शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

ग्रामीण अर्थव्यवस्था सुदृढ झाली, तरच देश महासत्ता होईल!

By admin | Updated: February 6, 2016 00:10 IST

नितीन गडकरी यांचे प्रतिपादन; डॉ.पंदेकृविचा ३0 वा दीक्षांत समारंभ.

अकोला : देशाची ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. पाणी, वीज उपलब्ध नसल्याने शेती विकासाची गती खुंटली आहे. देशाला महासत्ता व्हायचे असेल, तर ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक परिस्थितीत बदल घडवून आणावे लागतील. त्यासाठी कृषी क्षेत्राच्या विकासासह रोजगार निर्मितीवर भर दयावा लागणार असून, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानावर आधारित कुशल मनुष्यबळ निर्मीती करावी लागणार असल्याचे प्रतिपादन शुक्रवारी केंद्रीय जड वाहतूक व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३0 वा दीक्षांत समारंभात गडकरी यांनी दीक्षांत दिले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी मंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती एकनाथ खडसे, इथिओपीयाचे माजी राजदूत टीबोर पी. नाझ (अमेरिका), डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी, कुलसचिव ओमप्रकाश अग्रवाल, कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार गोपिकीशन बाजोरीया, आ. रणधीर सावरकर, आ. अमित झनक, गोपी ठाकरे, डॉ. जयंत देसाई, विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बळवंत बथकल, डॉ. गोविंदराव भराड, डॉ. मोतीलाल मदान, डॉ. शरद निंबांळकर, डॉ. डी.एम. मानकर, डॉ. व्ही.एम.भाले, डॉ. महेंद्र नागदेवे आदिंची दीक्षांत पिठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना गडकरी यांनी कृषी विकासावर चिंता व्यक्त केली. अपुर्‍या सिंचन व्यवस्थेचा हा परिणाम असल्याचे ते म्हणाले. देशातील कृषी क्षेत्राचा विकास साधायचा असेल तर पाणी महत्वाचा घटक असून, त्याकरिता पावसाच्या पाण्याचे मुलस्थानी जलसंवर्धन करावे लागणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या जलयुक्त शिवार उपक्रमाचे त्यांनी कौतूक केले. कृषी विद्यापीठांनी कमी पावसात जास्त उत्पादन देणारे वाण विकसीत करण्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित दोन प्रकारचे मनुष्यबळ विकसीत करावे लागणार आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठांनी रोजगारभिमुख कुशल मनुष्यबळ निर्माण करावे. त्यासाठी महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांना संशोधनामध्ये कमालीची सुधारणा घडवून आणावी लागणार आहे. कोळशावर आधारित युरीया, मिथेन, इथेनॉलशी संबंधित उद्योगांकडे वळण्याचा सल्लाही त्यांनी दिला.भारत-अमेरिकेचे संबध दृढ करण्याच्या दृष्टीने दोन्ही राष्ट्रांचे ठोस प्रयत्न दिसत असल्याचे सांगून, मेक इन इंडिया मोहिमेंतर्गत आंतरराष्ट्रीय उद्योग भारतामध्ये अधिकाधिक गुंतवूणक करीत असल्याचे टीबोर पी. नाझ यांनी स्पष्ट केले. मागील दहा वर्षात भारत आणि अमेरिकेतील व्दिपक्षीय व्यापार सुमारे १0 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यत पोहोचला आहे. पुढील काही वर्षात तो ५00 अब्ज डॉलरपर्यत नेण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.या शतकामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत भारत, अमेरिका आणि चीन या देशांचा मोठा वाटा आहे, हे मान्य असले तरी अर्थशास्त्रज्ञांची मते मात्र भिन्न आहेत. अर्थशास्त्रज्ञांच्या मते भारत अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगाने वाढणारी आहे, असे ते म्हणाले. त्यांनी कृषी क्षेत्रापुढील आव्हानांचे विवेचन केले.कुलगुरू डॉ. दाणी यांनी कृषी विद्यापीठाने विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची माहिती प्रास्ताविकातून दिली. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विद्यापीठाला शेतकरी समुपदेशन केंद्र देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. सेंद्रिय शेती उत्पादन निर्यात करण्यासाठी गुणवत्ता तपासणी केंद्राची मागणीही त्यांनी केली. या दीक्षांत समारंभात कृषी अभ्यासक्रमाच्या १३८७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. उत्कृष्ट गुणांक प्राप्त करणार्‍या विविध शाखेच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना २७ सुवर्ण, १६ रौप्य पदके देऊन गौरविण्यात आले. २९ रोख व तीन पुस्तक स्वरू पात बक्षिसे यावेळी देण्यात आली.विद्यापीठात निवडणुकीचे राजकारण विद्यापीठात निवडणुकांच्या माध्यमातून राजकारण शिरल्याने त्याचे परिणाम अलीकडे दिसू लागले आहेत. ज्ञानाची विद्यापीठे राजकीय अड्डे न करता ज्ञानवंत, कुशल विद्यार्थी घडवावे, असा सल्लाही नितीन गडकरी यांनी कृषी विद्यापीठांना दिला.