शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडून केवळ पोकळ घोषणा

By admin | Updated: September 12, 2015 02:00 IST

राज्यात यंदा अत्यंत कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पिके नष्ट झाल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.

नाशिक : राज्यात यंदा अत्यंत कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पिके नष्ट झाल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. राज्य सरकार मात्र केवळ पोकळ घोषणा करीत असल्याचे टीकास्त्र माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोडले.शेतकरी व जनतेला न्याय मिळण्यासाठी व दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न व्हावा, यासाठी केंद्र सरकाराने राज्याला जास्त निधी द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त साधुग्राममधील एका धार्मिक कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. चव्हाण म्हणाले की, राज्यातील दुष्काळ हा कमी पावसामुळे निर्माण झाला तरी काही प्रमाणात मानवनिर्मितदेखील आहे. राज्य आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी एकाच पक्षाचे सरकार असूनही महाराष्ट्रावर अन्याय होत आहे.बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅकेज जाहीर करतात. त्याचवेळी महाराष्ट्रात मात्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील दुष्काळी भागाची पाहणी करावी आणि पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावून दुष्काळप्रश्नी चर्चा घडवावी. प्रश्नाचे गांभीर्य ओळखून काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली आहे. काँग्रेस सरकारच्या काळात दुष्काळ निवारणासाठी अधिक निधीची गरज असल्यास राज्य सरकारने कर्ज काढण्याची तयारी ठेवावी, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेता येईल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)