शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ३ टक्के उपयुक्त जलसाठा

By admin | Updated: February 14, 2016 02:32 IST

मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणातील उपयुक्त जलसाठा फेब्रुवारी महिन्यातच ३ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने पावसाळ्यापर्यंत करायचे काय़़, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

औरंगाबाद : मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणातील उपयुक्त जलसाठा फेब्रुवारी महिन्यातच ३ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने पावसाळ्यापर्यंत करायचे काय़़, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठवाड्यातील अन्य सहा प्रकल्पांची अवस्था तर आणखी भीषण झाली असून, त्यांचा उपयुक्त जलसाठा शून्य टक्क्यावर आला आहे. मराठवाड्यात ११ मोठी धरणे आहेत. विभागातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पात सद्य:स्थितीत केवळ ७५ दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा आहे. जायकवाडी धरणाची क्षमता २ हजार १७१ दशलक्ष घनमीटर आहे. मागील आठवड्यात जायकवाडीत ९९ द.ल.घ.मी. उपयुक्त पाणीसाठा होता. आठ दिवसांत पाणीसाठ्यात झपाट्याने घट होऊन तो ७५ द.ल.घ.मी.पर्यंत खाली आला आहे. हा जलसाठा केवळ ३ टक्के असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे मागील ५ वर्षांतील जायकवाडीत १२ फेब्रुवारीची उपयुक्त जलसाठ्याची आकडेवारी पाहिली असता २०१३ मध्ये ९५ द.ल.घ.मी. उपयुक्त जलसाठा होता. २०११मध्ये धरणाच्या ऊर्ध्व भागात मुबलक पाऊस झाल्याने जायकवाडीत ५३.१५ टक्के पाणी होते. २०१२मध्ये ३१.२२ टक्के जलसाठा होता. २०१४मध्ये १९.४३ टक्के उपयुक्त पाणी होते आणि गतवर्षी २०१५मध्ये जायकवाडीत ५१४ द.ल.घ.मी. म्हणजे २४ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. येलदरी (जि.परभणी) प्रकल्पात ६ टक्के, ऊर्ध्व पेनगंगा (जि. यवतमाळ)मध्ये १९ टक्के, विष्णुपुरी (जि.नांदेड) धरणात २१ टक्के तर निम्न दुधना (जि. परभणी) धरणात २५ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. (प्रतिनिधी)मृत साठ्यातून पाणीपुरवठा!मराठवाड्यातील सिद्धेश्वर (जि. हिंगोली), माजलगाव (बीड), मांजरा प्रकल्प, निम्न तेरणा (जि. उस्मानाबाद) आणि नांदेड जिल्ह्यातील निम्न मनार धरणातील उपयुक्त जलसाठा मागील आठवड्यातच संपलेला आहे. त्यामुळे या धरणांवर अवलंबून असलेल्या गावांना मृत साठ्यातून पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.