शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

सरकारकडून केवळ पोकळ घोषणा

By admin | Updated: September 12, 2015 02:00 IST

राज्यात यंदा अत्यंत कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पिके नष्ट झाल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.

नाशिक : राज्यात यंदा अत्यंत कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पिके नष्ट झाल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. राज्य सरकार मात्र केवळ पोकळ घोषणा करीत असल्याचे टीकास्त्र माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोडले.शेतकरी व जनतेला न्याय मिळण्यासाठी व दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न व्हावा, यासाठी केंद्र सरकाराने राज्याला जास्त निधी द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त साधुग्राममधील एका धार्मिक कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. चव्हाण म्हणाले की, राज्यातील दुष्काळ हा कमी पावसामुळे निर्माण झाला तरी काही प्रमाणात मानवनिर्मितदेखील आहे. राज्य आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी एकाच पक्षाचे सरकार असूनही महाराष्ट्रावर अन्याय होत आहे.बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅकेज जाहीर करतात. त्याचवेळी महाराष्ट्रात मात्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील दुष्काळी भागाची पाहणी करावी आणि पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावून दुष्काळप्रश्नी चर्चा घडवावी. प्रश्नाचे गांभीर्य ओळखून काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली आहे. काँग्रेस सरकारच्या काळात दुष्काळ निवारणासाठी अधिक निधीची गरज असल्यास राज्य सरकारने कर्ज काढण्याची तयारी ठेवावी, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेता येईल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)