शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

केवळ पदवीधर, शिक्षक मतदारसंघच का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 05:29 IST

बदलत्या काळानुसार आता केवळ पदवीधर, शिक्षक मतदारसंघ न ठेवता, समाजातील इतर शिक्षित व अल्पभूधारक शेतकऱ्यांसारख्या घटकांचे मतदारसंघ तयार करण्याची गरज आहे.

-  हेरंब कुलकर्णीबदलत्या काळानुसार आता केवळ पदवीधर, शिक्षक मतदारसंघ न ठेवता, समाजातील इतर शिक्षित व अल्पभूधारक शेतकऱ्यांसारख्या घटकांचे मतदारसंघ तयार करण्याची गरज आहे. त्यासाठी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या जागा कमी कराव्या लागतील. या निवडणुकीत अनेक गैरप्रकार होतात, ते टाळण्यासाठी व दबाव गट तयार करण्यासाठी जनसंघटनांनाच पुढाकार घ्यावा लागेल.विधान परिषद निवडणुकीचे निकाल लागले आहेत. त्यात पैशांचा वापर आणि पदवीधर व शिक्षकांच्या मतदारसंघात राजकीय कार्यकर्तेच आमदार झाल्यामुळे हे मतदारसंघ असावेत का? यावर चर्चा सुरू झाली आहे. काही जण तर विधान परिषदेचीच गरज काय, असे विचारत आहेत. निवडणूक सुधारणा समितीनेही विधान परिषद नसावी, अशीच भूमिका मांडली आहे.विधान परिषद रद्द करण्यासाठी कोणताच पक्ष तयार होणार नाही. कारण असंतुष्ट नेत्यांची सोय लावण्यासाठी तब्बल ७८ जागा मिळतात. विधान परिषदेची तिकिटे धनदांडग्या उमेदवारांना विकून पक्षनिधी व व्यक्तिगत पैसे मिळतात. त्यामुळे व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी जनसंघटनांनाच पुढाकार घ्यावा लागेल. आमदारांचे मानधन, पेन्शन हा सगळा खर्च जनतेसमोर मांडून जनजागृती करावी लागेल. समाजातील विचारी वर्गाला स्थान मिळावे, म्हणून या सभागृहात एकूण २६ जागा आहेत. त्यात १२ जागा कलावंत, विचारवंत, खेळाडू व प्रत्येकी ७ पदवीधर आणि शिक्षक आमदार अशी विभागणी आहे. १२ जागांवर राजकीय नियुक्त्या झाल्याने त्यावर अनेकदा टीका झाली. तो आता चर्चेचाही विषय राहिला नाही, अशी स्थिती आहे. पूर्वी अराजकीय व्यक्ती पदवीधर व शिक्षक आमदार व्हायचे. मात्र, मागील काही निवडणुकींपासून त्यात सरळसरळ राजकीय पक्ष उतरले. किमान शिक्षक मतदारसंघात शिक्षक उमेदवार असावा, एवढी सामान्य अपेक्षाही राजकीय पक्ष आज पूर्ण करीत नाहीत. त्यामुळे या २६ जागा जर राजकीय कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठीच असतील, तर मग हे सभागृह तरी कशासाठी ठेवले आहे? असा उपस्थित केलेला प्रश्न एकदम योग्य वाटतो.आज विधान परिषदमध्ये बहुसंख्य आमदार पदवीधर असताना आणि अगदी ग्रामीण भागातही पदवीधर मतदारांची संख्या वाढलेली असताना, वेगळे पदवीधर आमदार आवश्यक आहेत का? पदवीधर वर्गाचे प्रतिबिंब मोठ्या प्रमाणात उमटल्याने, या मतदारसंघाचे औचित्य संपले आहे. त्यामुळे या सात जागा रद्द करून त्या भरण्याचा स्वतंत्र विचार करण्याची गरज आहे.तोच प्रश्न काही जण शिक्षक मतदारसंघाबाबतही विचारतात. पूर्वी शिक्षक हा एकच संघटित वर्ग होता. त्यामुळे त्याची दखल घेतली गेली. त्यात पुन्हा शिक्षक वर्गाने समाजाचे नेतृत्व करावे, असेही अनुस्यूत होते. आज डॉक्टर, ग्रामसेवक, व्यापारी, शेतकरी असे वेगवेगळे वर्ग मोठ्या संख्येने संघटित झाले आहेत. आता समाजाचे नेतृत्व केवळ शिक्षक नाही, तर अनेक समाज घटक करत आहेत. वकील, व्यावसायिक, पत्रकार प्रभावीपणे मते मांडत असतात. तेव्हा एकट्या शिक्षक वर्गालाच सात जागा कशासाठी? या जागा विभागून वेगवेगळ्या वर्गाला द्या, असा मुद्दा अनेक जण मांडत आहेत. शिक्षकांत प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन व तंत्रशिक्षण असे वर्गीकरण करून त्यांनाही जागा द्यावी. त्याचबरोबर, ग्रामसेवक तलाठी, वैद्यकीय, अंगणवाडी कर्मचारी असे थेट गावपातळीवर काम करणारे प्रतिनिधी असावेत.अल्पभूधारक शेतकरी वर्गालाही जागा असावी. हे सारे मतदारसंघ फिरते ठेवले, तर त्यातून सर्व भागांतील लोकांना न्याय मिळेल. विधान परिषदेच्या १२ जागा पत्रकार, लेखक, कलावंत यांनाच दिल्या, तर तो वर्गही सभागृहात येऊ शकेल. शिक्षक आमदार फक्त वेतन व सुट्टी एवढेच मुद्दे मांडतात. ते केवळ शिक्षकांना खूश करण्याचा प्रयत्न करतात, असे आढळते. तरीही या जागा रद्द कराव्यात, असे म्हणणार नाही. कारण शिक्षणातील प्रश्न यातून सोडविले जाऊ शकतात. शिक्षकांसोबत पालकही मतदार केले पाहिजेत. शाळेतील पालक संघाच्या अध्यक्षाला मतदानाचा अधिकार दिला पाहिजे. या निवडणुकीत पैठणी, पैसे वाटणे हे गैरप्रकार घडले. त्याबाबत मी स्वत: निवडणूक आयोगाकडे तक्रार केली.प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा अधिकार नाही. राज्यातील साडेचार लाख प्राथमिक शिक्षक, विना अनुदानित शाळा, इंग्रजी माध्यमातील शिक्षक व पालकांनाही मतदार केले, तर मतदारांची संख्या वाढेल. मग मतदार विकत घेण्याचे प्रमाण कमी होईल. शिक्षणातून नैतिकता उंचावत नाही, हेच पुन्हा निवडणुकीतून अधोरेखित झाले. ती उंचावायची कशी, हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.(लेखक शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत.)

टॅग्स :Electionनिवडणूक