शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

राज्यातील धरणांत अवघा १४ टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 05:52 IST

औरंगाबाद विभागात ठणठणाट : मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा

पुणे : राज्यातील धरणसाठ्यात वेगाने घट होत असून, पुणे, कोकण, नागपूर आणि औरंगाबाद विभागातील पाणी पातळीत मोठी घट नोंदविण्यात आली आहे. राज्यात अवघा १४ टक्के पाणीसाठा असून, औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये अवघे ३ टक्के पाणी शिल्लक आहे.

राज्यातील तापमानाचा पारा पुन्हा चाळीशीपार गेला असून, विदर्भ आणि मराठवाड्यातील कमाल तापमान तर ४२ ते ४६ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. गेल्या २६ दिवसांमध्ये राज्यातील उपयुक्त साठ्यात २९० अब्ज घन फुटांवरून (टीएमसी) २०२.१३ टीएमसीपर्यंत घट झाली आहे.

जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १ हजार ४४४ टीएमसी आहे. मंगळवार अखेरीस अमरावतीत २१.२२ टक्के, औरंगाबाद २.९२, कोकण ३४.७८, नागपूर ९.०६, नाशिक १३.७५ आणि पुणे विभागामध्ये १४.१५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी राज्यात याच कालावधीत २५.२५ टक्के पाणीसाठा होता. नागपूर विभागाचा (१२.८९ टक्के) अपवाद वगळता गेल्या वर्षी सर्वच विभागात २० टक्क्यांच्यावर पाणीसाठा होता. गेल्यावर्षी शेवटच्या टप्प्यात मान्सूनने पाठ फिरविली होती. यंदाही पावसाची सरासरी कमी असेल असा पहिला अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. जून महिन्यामध्ये हवामान विभागाचा दुसरा अंदाज जाहीर होईल. अंदमानात मान्सून दाखल झाला असून केरळात तो महिनाअखेरीस दाखल होण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रवासावर पाण्याचे नियोजनही अवलंबून राहणार आहे.बहुतांश जिल्ह्यांत तापमान चाळीशीपुढे असून, विदर्भात ते ४५च्या घरात आहे. या वातावरणामध्ये पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढतो. जून महिन्यात पावसाचा जोर कमी राहणार असून, सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी राहील. राज्यात १० जूनपर्यंत कमाल तापमान असेच असेल. या काळात बाष्पीभवनाचा वेगही अधिक असणार आहे. त्यानुसार उपलब्ध पाण्याचे नियोजन करावे लागेल. - जीवनप्रकाश कुलकर्णी, हवामान तज्ज्ञ.विभाग उपयुक्त २१ मे अखेरीसपाणीसाठा पाणीसाठाअमरावती १४८.०६ ३१.४१औरंगाबाद २६०.३१ ७.७२कोकण १२३.९४ ४३.१०नागपूर १६२.६७ १४.७३नाशिक २१२ २९.१४पुणे ५३७.१२ ७६एकूण १४४४.१३ २०२.१३