शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा सरकारकडून केवळ आश्वासने

By admin | Updated: June 9, 2016 02:18 IST

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने दोन वर्षांत ठळक कामगिरी केली

देहूरोड : भरमसाठ आश्वासने देऊन केंद्रात सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने दोन वर्षांत ठळक कामगिरी केली नसून, त्यांच्याकडून अद्यापही केवळ आश्वासनेच देण्यात येत आहेत. जनतेसाठी अच्छे दिन यायला आणखी किती दिवस लागणार आहेत? सत्तेवर आल्यावर दर वर्षी चार करोड बेरोजगारांना नोकरी देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. आजतागायत किती बेरोजगारांना नोकऱ्या दिल्या? कॅन्टोन्मेंट बोर्डाला ‘सीईओ’ कधी मिळणार? असे सवाल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी येथे उपस्थित केले. कॅन्टोन्मेंट परिसरातील विविध समस्या जाणून घेण्याकरिता जगताप येथे आले होते. त्या वेळी जगताप म्हणाले, केंद्रात व राज्यात एकाच सरकार असताना जनतेचे महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डातही भाजपाची सत्ता असतानाही गेल्या पाच महिन्यांपासून बोर्डाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांमार्फत चालला आहे. नवीन ‘सीईओ’ कधी रुजू होणार? गेल्या नऊ महिन्यांपासून रखडलेली विकासकामे कधी सुरू होणार? अच्छे दिन, बेरोजगारीच्या प्रश्नावर फक्त आश्वासने देण्यात येत असून, सरकारकडून कार्यवाही होत नसल्याचे दिसत आहे. बोर्डाचे सदस्य हाजीमलंग मारीमुत्तू, गोपाळराव तंतरपाळे, महिला आघाडीच्या अध्यक्षा गंगूताई खळेकर, इलीहास खान, जावेद सिकीलकर, बाळासाहेब पिंजण, मोहन राऊत, जयसिंग टी. शंकर, शिवा कंदस्वामी, नंदकिशोर यादव, ज्योती वैरागर, गफुरभाई शेख यांनी मनोगतात विविध समस्या विशद केल्या. अशोक कुसळे, टी. शेकन्ना, माणिक वाघमारे, नरसम्मा बेगवाडे, संभाजी पिंजण, लक्ष्मण धिलोड, गणेश पिंजण, संदीप जाधव, पोपट मोहिते, अनिकेत मुळीक , आदी मान्यवर उपस्थित होते. संदीप जाधव यांनी सूत्रसंचालन, शंकर टी. जयसिंग यांनी आभार मानले. (वार्ताहर)