शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

राज्यातील धरणांत अवघा १४ टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 05:52 IST

औरंगाबाद विभागात ठणठणाट : मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा

पुणे : राज्यातील धरणसाठ्यात वेगाने घट होत असून, पुणे, कोकण, नागपूर आणि औरंगाबाद विभागातील पाणी पातळीत मोठी घट नोंदविण्यात आली आहे. राज्यात अवघा १४ टक्के पाणीसाठा असून, औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये अवघे ३ टक्के पाणी शिल्लक आहे.

राज्यातील तापमानाचा पारा पुन्हा चाळीशीपार गेला असून, विदर्भ आणि मराठवाड्यातील कमाल तापमान तर ४२ ते ४६ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. गेल्या २६ दिवसांमध्ये राज्यातील उपयुक्त साठ्यात २९० अब्ज घन फुटांवरून (टीएमसी) २०२.१३ टीएमसीपर्यंत घट झाली आहे.

जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १ हजार ४४४ टीएमसी आहे. मंगळवार अखेरीस अमरावतीत २१.२२ टक्के, औरंगाबाद २.९२, कोकण ३४.७८, नागपूर ९.०६, नाशिक १३.७५ आणि पुणे विभागामध्ये १४.१५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी राज्यात याच कालावधीत २५.२५ टक्के पाणीसाठा होता. नागपूर विभागाचा (१२.८९ टक्के) अपवाद वगळता गेल्या वर्षी सर्वच विभागात २० टक्क्यांच्यावर पाणीसाठा होता. गेल्यावर्षी शेवटच्या टप्प्यात मान्सूनने पाठ फिरविली होती. यंदाही पावसाची सरासरी कमी असेल असा पहिला अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. जून महिन्यामध्ये हवामान विभागाचा दुसरा अंदाज जाहीर होईल. अंदमानात मान्सून दाखल झाला असून केरळात तो महिनाअखेरीस दाखल होण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रवासावर पाण्याचे नियोजनही अवलंबून राहणार आहे.बहुतांश जिल्ह्यांत तापमान चाळीशीपुढे असून, विदर्भात ते ४५च्या घरात आहे. या वातावरणामध्ये पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढतो. जून महिन्यात पावसाचा जोर कमी राहणार असून, सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी राहील. राज्यात १० जूनपर्यंत कमाल तापमान असेच असेल. या काळात बाष्पीभवनाचा वेगही अधिक असणार आहे. त्यानुसार उपलब्ध पाण्याचे नियोजन करावे लागेल. - जीवनप्रकाश कुलकर्णी, हवामान तज्ज्ञ.विभाग उपयुक्त २१ मे अखेरीसपाणीसाठा पाणीसाठाअमरावती १४८.०६ ३१.४१औरंगाबाद २६०.३१ ७.७२कोकण १२३.९४ ४३.१०नागपूर १६२.६७ १४.७३नाशिक २१२ २९.१४पुणे ५३७.१२ ७६एकूण १४४४.१३ २०२.१३