शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

शुल्कवाढ फक्त १५ टक्के

By admin | Updated: April 25, 2017 02:52 IST

खासगी शाळांच्या मनमानी शुल्कवाढीला चाप लावण्याच्या दृष्टीने शिक्षण विभाग सरसावला आहे. शुल्कवाढीच्या नियमानुसार

मुंबई : खासगी शाळांच्या मनमानी शुल्कवाढीला चाप लावण्याच्या दृष्टीने शिक्षण विभाग सरसावला आहे. शुल्कवाढीच्या नियमानुसार दर दोन वर्षांनी कमाल १५ टक्के इतकीच शुल्कवाढ करता येईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी खडसावले. ही वाढ करताना पालक-शिक्षक संघटनेची (पीटीए) मान्यताही आवश्यक आहे. मात्र हा निमय मोडणाऱ्या शाळांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.शुल्काव्यतिरिक्त शाळेतूनच अन्य वस्तू खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या शाळांची मान्यता काढून घेण्यात येईल, असा इशाराही तावडे यांनी दिला आहे. केंद्रीय बोर्डाच्या शाळांच्या पाठ्यपुस्तकाचा प्रश्न पालक आणि शाळांनी बोलून स्पष्ट करावा, असे त्यांनी सांगितले. काही पालकांच्या म्हणण्यानुसार केंद्रीय बोर्डाची पुस्तके ही बाजारात उपलब्ध नसतात. त्यामुळे त्या शाळांनी आणि पालकांनी हा निर्णय घ्यावा, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. पुढच्या शैक्षणिक वर्षासाठीही शाळांनी शुल्कवाढ केल्याने पालकांनी अलीकडेच शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले होते. अखेर पालकांना सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.(प्रतिनिधी)

मनमानीला चाप गेल्या काही वर्षांत खासगी शाळांची मनमानी वाढते आहे. भरमसाठ शुल्कवाढ दरवर्षी केली जाते. त्यामुळे पालकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतल्यावर शालेय शिक्षणमंत्र्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.