शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सेना-भाजपा एकत्र लढले तरच सत्ता

By admin | Updated: September 20, 2014 02:17 IST

राज्यात शिवसेना- भाजपाला अनुकूल वातावरण आहे; सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन सेना-भाजपा एकत्र लढले तरच महायुतीची सत्ता येईल.

रामदास आठवले : सेनेने ताठर भूमिका सोडून एक-दोन पावले मागे यावे
शांतीलाल गायकवाड  - औरंगाबाद 
राज्यात शिवसेना- भाजपाला अनुकूल वातावरण आहे; सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन सेना-भाजपा एकत्र लढले तरच महायुतीची सत्ता येईल. मात्र ते स्वतंत्र लढल्यास काँग्रेस आघाडी पुन्हा सत्तेवर येईल. हे ध्यानी घेऊनच युती तोडणार नाही, असे आश्वासन भाजपाने दिले असून, आता शिवसेनेनेही एक-दोन पावले मागे आले पाहिजे, असा सल्ला रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी दिला. आठवले यांनी शुक्रवारी औरंगाबादेत ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अनेक मुद्यांवर दिलखुलास चर्चा केली.
युती टिकेल काय? टिकल्यास पुढे प्रामाणिकपणो एकमेकांची कामे होतील?
आठवले : भाजपा संसदीय मंडळाने युती न तोडण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. भाजपा एक पाऊल मागे आली आहे. शिवसेनेने एक-दोन पावले मागे यावे. शिवसेनेची रविवारी बैठक होत आहे. त्यात उद्धव ठाकरे नरमाईची भूमिका घेतील, असा आपल्याला विश्वास आहे. 225 जागा जिंकून महायुतीची सत्ताही येणार आहे; परंतु महायुती एकत्र लढली तरच, हे शक्य आहे.
महायुती तुटली तर रिपब्लिकनची भूमिका काय राहील?
आठवले : महायुती टिकणार आहेच. आम्ही महायुतीसोबतच राहणार. आम्हाला दुसरा पर्याय नाहीच.
प्रश्न : महायुतीतील चार घटक पक्षांना 18 जागा सोडून सेना-भाजपा एकमेकांच्या जागांसाठी का भांडते आहे? 
आठवले : आम्हाला दोन आकडी जागा हव्या आहेत. जागा कमी झाल्यास विधान परिषद, महामंडळे दिली पाहिजेत. आम्ही ताठर भूमिका घेणार नाही. आम्हाला सत्तेत योग्य वाटा द्यावा, एवढीच आमची मागणी आहे. 
उत्तराखंड, बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये पोटनिवडणुकीत भाजपाला फटका बसला. मोदी लाट ओसरली असे वाटते?
आठवले : पोटनिवडणुकीत भाजपाला फटका बसला हे खरंय. देशात इतरत्र मोदी लाटेवर लोकसभा निवडणुका लढल्या गेल्या. महाराष्ट्रात लोकसभेतील महायुतीच्या विजयात मोदी लाटेसह, काँग्रेसविरुद्धचा रोष आणि महायुतीची एकत्रित ताकद हे घटक कारणीभूत आहेत. विधानसभेतही हे तिन्ही घटक टिकून आहेत. विधानसभा आम्हीच जिंकणार.
महायुतीतील लहान मित्रपक्षांना बेसावध ठेवण्यासाठीच सेना-भाजपाने युतीत तणाव निर्माण केला, अशी चर्चा आहे.
आठवले : नाही. मला तसे वाटत नाही. लोकसभेच्या निकालापासून, अगदी सुरुवातीपासूनच भाजपा अधिक जागा मागण्याच्या मूडमध्ये होती, तर शिवसेना मागच्या फॉम्यरुल्यावर कायम होती. त्यामुळे जागावाटपावर बोलणीच सुरू होऊ शकली नाही.