शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

राज्यातील धरणांत अवघा १४ टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 05:52 IST

औरंगाबाद विभागात ठणठणाट : मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा

पुणे : राज्यातील धरणसाठ्यात वेगाने घट होत असून, पुणे, कोकण, नागपूर आणि औरंगाबाद विभागातील पाणी पातळीत मोठी घट नोंदविण्यात आली आहे. राज्यात अवघा १४ टक्के पाणीसाठा असून, औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये अवघे ३ टक्के पाणी शिल्लक आहे.

राज्यातील तापमानाचा पारा पुन्हा चाळीशीपार गेला असून, विदर्भ आणि मराठवाड्यातील कमाल तापमान तर ४२ ते ४६ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. गेल्या २६ दिवसांमध्ये राज्यातील उपयुक्त साठ्यात २९० अब्ज घन फुटांवरून (टीएमसी) २०२.१३ टीएमसीपर्यंत घट झाली आहे.

जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १ हजार ४४४ टीएमसी आहे. मंगळवार अखेरीस अमरावतीत २१.२२ टक्के, औरंगाबाद २.९२, कोकण ३४.७८, नागपूर ९.०६, नाशिक १३.७५ आणि पुणे विभागामध्ये १४.१५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी राज्यात याच कालावधीत २५.२५ टक्के पाणीसाठा होता. नागपूर विभागाचा (१२.८९ टक्के) अपवाद वगळता गेल्या वर्षी सर्वच विभागात २० टक्क्यांच्यावर पाणीसाठा होता. गेल्यावर्षी शेवटच्या टप्प्यात मान्सूनने पाठ फिरविली होती. यंदाही पावसाची सरासरी कमी असेल असा पहिला अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. जून महिन्यामध्ये हवामान विभागाचा दुसरा अंदाज जाहीर होईल. अंदमानात मान्सून दाखल झाला असून केरळात तो महिनाअखेरीस दाखल होण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रवासावर पाण्याचे नियोजनही अवलंबून राहणार आहे.बहुतांश जिल्ह्यांत तापमान चाळीशीपुढे असून, विदर्भात ते ४५च्या घरात आहे. या वातावरणामध्ये पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढतो. जून महिन्यात पावसाचा जोर कमी राहणार असून, सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी राहील. राज्यात १० जूनपर्यंत कमाल तापमान असेच असेल. या काळात बाष्पीभवनाचा वेगही अधिक असणार आहे. त्यानुसार उपलब्ध पाण्याचे नियोजन करावे लागेल. - जीवनप्रकाश कुलकर्णी, हवामान तज्ज्ञ.विभाग उपयुक्त २१ मे अखेरीसपाणीसाठा पाणीसाठाअमरावती १४८.०६ ३१.४१औरंगाबाद २६०.३१ ७.७२कोकण १२३.९४ ४३.१०नागपूर १६२.६७ १४.७३नाशिक २१२ २९.१४पुणे ५३७.१२ ७६एकूण १४४४.१३ २०२.१३