शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

घाईघाईत दिले फक्त पुरवणीचे गुण!, निकालावर नापासचा शेरा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 04:31 IST

मुंबई विद्यापीठाने निकालाच्या दोन डेडलाइन चुकविल्यानंतर निकालाचा धडाका सुरू केला, परंतु निकालाची डेडलाइन पाळण्याची अतिघाई विद्यार्थ्यांचे नुकसान करणारी ठरत आहे. घाईघाईत केवळ पुरवणीच तपासल्याने, विज्ञान शाखेतील अनेक विद्यार्थ्यांच्या निकालात फक्त पुरवणीचे गुण दिसत आहेत.

मुंबई : मुंबई विद्यापीठाने निकालाच्या दोन डेडलाइन चुकविल्यानंतर निकालाचा धडाका सुरू केला, परंतु निकालाची डेडलाइन पाळण्याची अतिघाई विद्यार्थ्यांचे नुकसान करणारी ठरत आहे. घाईघाईत केवळ पुरवणीच तपासल्याने, विज्ञान शाखेतील अनेक विद्यार्थ्यांच्या निकालात फक्त पुरवणीचे गुण दिसत आहेत. त्यामुळे हुशार विद्यार्थीही नापास झाले असून, त्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.आॅगस्ट महिना उजाडूनही मुंबई विद्यापीठाचे १०० हून अधिक निकाल अद्याप जाहीर होणे बाकी आहे. त्यातच कुलगुरू डॉ. संजय देशमुख सुट्टीवर गेले आहेत. निकाल कधी लागणार, हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर असतानाच, आता उत्तरपत्रिका व्यवस्थित तपासल्या जातील का, हक्काचे गुण तरी मिळतील का, असा नवा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहे. कारण अनेक विद्यार्थ्यांना एका विषयात कमी गुण म्हणजे, १० ते १५ गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी नापास झाले आहेत. अनेक महाविद्यालयांनी या प्रकरणी विद्यापीठाकडे पत्र पाठवून खंत व्यक्त केल्याचे समजते.विज्ञान शाखेनंतर अन्य निकालांमध्येही सावळागोंधळ आहे. विद्यार्थ्यांना १०० पैकी फक्त १५ ते २० गुणच देण्यात आले आहेत. यापैकी अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील परीक्षांमध्ये चांगले गुण मिळाले आहेत. त्यामुळे इतके कमी गुण कसे मिळू शकतात? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांनाही पडला आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी मुंबई विद्यापीठाकडे विचारणा केली असून, विद्यार्थी प्रचंड तणावाखाली आहेत.स्कॅनिंगमुळे गोंधळकाही विद्यार्थ्यांच्या मुख्य उत्तरपत्रिकांची तपासणी झाली आहे, पण पुरवण्या मिळत नसल्याने गोंधळ सुरू आहे. उत्तरपत्रिका स्कॅन करताना एक-एक पान वेगळे करण्यात आले. त्यामुळे वेगवेगळ््या प्राध्यापकांकडून ते तपासण्यात आले. त्यामुळेच हा गोंधळ झाला, अशी कबुुली परीक्षा विभागातील एका अधिकाºयांनी दिली.आता तरी डेडलाइन पाळणार का?लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठाने स्वत:च १५ आॅगस्टपर्यंत निकाल जाहीर करण्याची डेडलाइन दिली आहे. या डेडलाइननुसार, मुंबई विद्यापीठाच्या हातात फक्त ४ दिवस उरले असतानाही शुक्रवारी रात्री साडेआठपर्यंत विद्यापीठापुढे सुमारे पावणेदोन लाखांच्या उत्तरपत्रिकांचा डोंगर आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठ दरदिवशी सरासरी १६ ते २० हजार उत्तरपत्रिकांची तपासणी करत आहे. त्यामुळे विद्यापीठ स्वत:ची डेडलाइन पाळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी एप्रिल महिन्यात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार मे महिन्यात ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. या निर्णयात मुंबई विद्यापीठ सपशेल नापास झाले आहे.डेडलाइन संपायला शेवटचे चार दिवस उरले आहेत. मात्र उत्तरपत्रिका तपासणीचा वेग जैसे थेच आहे. मुंबई विद्यापीठात शुक्रवारी रात्री साडेआठपर्यंत एकूण १६ हजार २१५ उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून, अजूनही १ लाख ७४ हजार ६८२ उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे. शुक्रवारी, विद्यापीठात उत्तरपत्रिका तपासणीसाठी फक्त ९६६ प्राध्यापक आले होते. याच वेगाने उत्तरपत्रिका तपासणी सुरू राहिली तर मॉडरेशन कधी आणि निकाल कधी, हा प्रश्न अनुत्तरित आहे. १५ आॅगस्टपूर्वी निकाल जाहीर न झाल्यास निकालाची तिसरी डेडलाइन चुकल्याचा ठपका विद्यापीठावर लागणार आहे.१,८१,५८३ उत्तरपत्रिकांची तपासणी बाकीमुंबई विद्यापीठात शुक्रवारी एकूण ९ हजार २५९ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन झाले असून ७ हजार २५ उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन पूर्ण झाले आहे. १ लाख ८१ हजार ५८३ उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे. तर, ५९ हजार ६५५ उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन बाकी आहे.