शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

महाराष्ट्रात फक्त ५४ टक्के सातबारांचेच डिजिटायझेशन

By admin | Updated: February 3, 2017 01:58 IST

महाराष्ट्रात फक्त ५४ टक्के सातबारांचेच डिजिटलीकरण करणे आतापर्यंत शक्य झाले आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली.

मुंबई : महाराष्ट्रात फक्त ५४ टक्के सातबारांचेच डिजिटलीकरण करणे आतापर्यंत शक्य झाले आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली. ३१ मार्चपर्यंत राज्यातील सर्व सातबारांचे डिजिटलीकरण केले जाईल, अशी घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डिसेंबरमध्ये केली होती. तथापि, या कामाची सध्याची गती पाहता घोषणेप्रमाणे मार्चअखेरपर्यंत हे काम पूर्ण होणे अशक्य आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, या कामात अनेक अडथळे आहेत. निकृष्ट इंटरनेट उपलब्धता, कुशल मनुष्यबळाचा अभाव आणि पायाभूत सोयींचा अभाव यांचा त्यात समावेश आहे. डिजिटलीकरण मोहिमेला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण इतर घटक या कामाच्या प्रगतीवर परिणाम करीत आहेत. सातबारा हा शेतीच्या मालकीचा दस्तावेज आहे. कर्ज करार, पीक सर्वेक्षण आणि सरकारी सुविधांचा लाभ घेण्यासाठी सातबाराचा वापर प्रामुख्याने केला जातो. काही वर्षांपूर्वीपर्यंत हातांनी लिहिलेला सातबारा तलाठ्यांकडून शेतकऱ्यांना मिळत होता. सातबारात फेरबदल करण्याचा अधिकार फक्त तलाठ्यांनाच आहे. त्याचा फायदा घेऊन तलाठ्यांनी अनेक घोळ केल्याचे प्रकारही घडत आले आहेत. या घटना टाळण्यासाठी सरकारने सातबारांचे संपूर्ण डिजिटलीकरण करण्याची योजना आणली आहे. दस्तावेजात छेडछाड टाळणे हाही एक उद्देश त्यामागे आहे. प्राप्त माहितीनुसार, डिजिटलीकरणाला गती देण्यासाठी अनेक तरतुदी सरकारकडून करण्यात आल्या आहेत. आॅप्टिकल फायबरचे नेटवर्क उभारणे, उच्च गतीचे इंटरनेट कनेक्शन उपलब्ध करून देणे आणि तलाठ्यांना लॅपटॉप उपलब्ध करून देणे, याचा त्यात समावेश आहे. ठरवून दिलेल्या कायमर्यादेत हे उद्दिष्ट गाठणे शक्य होणार नाही. तथापि, आम्ही ते नक्की गाठू, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.