शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार लोकांसाठी केवळ दोन टँकर

By admin | Updated: April 24, 2016 02:52 IST

ग्रामस्वच्छता अभियानात गावाला यशाचे तोरण बांधणाऱ्या, तसेच जलस्वराज्य योजनेच्या माध्यमातून गावासाठी शाश्वत पाण्यासाठी झगडणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी

- दयानंद काळुंखे, अणदूर (जि. उस्मानाबाद)

ग्रामस्वच्छता अभियानात गावाला यशाचे तोरण बांधणाऱ्या, तसेच जलस्वराज्य योजनेच्या माध्यमातून गावासाठी शाश्वत पाण्यासाठी झगडणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी गावावर आज मोठे जलसंकट ओढवले आहे. या ग्रामपंचायतीअंतर्गत खुदावाडी गावासह तीन तांडे आणि एका वस्तीचा समावेश असून, येथील एकूण पाच हजार लोकसंख्येची तहान केवळ दोन टँकरवर भागविली जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांना रानोमाळ भटकंती करून पाण्याचा शोध घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे.शिवारातील शेतीलाच नव्हे, तर माणसाला प्यायला पाणी नाही. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न तितकाच गंभीर बनला आहे. मार्च अखेरीस गावात दीड हजार ते अठराशे पशुधन होते, ते आता हजाराच्या आसपास आले आहे. दहा-पंधरा दिवसांतून एक वेळा पाणी उपलब्ध होत आहे. गावात दोन जुने आड असून, सर्वांना समान पाणी मिळावे या उद्देशाने टँकरचे पाणी या आडात टाकून रहाटाद्वारे ते शेंदून घ्यावे लागत आहे, तसेच गावच्या शेजारी असलेल्या एका ३५ फूट खोल विहिरीतील अस्वच्छ पाणी महिला कपडे धुण्यासाठी वापरत आहेत. मजुरांची भटकंतीमनरेगा अंतर्गत येथे जवळपास दीडशे मजुरांच्या हाताला काम उपलब्ध झाले होते, परंतु ते बंद होऊन आता सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. आता कोणतीच कामे सुरू नसल्याने जवळपास सहाशे मजूर रोजगारासाठी भटकंती करीत असल्याचे चित्र आहे. गावात चारा डेपो निमारण झाल्यास किमान मुक्या जनावरांची तहान-भूक भागविणे शक्य होईल. दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन शिवारात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ओढे, नाल्याचे सरळीकरण, खोलीकरण करण्याचे नियोजन असून, यासाठी आतापर्यंत एक लाख रुपयांचा लोकवाटा जमा झाल्याचे समाजसेवक डॉ. सिद्रामप्पा खजुरे यांनी सांगितले.खुदावाडी येथील साठवण तलावातील पाच विहिरीतील गाळ काढून त्यातील पाणी एकत्रित करून ते गावाला पुरविले जात होते. सध्या मंजूर झालेल्या टंचाई निधीतून साठवण तलावातील विहिरीचे काम सुरू असल्याचे सरपंच रेवणसिद्ध स्वामी यांनी सांगितले.