शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

‘महाराष्ट्र भूषण’ कार्यक्रमास केवळ २५० निमंत्रित !

By admin | Updated: August 18, 2015 02:18 IST

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना राज्य शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरून वादळ उठल्याने येत्या बुधवारी होणाऱ्या या पुरस्कार सोहळ््यास केवळ २५० व्यक्तींनाच

मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना राज्य शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरून वादळ उठल्याने येत्या बुधवारी होणाऱ्या या पुरस्कार सोहळ््यास केवळ २५० व्यक्तींनाच निमंत्रणे देण्यात आली आहेत. या कार्यक्रमात केवळ मुंबईतील आमदारांना निमंत्रित केले असून पुरंदरे यांना पुरस्कार देण्यास विरोध करणारे ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही या सोहळ््याकरिता बोलावले नसल्याचे समजते. तर, लिखाणाबाबत स्पष्टता येत नाही तोपर्यंत पुरंदरे यांनीही हा पुरस्कार नम्रपणे नाकारावा, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित केला होता. मात्र पुरंदरे यांना पुरस्कार देण्यास विविध संघटना, शरद पवार, भालचंद्र नेमाडे, राधाकृष्ण विखे पाटील, तसेच उदयनराजे भोसले अशा अनेकविध व्यक्तींनी विरोध केल्याने आता हा कार्यक्रम राजभवनावर होणार आहे. या ठिकाणी जास्तीत जास्त २५० व्यक्ती बसू शकतील, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली.या निमंत्रितांमध्ये कुणाचा समावेश आहे, असे विचारले असता केवळ मंत्री व मुंबईतील आमदार, खासदार यांना निमंत्रित केले जाईल, असे स्पष्ट केले. साहित्यिकांमध्ये मतांतरयंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून साहित्यिकांमध्ये मतमतांतरे आहेत. अवघ्या दोन दिवसांवर पुरस्कार वितरण सोहळा येऊन ठेपला असतानाच आता हा वाद उच्च न्यायालयात पोहोचला आहे. महत्त्वाचे म्हणजे, पुरस्कार वितरण सोहळ््याच्या दिवशीच सकाळी या प्रकरणी सुनावणी होईल.पुरस्कार योग्यच ! सत्तेत जे सरकार आहे, ते आपण निवडून दिलेले आहे. त्यामुळे त्यांनी दिलेला पुरस्कार योग्यच आहे. या पुरस्काराला विरोध करणाऱ्यांनी त्यांची भूमिका साहित्यातून मांडावी. शिवशाहीरांच्या लेखणीतून जे चुकीचे मांडले आहे, ते न पाहता त्यांनी केलेल्या चांगल्या कार्याचा हा गौरव या दृष्टीकोनातून पाहावे. - शेषराव मोरे, साहित्यिक, विश्व मराठी साहित्य संमेलनाध्यक्षवादाला शासनच कारणीभूतएखाद्या पुरस्कारावरुन एवढा वादंग निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे समाजात असंतोष निर्माण झाल्यावर याविषयी शासनाने उत्तर देणे अपेक्षित आहे. पुरस्कार जाहीर झाला म्हणजे जबाबदारीसंपत नाही. शासन काहीच बोलत नाही,म्हणजेच शासनाला समाजात तेढच हवी आहे, असे दिसते आहे. -राजन खान, साहित्यिकनियुक्तीमागे सारासार विचार नाहीसमितीने पुरंदरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करताना सारासार विचार केला आहे का? या नियुक्तीमागे पक्षीय राजकारणाची शक्यताही नाकारता येत नाही. तटस्थपणे विचार केला नसल्याने हा वाद उफाळला आहे. आता तरी शासनाने आपले मौन सोडले पाहिजे.- रामदास भटकळ, साहित्यिकविरोध करणे चुकीचेइतिहास लेखनात रोमँटिक हिस्ट्री आणि सीरिअस हिस्ट्री असे प्रकार असतात. त्यामुळे ‘इतिहासकार’ या गटात शिवशाहीर मोडत नाहीत. त्यामुळे त्यांच्या लिखाणातून माझ्यासह अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. त्यामुळे हा पुरस्कार त्यांना देण्यात काही गैर नाही. विरोध करणे चुकीचे आहे. - अरुण टिकेकर, साहित्यिक-ज्येष्ठ पत्रकारसरकारने पुरंदरेंचा पुरस्कार रद्द करावा - विखे पाटीलबाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर केलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जनतेचा विरोध पाहता राज्य सरकारने रद्द करावा. पुरंदरे यांनी जो इतिहास लिहिला, तो नेहमीच वादग्रस्त ठरला. यात शिवाजी महाराजांच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेला तडा जाईल, असा उल्लेख केला गेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरुन आजपर्यंत कोणताही वाद झाला नाही, मात्र पुरंदरे यांना पुरस्कार देण्याचा सर्वच स्तरांतून विरोध दर्शवला जात आहे. हा या पुरस्काराचा अवमान आहे. जोपर्यंत आरोपाचे खंडन होत नाही तोपर्यंत पुरंदरे यांनी हा पुरस्कार स्वीकारू नये.बाळासाहेब विखेंचाही विरोधबाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्य सरकारने स्थगित ठेवावा अथवा यावरून निर्माण झालेल्या वादातून तोडगा काढण्यासाठी मार्ग काढावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी केली.उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्रबाबासाहेब पुरंदरे यांनी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या काही लेखनासंबंधात फार मोठ्या प्रमाणात आक्षेप जाहीरपणे घेतले जात आहेत. याात तथ्य असल्याचे आमचेही मत आहे. त्यामुळे या संपूर्ण आक्षेपांची तपासणी करून, जोपर्यंत सोक्षमोक्ष लागत नाही, तोपर्यंत पुरंदरे यांना जाहीर झालेला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार स्थगित ठेवावा, असे परखड मत शिवरायांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात व्यक्त केले. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले आहे.(विशेष प्रतिनिधी)