शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

‘तेरणा’त उरला फक्त मृत जलसाठा!

By admin | Updated: April 23, 2016 04:05 IST

उस्मानाबादसह तेर, ढोकी, येडशी आणि कसबे तडवळे या चार गावांची तहान भागविणाऱ्या तेरणा धरणातील जलसाठ्याने मागील तीन वर्षांत एकदाही ३५ टक्क्यांपेक्षा जास्त पातळी गाठलेली नाही

सुमेध वाघमारे ,  तेर (उस्मानाबाद)उस्मानाबादसह तेर, ढोकी, येडशी आणि कसबे तडवळे या चार गावांची तहान भागविणाऱ्या तेरणा धरणातील जलसाठ्याने मागील तीन वर्षांत एकदाही ३५ टक्क्यांपेक्षा जास्त पातळी गाठलेली नाही. गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे या धरणात आजघडीला केवळ मृत पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे चारही गावांची तहान सध्या टँकरवरच भागत आहे. जवळपास २२ हजार लोकसंख्येच्या तेरमध्ये सध्या पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांचा चारा, रोजगार हे प्रश्नही गंभीर बनले आहेत. गावात ग्रामपंचायतीच्या मालकीच्या २०३ विहिरी आणि २८२ बोअरवेल असले तरी यातील ८० टक्के स्रोत आटले आहेत. सध्या ग्रामपंचायतीच्या वतीने ३ टँकर व ४ अधिग्रहीत बोअरवरून पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अपुराच ठरत आहे. शिवाय गावात ग्रामपंचायतीच्या १२पैकी ७ स्रोत सुरू असून, मध्यंतरी लोकसहभागातून बोअर घेतल्यामुळे काही भागांतील रहिवाशांना दिलासा मिळाला. परंतु, गोदावरी भाग, पेठ, बसस्टँड परिसर, पूर्व भीमनगर, मातंग वस्ती, विठ्ठलनगर, अंजनानगर या भागाला टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. तेरमध्ये १६९६ नोंदणीकृत मजूर असून, त्यांनाही मजुरीसाठी भटकंती करावी लागत आहे. येथे विहीर पुनर्भरणाच्या कामावर केवळ ७ मजूर उपस्थित असून, इतर मजूर मिळेल त्या कामावर समाधान मानत आहेत. चारा छावणीमुळेमिळाला दिलासातेर येथे एकूण १६१८ पशुधन आहे. जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गहन होत असतानाच येथे चारा छावणी सुरू झाल्यामुळे पशुपालकांची ही चिंता काही प्रमाणात दूर झाली.तेरमध्येही नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. परंतु, ही तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सरपंच सुवर्णा माळी यांनी सांगितले.तेरमध्ये मजुरांची संख्याही मोठी आहे. परंतु, रोजगाराअभावी कुणाचीही उपासमार होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने मागेल त्याच्या हाताला काम देण्याचे प्रयोजन करण्यात आले असल्याचे ग्रामविकास अधिकारी विजयसिंह नलावडे म्हणाले.> ‘दुष्काळी भागातील सर्व तलाव भरून देऊ’विटा (जि. सांगली) : राज्यातील ९८ जलसिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली असून, सर्व योजना पूर्ण करण्यासाठी अजून ९० हजार कोटींची आवश्यकता आहे. कर्जरोखे, कर्ज काढून हा निधी उपलब्ध करणार असून, भाजपाचे सरकार सत्तेच्या उर्वरित कालावधीत राज्यातील ८० टक्के जलसिंचन प्रकल्प पूर्ण करणार आहे, असा विश्वास जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या जलसंपदामंत्री महाजन यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला. पाण्याची ८० ते ९० टक्के गळती होत आहे. ती रोखण्यासाठी यापुढील काळात पाइपबंद पाणी योजनांना मान्यता देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. उपलब्ध पाण्यात सिंचन क्षमता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. आम्हाला २०१७ची अंतिम मुदत देण्यात आली असून, टेंभू योजनेवरील सर्व सिंचन क्षेत्र ठिबकच्या माध्यमातून सिंचनाखाली आणण्यात येणार आहे. उपसा सिंचनाला प्राधान्य देण्यात येणार असले तरी ठिबकच्या वापरासाठी शेतकऱ्यांनी मानसिकता ठेवली पाहिजे, असे सांगून दुष्काळी भागातील सर्व तलाव भरून देऊ, असेही महाजन म्हणाले. (वार्ताहर)