शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

कांद्याला पुन्हा ‘अच्छे दिन’ येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 04:23 IST

राज्यात यंदा कांद्याचे उत्पन्न सरासरीपेक्षा कमी झाले आहे. त्यातच राजस्थान आणि मध्य प्रदेशातील कांदा प्रचंड उष्णतेमुळे खराब झाला

पुणे : राज्यात यंदा कांद्याचे उत्पन्न सरासरीपेक्षा कमी झाले आहे. त्यातच राजस्थान आणि मध्य प्रदेशातील कांदा प्रचंड उष्णतेमुळे खराब झाला. त्यामुळे सध्या मागणीच्या तुलनेत बाजारात कांद्याची आवक कमी असून, दरामध्ये वाढ होत आहे. रविवारी येथील बाजार समितीत कांद्याला प्रति १० किलोला १०० ते १३० रुपये दर मिळाला.जून संपत आला असताना अजून पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप कांद्याची लागवड लांबली आहे. नवीन कांदा बाजारात दाखल होण्यास उशीर होणार आहे़ त्यामुळे आगामी काळात कांद्याचे दर वाढण्याची शक्यता असल्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले़ तामिळनाडूतील सांबार कांद्याचे उत्पादन घटले आहे. त्यातच राजस्थानातील कांद्याचे व्यापारी महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये येऊन कांदा साठवणीसाठी चाचपणी करत आहेत़ त्यामुळे कांद्यात हळूहळू तेजी येऊ लागली आहे़राज्यातील कांदा केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल व ओडिशा येथे पाठविला जात आहे. रमजान महिन्याचे उपवास संपल्यानंतर कांद्याला मागणी वाढली असून आगामी काळात दर घटण्याची शक्यता कमी आहे.