही नितीन गडकरी यांनी कृषी विद्यापीठांना दिला.