शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सेना-भाजपा एकत्र लढले तरच सत्ता

By admin | Updated: September 20, 2014 02:17 IST

राज्यात शिवसेना- भाजपाला अनुकूल वातावरण आहे; सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन सेना-भाजपा एकत्र लढले तरच महायुतीची सत्ता येईल.

रामदास आठवले : सेनेने ताठर भूमिका सोडून एक-दोन पावले मागे यावे
शांतीलाल गायकवाड  - औरंगाबाद 
राज्यात शिवसेना- भाजपाला अनुकूल वातावरण आहे; सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन सेना-भाजपा एकत्र लढले तरच महायुतीची सत्ता येईल. मात्र ते स्वतंत्र लढल्यास काँग्रेस आघाडी पुन्हा सत्तेवर येईल. हे ध्यानी घेऊनच युती तोडणार नाही, असे आश्वासन भाजपाने दिले असून, आता शिवसेनेनेही एक-दोन पावले मागे आले पाहिजे, असा सल्ला रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी दिला. आठवले यांनी शुक्रवारी औरंगाबादेत ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अनेक मुद्यांवर दिलखुलास चर्चा केली.
युती टिकेल काय? टिकल्यास पुढे प्रामाणिकपणो एकमेकांची कामे होतील?
आठवले : भाजपा संसदीय मंडळाने युती न तोडण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. भाजपा एक पाऊल मागे आली आहे. शिवसेनेने एक-दोन पावले मागे यावे. शिवसेनेची रविवारी बैठक होत आहे. त्यात उद्धव ठाकरे नरमाईची भूमिका घेतील, असा आपल्याला विश्वास आहे. 225 जागा जिंकून महायुतीची सत्ताही येणार आहे; परंतु महायुती एकत्र लढली तरच, हे शक्य आहे.
महायुती तुटली तर रिपब्लिकनची भूमिका काय राहील?
आठवले : महायुती टिकणार आहेच. आम्ही महायुतीसोबतच राहणार. आम्हाला दुसरा पर्याय नाहीच.
प्रश्न : महायुतीतील चार घटक पक्षांना 18 जागा सोडून सेना-भाजपा एकमेकांच्या जागांसाठी का भांडते आहे? 
आठवले : आम्हाला दोन आकडी जागा हव्या आहेत. जागा कमी झाल्यास विधान परिषद, महामंडळे दिली पाहिजेत. आम्ही ताठर भूमिका घेणार नाही. आम्हाला सत्तेत योग्य वाटा द्यावा, एवढीच आमची मागणी आहे. 
उत्तराखंड, बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये पोटनिवडणुकीत भाजपाला फटका बसला. मोदी लाट ओसरली असे वाटते?
आठवले : पोटनिवडणुकीत भाजपाला फटका बसला हे खरंय. देशात इतरत्र मोदी लाटेवर लोकसभा निवडणुका लढल्या गेल्या. महाराष्ट्रात लोकसभेतील महायुतीच्या विजयात मोदी लाटेसह, काँग्रेसविरुद्धचा रोष आणि महायुतीची एकत्रित ताकद हे घटक कारणीभूत आहेत. विधानसभेतही हे तिन्ही घटक टिकून आहेत. विधानसभा आम्हीच जिंकणार.
महायुतीतील लहान मित्रपक्षांना बेसावध ठेवण्यासाठीच सेना-भाजपाने युतीत तणाव निर्माण केला, अशी चर्चा आहे.
आठवले : नाही. मला तसे वाटत नाही. लोकसभेच्या निकालापासून, अगदी सुरुवातीपासूनच भाजपा अधिक जागा मागण्याच्या मूडमध्ये होती, तर शिवसेना मागच्या फॉम्यरुल्यावर कायम होती. त्यामुळे जागावाटपावर बोलणीच सुरू होऊ शकली नाही.