शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई राज्यातील एकमेव स्वच्छ शहर

By admin | Updated: August 9, 2015 00:43 IST

संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांतर्गत दोन वेळा राज्य सरकारचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविणाऱ्या नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

नवी मुंबई : संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांतर्गत दोन वेळा राज्य सरकारचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविणाऱ्या नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या देशातील शंभर शहरांच्या यादीत नवी मुंबईने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. तर स्वच्छतेच्या यादीतील हे राज्यातील एकमेव शहर ठरले आहे.केंद्रीय शहर विकास मंत्रालयाने स्वच्छ भारत मोहिमेला मिळालेल्या यशाची चाचपणी करण्यासाठी देशातील ४७६ शहरांची पाहणी केली. या पाहणीनंतर टॉप १०० शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत नवी मुंबई हे शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर या यादीत समाविष्ट झालेले महाराष्ट्रातील हे एकमेव शहर ठरले आहे. त्यामुळे येथील नागरी सोयी-सुविधांचा दर्जा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. प्रशस्त रस्ते, घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन, सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी अत्याधुनिक यंत्रणा, दैनंदिन कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने हाताळणी, चोवीस तास पाणीपुरवठा आदी सुविधांची देशपातळीवर वारंवार दखल घेतली गेली आहे. इतकेच नव्हे, तर आतापर्यंत विविध पुरस्काराने महापालिकेचा सन्मान करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांतर्गत राज्यातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून नवीमुंबई महापालिकेला सन्मान प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे अलीकडेच राज्य सरकारच्या स्मार्ट सिटी उपक्रमासाठी निवडक १० शहरांमध्ये नवी मुंबईची निवड झाली आहे. त्यापाठोपाठ आता स्वच्छतेच्या बाबतीत देशात तिसरे व महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचे शहर म्हणून नवी मुंबईला बहुमान प्राप्त झाला आहे. देशातील १०० टॉप स्वच्छ शहरांची निवड करताना केंद्रीय विकास मंत्रालयाने सार्वजनिक ठिकाणे, सार्वजनिक सेवा तसेच तेथील स्वच्छता, पाणी व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, कचऱ्याचे व्यवस्थापन, सरकारी इमारती व परिसराची स्वच्छता आदींची पाहणी केली. त्यानंतर स्वच्छतेच्या बाबतीतील शहरांची क्रमवारी निश्चित करण्यात आली. या सर्व निकषात नवी मुंबई महापालिकेने बाजी मारली. दरम्यान, देशातील तिसऱ्या व राज्यातील पहिल्या क्रमांकाचे शहर म्हणून नवी मुंबईला बहुमान प्राप्त झाला आहे. समस्त नवी मुंबईकरांसाठी ही बाब अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया महापौर सुधाकर सोनवणे आणि महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)अव्वल ठरलेली दहा शहरेस्वच्छतेच्या बाबतीत म्हैसूर (कर्नाटक), तिरुचिरापल्ली (तामिळनाडू), नवी मुंबई (महाराष्ट्र), कोची (केरळ), हसन (कर्नाटक), मंड्या (कर्नाटक), बेंगळुरू (कर्नाटक), तिरुअनंतपुरम (केरळ), हलीसाहर (पश्चिम बंगाल) आणि गंगटोक (सिक्कीम) ही दहा शहरे देशात अव्वल ठरली आहेत. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या यादीत बेंगळुरूने शहरांच्या राजधानी गटात तर म्हैसूरने अन्य शहरांच्या गटात अव्वल स्थान पटकाविले आहे. पश्चिम बंगालच्या २५ शहरांनी या टॉप १०० मध्ये स्थान मिळविले आहे. महाराष्ट्रातून नवी मुंबई हे एकमेव शहर या यादीत समाविष्ट झाले आहे.