शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

घाईघाईत दिले फक्त पुरवणीचे गुण!, निकालावर नापासचा शेरा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 04:31 IST

मुंबई विद्यापीठाने निकालाच्या दोन डेडलाइन चुकविल्यानंतर निकालाचा धडाका सुरू केला, परंतु निकालाची डेडलाइन पाळण्याची अतिघाई विद्यार्थ्यांचे नुकसान करणारी ठरत आहे. घाईघाईत केवळ पुरवणीच तपासल्याने, विज्ञान शाखेतील अनेक विद्यार्थ्यांच्या निकालात फक्त पुरवणीचे गुण दिसत आहेत.

मुंबई : मुंबई विद्यापीठाने निकालाच्या दोन डेडलाइन चुकविल्यानंतर निकालाचा धडाका सुरू केला, परंतु निकालाची डेडलाइन पाळण्याची अतिघाई विद्यार्थ्यांचे नुकसान करणारी ठरत आहे. घाईघाईत केवळ पुरवणीच तपासल्याने, विज्ञान शाखेतील अनेक विद्यार्थ्यांच्या निकालात फक्त पुरवणीचे गुण दिसत आहेत. त्यामुळे हुशार विद्यार्थीही नापास झाले असून, त्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.आॅगस्ट महिना उजाडूनही मुंबई विद्यापीठाचे १०० हून अधिक निकाल अद्याप जाहीर होणे बाकी आहे. त्यातच कुलगुरू डॉ. संजय देशमुख सुट्टीवर गेले आहेत. निकाल कधी लागणार, हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर असतानाच, आता उत्तरपत्रिका व्यवस्थित तपासल्या जातील का, हक्काचे गुण तरी मिळतील का, असा नवा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहे. कारण अनेक विद्यार्थ्यांना एका विषयात कमी गुण म्हणजे, १० ते १५ गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी नापास झाले आहेत. अनेक महाविद्यालयांनी या प्रकरणी विद्यापीठाकडे पत्र पाठवून खंत व्यक्त केल्याचे समजते.विज्ञान शाखेनंतर अन्य निकालांमध्येही सावळागोंधळ आहे. विद्यार्थ्यांना १०० पैकी फक्त १५ ते २० गुणच देण्यात आले आहेत. यापैकी अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील परीक्षांमध्ये चांगले गुण मिळाले आहेत. त्यामुळे इतके कमी गुण कसे मिळू शकतात? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांनाही पडला आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी मुंबई विद्यापीठाकडे विचारणा केली असून, विद्यार्थी प्रचंड तणावाखाली आहेत.स्कॅनिंगमुळे गोंधळकाही विद्यार्थ्यांच्या मुख्य उत्तरपत्रिकांची तपासणी झाली आहे, पण पुरवण्या मिळत नसल्याने गोंधळ सुरू आहे. उत्तरपत्रिका स्कॅन करताना एक-एक पान वेगळे करण्यात आले. त्यामुळे वेगवेगळ््या प्राध्यापकांकडून ते तपासण्यात आले. त्यामुळेच हा गोंधळ झाला, अशी कबुुली परीक्षा विभागातील एका अधिकाºयांनी दिली.आता तरी डेडलाइन पाळणार का?लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठाने स्वत:च १५ आॅगस्टपर्यंत निकाल जाहीर करण्याची डेडलाइन दिली आहे. या डेडलाइननुसार, मुंबई विद्यापीठाच्या हातात फक्त ४ दिवस उरले असतानाही शुक्रवारी रात्री साडेआठपर्यंत विद्यापीठापुढे सुमारे पावणेदोन लाखांच्या उत्तरपत्रिकांचा डोंगर आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठ दरदिवशी सरासरी १६ ते २० हजार उत्तरपत्रिकांची तपासणी करत आहे. त्यामुळे विद्यापीठ स्वत:ची डेडलाइन पाळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी एप्रिल महिन्यात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार मे महिन्यात ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. या निर्णयात मुंबई विद्यापीठ सपशेल नापास झाले आहे.डेडलाइन संपायला शेवटचे चार दिवस उरले आहेत. मात्र उत्तरपत्रिका तपासणीचा वेग जैसे थेच आहे. मुंबई विद्यापीठात शुक्रवारी रात्री साडेआठपर्यंत एकूण १६ हजार २१५ उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून, अजूनही १ लाख ७४ हजार ६८२ उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे. शुक्रवारी, विद्यापीठात उत्तरपत्रिका तपासणीसाठी फक्त ९६६ प्राध्यापक आले होते. याच वेगाने उत्तरपत्रिका तपासणी सुरू राहिली तर मॉडरेशन कधी आणि निकाल कधी, हा प्रश्न अनुत्तरित आहे. १५ आॅगस्टपूर्वी निकाल जाहीर न झाल्यास निकालाची तिसरी डेडलाइन चुकल्याचा ठपका विद्यापीठावर लागणार आहे.१,८१,५८३ उत्तरपत्रिकांची तपासणी बाकीमुंबई विद्यापीठात शुक्रवारी एकूण ९ हजार २५९ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन झाले असून ७ हजार २५ उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन पूर्ण झाले आहे. १ लाख ८१ हजार ५८३ उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे. तर, ५९ हजार ६५५ उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन बाकी आहे.