शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभराच्या पेयजलाची सोय अवघ्या १५ दिवसांत

By admin | Updated: April 29, 2016 03:15 IST

वसईतील पाली गावातील फेलिक्स मच्याडो (८५ वर्षे) यांच्या बोअरिंगला १८ वर्षांपूर्वी खारे पाणी लागले.

शशी करपे,

वसई- वसईतील पाली गावातील फेलिक्स मच्याडो (८५ वर्षे) यांच्या बोअरिंगला १८ वर्षांपूर्वी खारे पाणी लागले. पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था नव्हती. त्यांनी एक भन्नाट कल्पना लढवली. पावसाचे पाणी मोठ्या टँकमध्ये भरले आणि वर्षभर पिण्यासाठी त्याच पाण्याचा वापर केला. तेव्हापासून मच्याडो कुटुंबीय पावसाचेच पाणी पिऊन तहान भागवत आहेत. यंदा आॅगस्टपर्यंत पुरेल इतका पिण्याच्या पाण्याचा साठा त्यांच्या घरात आहे. पाली गाव खाडीपासून जवळ असल्याने विहिरी आणि बोअरिंगला खारे पाणी येते. त्यामुळे पाणीटंचाई नेहमीच भेडसावते. फेलिक्स यांनी पावसाचे पाणी साठवले आणि त्यांचा प्रयोग यशस्वी ठरला. बंगल्याच्या कौलावर पडणारे पावसाचे पाणी पाइपद्वारे खाली आणून कॉटनच्या कपड्याने गाळून अंगणातील मोठ्या टाक्यांमध्ये जमा केले जाते. त्यानंतर टाक्या सील करून सावलीत ठेवण्यात येतात. अवघ्या दहा-पंधरा दिवसांत वर्षभर पुरेल इतका आठ ते दहा हजार लीटर पिण्याच्या पाण्याचा साठा होतो. मग वर्षभर हेच पाणी उकळून पिण्यासाठी वापरले जाते. >१०-१५ दिवसांची मेहनतपाणी भरण्यासाठी फक्त १०-१५ दिवस थोडी मेहनत घ्यावी लागते. पावसाळा सुुरू झाला की पहिल्या १५-२० दिवसांत कौले साफ होतात. त्यानंतर पाणी साठवण्याच्या कामाला सुरुवात केली जाते. मुसळधार पाऊस पडेल तेव्हाच पाणी साठवण्याचे काम केले जाते. मग, कधी कधी त्यासाठी रात्र जागवावी लागते. >मच्याडो यांची खंत ही योजना यशस्वीपणे राबवली जात असली तरी त्याचे कुणीही अनुकरण करायला तयार नाही. अनेक नातेवाइकांना पटवून देऊनही कुणी रस दाखवला नाही, अशी खंत मच्याडो यांनी व्यक्त केली. आमच्या घरच्यांना मात्र या पाण्याशिवाय दुसरे पाणी गोड लागत नाही, असेही मच्याडो सांगतात.