शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
3
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
4
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
5
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
6
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
7
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
8
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
11
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
13
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
14
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
15
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
16
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
17
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
18
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
19
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
20
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

सरकारकडून केवळ पोकळ घोषणा

By admin | Updated: September 12, 2015 02:00 IST

राज्यात यंदा अत्यंत कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पिके नष्ट झाल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.

नाशिक : राज्यात यंदा अत्यंत कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पिके नष्ट झाल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. राज्य सरकार मात्र केवळ पोकळ घोषणा करीत असल्याचे टीकास्त्र माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोडले.शेतकरी व जनतेला न्याय मिळण्यासाठी व दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न व्हावा, यासाठी केंद्र सरकाराने राज्याला जास्त निधी द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त साधुग्राममधील एका धार्मिक कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. चव्हाण म्हणाले की, राज्यातील दुष्काळ हा कमी पावसामुळे निर्माण झाला तरी काही प्रमाणात मानवनिर्मितदेखील आहे. राज्य आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी एकाच पक्षाचे सरकार असूनही महाराष्ट्रावर अन्याय होत आहे.बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅकेज जाहीर करतात. त्याचवेळी महाराष्ट्रात मात्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील दुष्काळी भागाची पाहणी करावी आणि पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावून दुष्काळप्रश्नी चर्चा घडवावी. प्रश्नाचे गांभीर्य ओळखून काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली आहे. काँग्रेस सरकारच्या काळात दुष्काळ निवारणासाठी अधिक निधीची गरज असल्यास राज्य सरकारने कर्ज काढण्याची तयारी ठेवावी, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेता येईल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)