शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेला विकासकांचीच चिंता

By admin | Updated: September 24, 2016 04:00 IST

नवी मुंबई महापालिका विकासकांच्या दबावाखाली येऊन २००८ चे पार्किंग धोरण अमलात आणत नाही.

मुंबई : नवी मुंबई महापालिका विकासकांच्या दबावाखाली येऊन २००८ चे पार्किंग धोरण अमलात आणत नाही. या धोरणामुळे विकासकांचे व अधिकाऱ्यांचा हित साधता येणार नसल्याने नवी मुंबई महापालिका या धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबत उदासीन आहे. घरे बांधण्यास विकासकांना प्रोत्साहन द्यावे, मात्र अधिक घरे याचा अर्थ विकासकांचा अधिक विकास, असा होत नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेला खडे बोल सुनावले.नवी मुंबई महापालिकेच्या २००८ च्या पार्किंग धोरणानुसार, प्रत्येक ३५ चौ.मी. कार्पेट एरियामागे एक कार गृहीत धरली आहे. मात्र २००८ पासून या धोरणाची अंमलबजावणीच करण्यात येत नाही. २०११ मध्ये खुद्द राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव टी. सी. बेंजामिन यांनीही नवी मुंबई महापालिकेला सहा महिन्यांत संबंधित धोरणाची अंमलबजावणी करण्याचा आदेश देऊनही महापालिका त्याची पूर्तता करणे टाळत आहे. याविरुद्ध नवी मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती.महापालिकेच्या वकिलांनी सध्या चार घरांमागे एक कार, असे धोरण अस्तित्वात असल्याचे खंडपीठाला सांगितले. त्यावर उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. ‘महापालिकेच्या या धोरणामुळे रस्त्यांवर गाड्या दिसतात, कोंडी होते. नागरिकांना वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. तुमच्या या वृत्तीमुळे संबंधित परिसर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात वाहतूककोंडी होते. तुम्हाला नागरिकांची चिंता नाही,’ अशा शब्दांत कोर्टाने फटकारले. (प्रतिनिधी) >विकास करण्यासाठी तुमची स्थापना करण्यात आली. मात्र तुम्ही विकासकांचा विकास करण्यात मश्गुल आहात. सामान्यांचा विकास करण्यासाठी विकासकांना घरे बांधण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे, पण याचा अर्थ केवळ त्यांचाच विकास करणे, असा होत नाही. तुम्ही विकासकांच्या दबावाखाली येऊन या योजनेची अंमलबजावणी करत नसल्याचे दिसून येते. खुद्द मुख्य सचिवांनी आदेश देऊनही तुम्ही काहीच केले नाही, यावरून तुमचा हेतू स्पष्ट होतो, अशा शब्दांत महापालिकेला खडसावत उच्च न्यायालयाने तत्काळ या धोरणाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्याचे संकेत महापालिकेला दिले.