शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
5
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
6
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
7
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
8
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
9
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
10
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
11
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
12
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
13
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
14
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
15
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
16
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
17
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
18
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
19
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
20
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे

शुल्कवाढ फक्त १५ टक्के

By admin | Updated: April 25, 2017 02:52 IST

खासगी शाळांच्या मनमानी शुल्कवाढीला चाप लावण्याच्या दृष्टीने शिक्षण विभाग सरसावला आहे. शुल्कवाढीच्या नियमानुसार

मुंबई : खासगी शाळांच्या मनमानी शुल्कवाढीला चाप लावण्याच्या दृष्टीने शिक्षण विभाग सरसावला आहे. शुल्कवाढीच्या नियमानुसार दर दोन वर्षांनी कमाल १५ टक्के इतकीच शुल्कवाढ करता येईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी खडसावले. ही वाढ करताना पालक-शिक्षक संघटनेची (पीटीए) मान्यताही आवश्यक आहे. मात्र हा निमय मोडणाऱ्या शाळांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.शुल्काव्यतिरिक्त शाळेतूनच अन्य वस्तू खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या शाळांची मान्यता काढून घेण्यात येईल, असा इशाराही तावडे यांनी दिला आहे. केंद्रीय बोर्डाच्या शाळांच्या पाठ्यपुस्तकाचा प्रश्न पालक आणि शाळांनी बोलून स्पष्ट करावा, असे त्यांनी सांगितले. काही पालकांच्या म्हणण्यानुसार केंद्रीय बोर्डाची पुस्तके ही बाजारात उपलब्ध नसतात. त्यामुळे त्या शाळांनी आणि पालकांनी हा निर्णय घ्यावा, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. पुढच्या शैक्षणिक वर्षासाठीही शाळांनी शुल्कवाढ केल्याने पालकांनी अलीकडेच शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले होते. अखेर पालकांना सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.(प्रतिनिधी)

मनमानीला चाप गेल्या काही वर्षांत खासगी शाळांची मनमानी वाढते आहे. भरमसाठ शुल्कवाढ दरवर्षी केली जाते. त्यामुळे पालकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतल्यावर शालेय शिक्षणमंत्र्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.