शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

पाच हजार लोकांसाठी केवळ दोन टँकर

By admin | Updated: April 24, 2016 02:52 IST

ग्रामस्वच्छता अभियानात गावाला यशाचे तोरण बांधणाऱ्या, तसेच जलस्वराज्य योजनेच्या माध्यमातून गावासाठी शाश्वत पाण्यासाठी झगडणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी

- दयानंद काळुंखे, अणदूर (जि. उस्मानाबाद)

ग्रामस्वच्छता अभियानात गावाला यशाचे तोरण बांधणाऱ्या, तसेच जलस्वराज्य योजनेच्या माध्यमातून गावासाठी शाश्वत पाण्यासाठी झगडणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी गावावर आज मोठे जलसंकट ओढवले आहे. या ग्रामपंचायतीअंतर्गत खुदावाडी गावासह तीन तांडे आणि एका वस्तीचा समावेश असून, येथील एकूण पाच हजार लोकसंख्येची तहान केवळ दोन टँकरवर भागविली जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांना रानोमाळ भटकंती करून पाण्याचा शोध घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे.शिवारातील शेतीलाच नव्हे, तर माणसाला प्यायला पाणी नाही. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न तितकाच गंभीर बनला आहे. मार्च अखेरीस गावात दीड हजार ते अठराशे पशुधन होते, ते आता हजाराच्या आसपास आले आहे. दहा-पंधरा दिवसांतून एक वेळा पाणी उपलब्ध होत आहे. गावात दोन जुने आड असून, सर्वांना समान पाणी मिळावे या उद्देशाने टँकरचे पाणी या आडात टाकून रहाटाद्वारे ते शेंदून घ्यावे लागत आहे, तसेच गावच्या शेजारी असलेल्या एका ३५ फूट खोल विहिरीतील अस्वच्छ पाणी महिला कपडे धुण्यासाठी वापरत आहेत. मजुरांची भटकंतीमनरेगा अंतर्गत येथे जवळपास दीडशे मजुरांच्या हाताला काम उपलब्ध झाले होते, परंतु ते बंद होऊन आता सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. आता कोणतीच कामे सुरू नसल्याने जवळपास सहाशे मजूर रोजगारासाठी भटकंती करीत असल्याचे चित्र आहे. गावात चारा डेपो निमारण झाल्यास किमान मुक्या जनावरांची तहान-भूक भागविणे शक्य होईल. दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन शिवारात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ओढे, नाल्याचे सरळीकरण, खोलीकरण करण्याचे नियोजन असून, यासाठी आतापर्यंत एक लाख रुपयांचा लोकवाटा जमा झाल्याचे समाजसेवक डॉ. सिद्रामप्पा खजुरे यांनी सांगितले.खुदावाडी येथील साठवण तलावातील पाच विहिरीतील गाळ काढून त्यातील पाणी एकत्रित करून ते गावाला पुरविले जात होते. सध्या मंजूर झालेल्या टंचाई निधीतून साठवण तलावातील विहिरीचे काम सुरू असल्याचे सरपंच रेवणसिद्ध स्वामी यांनी सांगितले.