शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

‘मजीप्रा’तील निवृत्तांसाठी केवळ चार कोटींची तरतूद

By admin | Updated: March 13, 2017 04:14 IST

महिनोंगणती प्रतीक्षा करूनही ‘मजीप्रा’तील सेवानिवृत्तांच्या हाती पूर्ण रक्कम पडणार नसल्याची स्थिती आहे. १५ कोटी रुपयांची गरज असताना केवळ चार

यवतमाळ : महिनोंगणती प्रतीक्षा करूनही ‘मजीप्रा’तील सेवानिवृत्तांच्या हाती पूर्ण रक्कम पडणार नसल्याची स्थिती आहे. १५ कोटी रुपयांची गरज असताना केवळ चार कोटी रुपये एवढीच अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. परिणामी या सेवानिवृत्तांना आर्थिक टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कार्यरत व सेवानिवृत्त, अशा १५ हजार कर्मचाऱ्यांचा आर्थिक प्रश्न गंभीर झालेला आहे. कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना नियमित लाभासाठी शासनाशी भांडावे लागत आहे. एवढेच नाही तर, न्यायालयाचेही दार ठोठावण्यात आले आहे. मे २०१६ ते जानेवारी २०१७ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना उपदान आणि अंशराशीकरणाची रक्कम देण्यात आलेली नाही. सेवानिवृत्ती वेतनाच्या फाईलींवर धूळ वाढत आहे.मागील दहा महिन्याच्या काळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम देण्यासाठी १५ कोटी रुपयांची गरज आहे. अंशदान, उपदान, सेवानिवृत्ती वेतन आदी आर्थिक लाभाचा यामध्ये समावेश आहे. शिवाय ८० आणि ८० पेक्षा अधिक वयोमानाच्या सेवानिवृत्तीधारकांना १० टक्के निवृत्ती वेतन वाढीसाठी वार्षिक एक कोटी २७ लाख रुपयांची आवश्यकता आहे. वास्तविक कर्मचाऱ्यांना अंशदान आणि उपदानाचे लाभ सेवानिवृत्तीच्या दिवशीच दिले जातात. परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याला अपवाद ठरत आहे. शिपाई ते कार्यकारी अभियंता या सेवानिृत्तांना आर्थिक झळा सोसाव्या लागत आहे. शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाला उत्तर द्यावे लागणार असल्याने तोकड्या उपाययोजना शासनाकडून केल्या जात आहे. झालेली चार कोटी सात लाख रुपयांची तरतूदही त्यातीलच प्रकार असल्याची ओरड आहे. (प्रतिनिधी)