शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नात्यांमध्ये ‘आॅनलाईन’ छळवणुकीचा ‘व्हायरस’

By admin | Updated: July 14, 2014 08:48 IST

हल्ली केवळ मोठ्या शहरांतच नव्हे तर अगदी ग्रामीण

‘सायबर क्राईम’ची आकडेवारी : एकचतुर्थांश गुन्हे ‘ई-छेडखानी’चे योगेश पांडे  नागपूरहल्ली केवळ मोठ्या शहरांतच नव्हे तर अगदी ग्रामीण भागात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. युवापिढीसाठी तर इंटरनेट दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक आहे. परंतु ‘ई-क्रांती’सोबतच ‘सायबर क्राईम’च्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. बहुतांश प्रकरणे समोर येतच नसली तरी सरकारी आकडेवारीनुसार ‘आॅनलाईन’ माध्यमातून छेडखानी किंवा छळवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे बऱ्याच प्रकरणांत गुन्हेगार हे जवळील नातेवाईक किंवा परिचित व्यक्ती असल्याचे निदर्शनास आले आहे. जवळच्या नात्यांमध्ये अशाप्रकारे छळवणुकीचा ‘व्हायरस’ ही भविष्यातील एक मोठी समस्या बनण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.‘एनसीआरबी’ने (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो)२०१३ सालात झालेल्या ‘सायबर क्राईम’संदर्भातील आकडेवारी जारी केली आहे. संपूर्ण राज्यात २०१३ सालात ‘सायबर क्राईम’अंतर्गत ९०७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. यापैकी जवळपास २६ टक्के म्हणजेच २३३ गुन्हे हे ‘आॅनलाईन’ छेडखानी किंवा छळवणुकीचे आहेत. राज्यात अशाप्रकारच्या गुन्ह्यांची टक्केवारी एकचतुर्थांश असली तरी, मुंबईत हे प्रमाण १७ टक्के इतकेच आहे. परंतु पुण्यात २७ तर नागपुरात ४० टक्के सायबर’ गुन्हे हे वरील प्रकारात मोडतात. ९०७ पैकी १७४ गुन्ह्यांत (१९ टक्के) गुन्हेगार हे नात्यातील, शेजारी राहणारे किंवा ओळखीतील व्यक्ती असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. उपराजधानीत ४० टक्के गुन्हे ‘ई’ छेडखानीचेदेशातील इतर मोठ्या शहरांप्रमाणे नागपुरात ‘सायबर क्राईम’ची प्रकरणे समोर यायला लागली आहेत. २०१३ सालात नागपुरात ‘सायबर क्राईम’अंतर्गत २३ गुन्हे दाखल करण्यात आले. यातील नऊ गुन्हे हे आर्थिक फसवणुकीचे असून, तेवढेच गुन्हे हे ‘आॅनलाईन’ छेडखानी किंवा छळवणुकीचे आहेत. २३ पैकी १८ प्रकरणांमध्ये गुन्हे करणारी व्यक्ती ही नात्यातील किंवा परिचयाचीच असल्याचे आढळून आले आहे. २३ प्रकरणांमध्ये केवळ दोन व्यक्तींनाच अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.राज्यात ५४ टक्के ‘सायबर’ गुन्हेगार तरुण दरम्यान,‘सायबर क्राईम’अंतर्गत संपूर्ण देशात सर्वात जास्त गुन्हेगारांना जेरबंद करण्यात महाराष्ट्र पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या ४२६ गुन्हेगारांपैकी २३१ जण हे तिशीच्या आतीलच आहेत. १७ गुन्हेगार तर चक्क १८ वर्षांखालील आहेत.