शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

पाच जणांच्या मृत्यूस पालिकाच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2016 02:16 IST

महापालिकेची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून डेंग्यू व मलेरियाच्या साथीमुळे सामान्य शहरवासीयांना जीव गमवावा लागला आहे.

नवी मुंबई : महापालिकेची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून डेंग्यू व मलेरियाच्या साथीमुळे सामान्य शहरवासीयांना जीव गमवावा लागला आहे. तुर्भे नाक्यावर एक महिन्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या रूग्णालयात दाखल करून न घेतल्यामुळे एका महिलेचा रिक्षामध्येच मृत्यू झाला असून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होवू लागला आहे. डेंग्यूमुळे तुर्भे नाक्यावर पाच जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच शहरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांची भेट घेतली असता ही घटना महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच झाल्याचे निदर्शनास आले आहे. हनुमान नगरमध्ये राहणाऱ्या गीता प्रसाद या महिलेला ताप येवू लागल्याने नाक्यावरील डॉक्टरकडे उपचारासाठी नेले होते. परंतु ताप कमी होत नसल्याने डॉक्टरने त्यांना रूग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला. गीता यांचे पती श्रीचंद यांनी तत्काळ वाशी मनपा रूग्णालयात नेले. पण तेथील डॉक्टरांनी गंभीर काही नसल्याचे कारण देवून रूग्णास घरी घेवून जाण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशीही प्रकृती खालावल्यामुळे पुन्हा रूग्णालयात नेल्यानंतरही अ‍ॅडमिट करून घेतले नाही. तिसऱ्या दिवशी प्रकृती गंभीर झाल्याने पुन्हा रूग्णालयात घेवून जात असताना रिक्षामध्येच मृत्यू झाला. तुर्र्भे परिसरामधीलच शंकरी हलदार यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. भाऊबीजेच्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली. नाक्यावरील सर्व रूग्णालये बंद असल्यामुळे त्यांनी वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयात नेले. परंतु तेथील व्यवस्थापनानेही सुटी असल्याचे कारण देवून त्यांना रूग्णालयात दाखल करून घेतले नाही. परिणामी उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला. ध्रुपदा रोहिदास गवळी, पल्लवी गायकवाड व प्रेम भालेकर यांनाही योग्य उपचार मिळाले नसल्यामुळे मृत्यू झाला आहे. शहरात डेंग्यू व मलेरियाने थैमान घातले आहे. नागरिकांचा जीव जात असताना महापालिका प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. अविश्वास ठराव दाखल झाल्यामुळे तुकाराम मुंढे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचना आयुक्तांच्या भीतीने अधिकारी ऐकत नाहीत. या भांडणामध्ये नागरिकांचा जीव जात असल्याने तुर्भे नाका परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)>तुर्भेत आरोग्य सुविधेचा अभावतुर्भे नाका हनुमाननगर, आंबेडकरनगर, गणेशनगर, बोनसरी व इंदिरा नगर झोपडपट्टी परिसरात महानगरपालिकेचे एकही नागरी आरोग्य केंद्र नाही. तुर्भे गावात असलेले माता बाल रूग्णालयही काही महिन्यांपूर्वीच बंद झालेले आहे. पालिका रूग्णालयाची सुविधा नाही व खासगी रूग्णालयातील उपचार परवडत नसल्याने झोपडपट्टीतील रूग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. >डेंग्यू व मलेरियाची स्थिती गंभीर आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही योग्य दखल घेतली जात नसल्याने नागरिकांचा मृत्यू होवू लागला आहे. - अमृत मेढकर, सामाजिक कार्यकर्ते