शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

आॅनलाइन ७/१२ नोंदीमुळे शेतकरी त्रस्त

By admin | Updated: November 3, 2016 01:35 IST

सात-बारा उताऱ्यावरील चुकांच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणारी ‘ओडीयू २ ओल्ट डाटा अपडेशन’ ही प्रणाली चार महिन्यांपासून बंद पडली

केंदूर : सात-बारा उताऱ्यावरील चुकांच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणारी ‘ओडीयू २ ओल्ट डाटा अपडेशन’ ही प्रणाली चार महिन्यांपासून बंद पडली आहे. त्यामुळे काही हजार सात-बारा उताऱ्यांचे दुरुस्ती काम बंद आहे. एनआयसी (नॅशनल इन्फामेट्रिक सेंटर) महसूल कर्मचाऱ्यांच्या वादात जमीनमालक भरडले जात आहेत. भूमिअभिलेख विभागाने ई-फेरफार योजना हाती घेतली आहे. गेल्या चार वर्षांपासून या योजनेचे कामकाज सुरू आहे; मात्र यातील अडचणी सुटण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. ई-फेरफार या योजनेचे संगणक प्रणालीचे काम एनआयसीला देण्यात आले आहे. मात्र, संगणकीय तांत्रिक त्रुटी दूर करण्यात अद्यापही प्रशासनला (एनआयसीला) यश आलेले नाही. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. मध्यंतरी सात-बारा उताऱ्यावरील दुरुस्तीसाठी एनआयसीने ‘एडिट मॉडेल’ ही सुविधा उपलब्ध केली; परंतु या पद्धतीने सात-बारा उताऱ्यावरील दुरुस्ती वेळखाऊ आहे. त्यामुळे ‘ओडियू २’ या पद्धतीने तलाठ्याकडून जागेवर सात-बारा उताऱ्यांची दुरुस्ती केली जाते; परंतु जुलै महिन्यानंतरही ती दुरुस्त होऊ शकलेली नाही. त्यामुळे सात-बारा उताऱ्यावरील नावातील दुरुस्ती, खातेविभागणी, एकत्रीकरण आदींचे काम थांबले आहे. या संदर्भात चौकशी केल्यानंतर ‘आमच्या यंत्रणेत कोणताही दोष नाही, असे उत्तर एनआयसीकडून दिले जाते, तर ही यंत्रणा बंद असल्यामुळे सात-बारा उताऱ्यात दुरुस्ती होऊ शकत नाही, असे उत्तर तलाठ्यांकडून दिले जात आहे. (वार्ताहर)लवकरात लवकर सुधारणा करावीआॅनलाइन कामकाजाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.परंतु, यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करावी. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष बंटी ढोकले व सामाजिक कार्यकर्ते संग्राम ढोकले यांनी सांगितले आहे.