शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

‘तेरणा’त उरला फक्त मृत जलसाठा!

By admin | Updated: April 23, 2016 04:05 IST

उस्मानाबादसह तेर, ढोकी, येडशी आणि कसबे तडवळे या चार गावांची तहान भागविणाऱ्या तेरणा धरणातील जलसाठ्याने मागील तीन वर्षांत एकदाही ३५ टक्क्यांपेक्षा जास्त पातळी गाठलेली नाही

सुमेध वाघमारे ,  तेर (उस्मानाबाद)उस्मानाबादसह तेर, ढोकी, येडशी आणि कसबे तडवळे या चार गावांची तहान भागविणाऱ्या तेरणा धरणातील जलसाठ्याने मागील तीन वर्षांत एकदाही ३५ टक्क्यांपेक्षा जास्त पातळी गाठलेली नाही. गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे या धरणात आजघडीला केवळ मृत पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे चारही गावांची तहान सध्या टँकरवरच भागत आहे. जवळपास २२ हजार लोकसंख्येच्या तेरमध्ये सध्या पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांचा चारा, रोजगार हे प्रश्नही गंभीर बनले आहेत. गावात ग्रामपंचायतीच्या मालकीच्या २०३ विहिरी आणि २८२ बोअरवेल असले तरी यातील ८० टक्के स्रोत आटले आहेत. सध्या ग्रामपंचायतीच्या वतीने ३ टँकर व ४ अधिग्रहीत बोअरवरून पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अपुराच ठरत आहे. शिवाय गावात ग्रामपंचायतीच्या १२पैकी ७ स्रोत सुरू असून, मध्यंतरी लोकसहभागातून बोअर घेतल्यामुळे काही भागांतील रहिवाशांना दिलासा मिळाला. परंतु, गोदावरी भाग, पेठ, बसस्टँड परिसर, पूर्व भीमनगर, मातंग वस्ती, विठ्ठलनगर, अंजनानगर या भागाला टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. तेरमध्ये १६९६ नोंदणीकृत मजूर असून, त्यांनाही मजुरीसाठी भटकंती करावी लागत आहे. येथे विहीर पुनर्भरणाच्या कामावर केवळ ७ मजूर उपस्थित असून, इतर मजूर मिळेल त्या कामावर समाधान मानत आहेत. चारा छावणीमुळेमिळाला दिलासातेर येथे एकूण १६१८ पशुधन आहे. जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गहन होत असतानाच येथे चारा छावणी सुरू झाल्यामुळे पशुपालकांची ही चिंता काही प्रमाणात दूर झाली.तेरमध्येही नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. परंतु, ही तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सरपंच सुवर्णा माळी यांनी सांगितले.तेरमध्ये मजुरांची संख्याही मोठी आहे. परंतु, रोजगाराअभावी कुणाचीही उपासमार होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने मागेल त्याच्या हाताला काम देण्याचे प्रयोजन करण्यात आले असल्याचे ग्रामविकास अधिकारी विजयसिंह नलावडे म्हणाले.> ‘दुष्काळी भागातील सर्व तलाव भरून देऊ’विटा (जि. सांगली) : राज्यातील ९८ जलसिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली असून, सर्व योजना पूर्ण करण्यासाठी अजून ९० हजार कोटींची आवश्यकता आहे. कर्जरोखे, कर्ज काढून हा निधी उपलब्ध करणार असून, भाजपाचे सरकार सत्तेच्या उर्वरित कालावधीत राज्यातील ८० टक्के जलसिंचन प्रकल्प पूर्ण करणार आहे, असा विश्वास जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या जलसंपदामंत्री महाजन यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला. पाण्याची ८० ते ९० टक्के गळती होत आहे. ती रोखण्यासाठी यापुढील काळात पाइपबंद पाणी योजनांना मान्यता देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. उपलब्ध पाण्यात सिंचन क्षमता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. आम्हाला २०१७ची अंतिम मुदत देण्यात आली असून, टेंभू योजनेवरील सर्व सिंचन क्षेत्र ठिबकच्या माध्यमातून सिंचनाखाली आणण्यात येणार आहे. उपसा सिंचनाला प्राधान्य देण्यात येणार असले तरी ठिबकच्या वापरासाठी शेतकऱ्यांनी मानसिकता ठेवली पाहिजे, असे सांगून दुष्काळी भागातील सर्व तलाव भरून देऊ, असेही महाजन म्हणाले. (वार्ताहर)