शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

ग्रामीण अर्थव्यवस्था सुदृढ झाली, तरच देश महासत्ता होईल!

By admin | Updated: February 6, 2016 00:10 IST

नितीन गडकरी यांचे प्रतिपादन; डॉ.पंदेकृविचा ३0 वा दीक्षांत समारंभ.

अकोला : देशाची ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. पाणी, वीज उपलब्ध नसल्याने शेती विकासाची गती खुंटली आहे. देशाला महासत्ता व्हायचे असेल, तर ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक परिस्थितीत बदल घडवून आणावे लागतील. त्यासाठी कृषी क्षेत्राच्या विकासासह रोजगार निर्मितीवर भर दयावा लागणार असून, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानावर आधारित कुशल मनुष्यबळ निर्मीती करावी लागणार असल्याचे प्रतिपादन शुक्रवारी केंद्रीय जड वाहतूक व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३0 वा दीक्षांत समारंभात गडकरी यांनी दीक्षांत दिले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी मंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती एकनाथ खडसे, इथिओपीयाचे माजी राजदूत टीबोर पी. नाझ (अमेरिका), डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी, कुलसचिव ओमप्रकाश अग्रवाल, कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार गोपिकीशन बाजोरीया, आ. रणधीर सावरकर, आ. अमित झनक, गोपी ठाकरे, डॉ. जयंत देसाई, विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बळवंत बथकल, डॉ. गोविंदराव भराड, डॉ. मोतीलाल मदान, डॉ. शरद निंबांळकर, डॉ. डी.एम. मानकर, डॉ. व्ही.एम.भाले, डॉ. महेंद्र नागदेवे आदिंची दीक्षांत पिठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना गडकरी यांनी कृषी विकासावर चिंता व्यक्त केली. अपुर्‍या सिंचन व्यवस्थेचा हा परिणाम असल्याचे ते म्हणाले. देशातील कृषी क्षेत्राचा विकास साधायचा असेल तर पाणी महत्वाचा घटक असून, त्याकरिता पावसाच्या पाण्याचे मुलस्थानी जलसंवर्धन करावे लागणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या जलयुक्त शिवार उपक्रमाचे त्यांनी कौतूक केले. कृषी विद्यापीठांनी कमी पावसात जास्त उत्पादन देणारे वाण विकसीत करण्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित दोन प्रकारचे मनुष्यबळ विकसीत करावे लागणार आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठांनी रोजगारभिमुख कुशल मनुष्यबळ निर्माण करावे. त्यासाठी महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांना संशोधनामध्ये कमालीची सुधारणा घडवून आणावी लागणार आहे. कोळशावर आधारित युरीया, मिथेन, इथेनॉलशी संबंधित उद्योगांकडे वळण्याचा सल्लाही त्यांनी दिला.भारत-अमेरिकेचे संबध दृढ करण्याच्या दृष्टीने दोन्ही राष्ट्रांचे ठोस प्रयत्न दिसत असल्याचे सांगून, मेक इन इंडिया मोहिमेंतर्गत आंतरराष्ट्रीय उद्योग भारतामध्ये अधिकाधिक गुंतवूणक करीत असल्याचे टीबोर पी. नाझ यांनी स्पष्ट केले. मागील दहा वर्षात भारत आणि अमेरिकेतील व्दिपक्षीय व्यापार सुमारे १0 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यत पोहोचला आहे. पुढील काही वर्षात तो ५00 अब्ज डॉलरपर्यत नेण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.या शतकामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत भारत, अमेरिका आणि चीन या देशांचा मोठा वाटा आहे, हे मान्य असले तरी अर्थशास्त्रज्ञांची मते मात्र भिन्न आहेत. अर्थशास्त्रज्ञांच्या मते भारत अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगाने वाढणारी आहे, असे ते म्हणाले. त्यांनी कृषी क्षेत्रापुढील आव्हानांचे विवेचन केले.कुलगुरू डॉ. दाणी यांनी कृषी विद्यापीठाने विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची माहिती प्रास्ताविकातून दिली. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विद्यापीठाला शेतकरी समुपदेशन केंद्र देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. सेंद्रिय शेती उत्पादन निर्यात करण्यासाठी गुणवत्ता तपासणी केंद्राची मागणीही त्यांनी केली. या दीक्षांत समारंभात कृषी अभ्यासक्रमाच्या १३८७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. उत्कृष्ट गुणांक प्राप्त करणार्‍या विविध शाखेच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना २७ सुवर्ण, १६ रौप्य पदके देऊन गौरविण्यात आले. २९ रोख व तीन पुस्तक स्वरू पात बक्षिसे यावेळी देण्यात आली.विद्यापीठात निवडणुकीचे राजकारण विद्यापीठात निवडणुकांच्या माध्यमातून राजकारण शिरल्याने त्याचे परिणाम अलीकडे दिसू लागले आहेत. ज्ञानाची विद्यापीठे राजकीय अड्डे न करता ज्ञानवंत, कुशल विद्यार्थी घडवावे, असा सल्लाही नितीन गडकरी यांनी कृषी विद्यापीठांना दिला.