शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
5
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
6
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
7
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
8
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
9
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
10
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
11
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
12
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
13
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
14
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
15
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
16
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
17
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
18
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
19
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
20
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?

वर्षभराच्या पेयजलाची सोय अवघ्या १५ दिवसांत

By admin | Updated: April 29, 2016 03:15 IST

वसईतील पाली गावातील फेलिक्स मच्याडो (८५ वर्षे) यांच्या बोअरिंगला १८ वर्षांपूर्वी खारे पाणी लागले.

शशी करपे,

वसई- वसईतील पाली गावातील फेलिक्स मच्याडो (८५ वर्षे) यांच्या बोअरिंगला १८ वर्षांपूर्वी खारे पाणी लागले. पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था नव्हती. त्यांनी एक भन्नाट कल्पना लढवली. पावसाचे पाणी मोठ्या टँकमध्ये भरले आणि वर्षभर पिण्यासाठी त्याच पाण्याचा वापर केला. तेव्हापासून मच्याडो कुटुंबीय पावसाचेच पाणी पिऊन तहान भागवत आहेत. यंदा आॅगस्टपर्यंत पुरेल इतका पिण्याच्या पाण्याचा साठा त्यांच्या घरात आहे. पाली गाव खाडीपासून जवळ असल्याने विहिरी आणि बोअरिंगला खारे पाणी येते. त्यामुळे पाणीटंचाई नेहमीच भेडसावते. फेलिक्स यांनी पावसाचे पाणी साठवले आणि त्यांचा प्रयोग यशस्वी ठरला. बंगल्याच्या कौलावर पडणारे पावसाचे पाणी पाइपद्वारे खाली आणून कॉटनच्या कपड्याने गाळून अंगणातील मोठ्या टाक्यांमध्ये जमा केले जाते. त्यानंतर टाक्या सील करून सावलीत ठेवण्यात येतात. अवघ्या दहा-पंधरा दिवसांत वर्षभर पुरेल इतका आठ ते दहा हजार लीटर पिण्याच्या पाण्याचा साठा होतो. मग वर्षभर हेच पाणी उकळून पिण्यासाठी वापरले जाते. >१०-१५ दिवसांची मेहनतपाणी भरण्यासाठी फक्त १०-१५ दिवस थोडी मेहनत घ्यावी लागते. पावसाळा सुुरू झाला की पहिल्या १५-२० दिवसांत कौले साफ होतात. त्यानंतर पाणी साठवण्याच्या कामाला सुरुवात केली जाते. मुसळधार पाऊस पडेल तेव्हाच पाणी साठवण्याचे काम केले जाते. मग, कधी कधी त्यासाठी रात्र जागवावी लागते. >मच्याडो यांची खंत ही योजना यशस्वीपणे राबवली जात असली तरी त्याचे कुणीही अनुकरण करायला तयार नाही. अनेक नातेवाइकांना पटवून देऊनही कुणी रस दाखवला नाही, अशी खंत मच्याडो यांनी व्यक्त केली. आमच्या घरच्यांना मात्र या पाण्याशिवाय दुसरे पाणी गोड लागत नाही, असेही मच्याडो सांगतात.