शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

राज्यात १४ दिवसांत अवघी १६ वाहने दोषी

By admin | Updated: August 31, 2015 00:45 IST

शासनाच्या परिपत्रकानुसार सरकारी तसेच अन्य वाहनांच्या टपावर असणाऱ्या अंबर अथवा डोम लाइटचा नियम पाळला जात नसल्याने त्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय परिवहन आयुक्तालयाने घेतला

मुंबई : शासनाच्या परिपत्रकानुसार सरकारी तसेच अन्य वाहनांच्या टपावर असणाऱ्या अंबर अथवा डोम लाइटचा नियम पाळला जात नसल्याने त्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय परिवहन आयुक्तालयाने घेतला. त्यानुसार १ आॅगस्टपासून १४ दिवसांची विशेष कारवाई मोहीम हाती घेण्यात आली. मात्र परिवहन आयुक्त कार्यालयाकडून फक्त सहा आरटीओचीच माहिती उपलब्ध करतानाच यात १४ दिवसांत १६ वाहने दोषी असल्याचे सांगितले. तर अन्य आरटीओची माहिती उपलब्ध करण्यात आली नाही. आॅगस्ट महिना संपत आला तरी राज्यातील अन्य आरटीओंकडून कारवाईची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाने घेतलीच नसल्याचे समोर आले आहे.अधिकाऱ्यांच्या किंवा खाजगी वाहनांवर शासनाच्या परिपत्रकानुसार लाल, अंबर अथवा निळ्या रंगाचा डोम लाइट लावण्यात येतो. मात्र यात नियमांना बगल देऊन त्याचा चुकीचा वापर केला जातो. सुविधा दिलेले मान्यवर किंवा अधिकारी हे वाहनांचा वापर करीत नसतील, त्यावेळी वाहनचालकांनी दिव्याचा वापर न करता दिवा काळ्या रंगाचा आवरणाने झाकून ठेवण्याच्याही सूचना परिपत्रकात आहेत. परंतु या सर्वच नियमांना बगल देण्यात येत असल्याचे परिवहन आयुक्त कार्यालयाच्या निदर्शनास आले आणि १ आॅगस्ट ते १४ आॅगस्टपर्यंत वाहनांच्या टपावरील दिव्यांची तपासणी मोहीम हाती घेतली. यात दोषी असणाऱ्या वाहनांवर कारवाईही करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील ५0 प्रादेशिक परिवहन कार्यालये आणि उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत १४ दिवस ही मोहीम चालली. मात्र या मोहिमेत राज्यातील सहा आरटीआेंतर्गत झालेल्या कारवाईची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाने देत १६ वाहने दोषी आढळल्याचे सांगितले. एकूण ६३ वाहनांची तपासणी करण्यात आली. दोषी आढळलेल्या वाहनांमध्ये मुंबई पूर्व आणि पश्चिम आरटीओंतर्गत ९, कोल्हापूरमध्ये २ आणि नागपूर शहर आरटीओंतर्गत ५ वाहने दोषी आढळले आहेत. तर मुंबई मध्य आणि पनवेल आरटीओंतर्गत केलेल्या वाहन तपासणीत कोणतेही वाहन दोषी आढळले नसल्याचे सांगण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील ५0 आरटीओंतर्गत कारवाई होऊनही फक्त सहा आरटीओंचीच माहिती उपलब्ध करण्यात आल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आॅगस्ट महिना संपत आला तरी अन्य आरटीओंकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती घेतली नसल्यानेच १४ दिवसांची माहिती उपलब्ध झाली.याबाबत परिवहन आयुक्त कार्यालयांतील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता यावर सर्वांनीच बोलण्यास नकार दिला. सध्या शासकीय वाहनांना अंबर दिवा बसवण्यासाठी आॅगस्ट २0१३ च्या अध्यादेशानुसार गव्हर्नमेन्ट ट्रान्सपोर्ट सर्व्हिस किंवा मोटर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसकडूनच हे दिवे बसवून घ्यावे लागतात. त्याशिवाय कुठल्याही आॅटोमोबाइल असलेल्या खासगी दुकानदार किंवा व्यापाऱ्याकडून हे दिवे घेणे नियबाह्य आहे. परंतु हा नियमही धाब्यावर बसवला जात आहे.