शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
4
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
5
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
6
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
7
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
8
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
9
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
10
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
11
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
12
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
13
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
14
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
15
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
16
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
17
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
18
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
19
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
20
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर

महाराष्ट्रात फक्त ५४ टक्के सातबारांचेच डिजिटायझेशन

By admin | Updated: February 3, 2017 01:58 IST

महाराष्ट्रात फक्त ५४ टक्के सातबारांचेच डिजिटलीकरण करणे आतापर्यंत शक्य झाले आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली.

मुंबई : महाराष्ट्रात फक्त ५४ टक्के सातबारांचेच डिजिटलीकरण करणे आतापर्यंत शक्य झाले आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली. ३१ मार्चपर्यंत राज्यातील सर्व सातबारांचे डिजिटलीकरण केले जाईल, अशी घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डिसेंबरमध्ये केली होती. तथापि, या कामाची सध्याची गती पाहता घोषणेप्रमाणे मार्चअखेरपर्यंत हे काम पूर्ण होणे अशक्य आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, या कामात अनेक अडथळे आहेत. निकृष्ट इंटरनेट उपलब्धता, कुशल मनुष्यबळाचा अभाव आणि पायाभूत सोयींचा अभाव यांचा त्यात समावेश आहे. डिजिटलीकरण मोहिमेला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण इतर घटक या कामाच्या प्रगतीवर परिणाम करीत आहेत. सातबारा हा शेतीच्या मालकीचा दस्तावेज आहे. कर्ज करार, पीक सर्वेक्षण आणि सरकारी सुविधांचा लाभ घेण्यासाठी सातबाराचा वापर प्रामुख्याने केला जातो. काही वर्षांपूर्वीपर्यंत हातांनी लिहिलेला सातबारा तलाठ्यांकडून शेतकऱ्यांना मिळत होता. सातबारात फेरबदल करण्याचा अधिकार फक्त तलाठ्यांनाच आहे. त्याचा फायदा घेऊन तलाठ्यांनी अनेक घोळ केल्याचे प्रकारही घडत आले आहेत. या घटना टाळण्यासाठी सरकारने सातबारांचे संपूर्ण डिजिटलीकरण करण्याची योजना आणली आहे. दस्तावेजात छेडछाड टाळणे हाही एक उद्देश त्यामागे आहे. प्राप्त माहितीनुसार, डिजिटलीकरणाला गती देण्यासाठी अनेक तरतुदी सरकारकडून करण्यात आल्या आहेत. आॅप्टिकल फायबरचे नेटवर्क उभारणे, उच्च गतीचे इंटरनेट कनेक्शन उपलब्ध करून देणे आणि तलाठ्यांना लॅपटॉप उपलब्ध करून देणे, याचा त्यात समावेश आहे. ठरवून दिलेल्या कायमर्यादेत हे उद्दिष्ट गाठणे शक्य होणार नाही. तथापि, आम्ही ते नक्की गाठू, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.