शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

सन्मानजनक तडजोडीनंतरच आघाडी शक्य - मुख्यमंत्री

By admin | Updated: August 4, 2014 03:16 IST

काँग्रेसने महाराष्ट्रात समविचारी पक्षांना सोबत घेऊन पाच वेळा विधानसभा निवडणुका लढविल्या आहेत.

नाशिक : काँग्रेसने महाराष्ट्रात समविचारी पक्षांना सोबत घेऊन पाच वेळा विधानसभा निवडणुका लढविल्या आहेत. युती सरकारच्या कारभारानंतर जनतेने लोकशाही आघाडीवर विश्वास टाकला आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. आता सहाव्यांदा आघाडीचा प्रस्ताव आला तर सन्मानजनक तडजोडीसाठी कॉँग्रेस तयार आहे; परंतु कोणत्याही अटी-शर्ती स्वीकारल्या जाणार नाहीत, असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळाव्यात बोलताना केले. काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका करीत स्वबळाचा नारा दिला.लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने पराभवाचे विश्लेषण-चिंतन केले. आता विभागीय मेळाव्याच्या माध्यमातून राज्यातील कार्यकर्त्यांनी नैराश्य झटकले आहे. नव्या जोमाने विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार केला आहे, असे चव्हाण म्हणाले. केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशावर हुकूमशाही पद्धतीने देशाचा कारभार चालविला जाणार असल्याची भीतीही चव्हाण यांनी व्यक्त केली. गुजरात मॉडेलच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल केली जात आहे. गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची जाहीर चर्चा होऊन जाऊ द्या, असे आव्हानही त्यांनी दिले. लोकसभा निवडणुकीत अपप्रचारामुळे पक्षाला पराभव पाहावा लागला; परंतु आता वातावरण बदलते आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले. आम्ही एकही जागा सोडणार नाही. सन्मानजनक तडजोडीस तयार आहोत; अन्यथा २८८ जागा लढविण्याची तयारी आहे. काँग्रेसची पहिली यादी लवकरात लवकर जाहीर होणार असून, ११ आॅगस्टपर्यंत इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)