शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

कांदा व्यापार्‍यांचा बंद मागे; आजपासून लिलाव

By admin | Updated: June 18, 2014 14:05 IST

पणन मंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या आश्‍वासनानंतर जिल्ह्यात दोन दिवसांपासून व्यापार्‍यांनी सुरू केलेला बंद मागे घेतला आहे.

 

नाशिक: पणन मंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या आश्‍वासनानंतर जिल्ह्यात दोन दिवसांपासून व्यापार्‍यांनी सुरू केलेला बंद मागे घेतला आहे. चर्चेअंती आहे त्या परिस्थितीत कामकाज सुरू करण्याचा निर्णय व्यापार्‍यांनी घेतला असल्याने जिलतील सर्व बाजार समित्यांचे लिलाव उद्यापासून नियमितपणे सुरू होत आहेत; मात्र १0 जुलैपर्यंत लेव्हीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली न काढल्यास ११ जुलैपासून पुन्हा लिलाव बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
लेव्हीचे वाढविण्यात आलेले दर, सर्व बाजार समित्यांतील तफ ावत व पणन मंडळाच्या वतीने 'नो वर्क, नो वेज' याबाबत काढण्यात आलेल्या परिपत्रकावरून संतप्त होत जिलतील कांदा व्यापार्‍यांनी जिलतील सर्व १४ बाजार समित्यांमधील लिलाव सोमवारपासून बंद केले होते. याबाबत आज जुना आग्रारोडवरील जिल्हा बँकेच्या सभागृहात पणन मंडळाचे अधिकारी, व्यापारी प्रतिनिधी, माथाडी नेते, कामगार उपआयुक्त, बाजार समितीचे पदाधिकारी यांची बैठक होऊन यावर चर्चा झाली. व्यापारी प्रतिनिधी सोहनलाल भंडारी व नंदकुमार डागा यांनी लेव्ही प्रश्नावरून व विविध बाजार समितीत असलेल्या वेगळ्या दरांबाबत नाराजी व्यक्त केली. जिल्हा निबंधक कार्यालयाच्या वतीने 'नो वर्क, नो वेज'बाबत परिपत्रक काढले असून, याची अंमलबजावणी न केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे व्यापारी अडचणीत आले असल्याने हा बंद पुकारण्यात आल्याचे सांगितले. 'प्रथम हे प्रश्न सोडवा, मगच लिलाव सुरू करू', अशी भूमिका त्यांनी घेतली. या संपामध्ये माथाडी कामगारांचा समावेश नाही. यामध्ये कामगारांचे नाव घेतले जात आहे याचा निषेध कामगार प्रतिनिधींनी केला. व्यापारी तसेच माथाडी कामगार केवळ आपले हित पाहत आहेत. 
कांद्याचे बाजार वाढले नाही; मात्र लेव्ही वाढत आहे. यामुळे शेतकर्‍यांना मोठय़ा समस्यांना सामोरे जावे लागते त्यांचा विचार करावा, अशी भूमिका आमदार शिरीष कोतवाल व दिलीप बनकर यांनी मांडली.
पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी १३ जूनलाच सर्वांची बैठक घेत सर्व बाजार समित्यांमधील सर्व प्रश्न १५ दिवसांत मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले आहे. परंतु चार दिवसांतच व्यापर्‍यांनी लिलाव बंद करणे चुकीचे असल्याचे सांगत पणन मंडळाचे कार्यकारी संचालक मिलिंद आकरे यांनी नाराजी व्यक्त केली. लेव्हीसह सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्हाला १0 जुलैपर्यंत मुदत देण्याची विनंती त्यांनी केल्यानंतर अखेर व्यापार्‍यांनी आहे त्या परिस्थितीत लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला.
या बैठकीला आमदार शिरीष कोतवाल, आमदार दिलीप बनकर, नाशिक पणन मंडळाचे उप सहव्यवस्थापक सी. एम. बारी, कामगार उपआयुक्त आर. एस. जाधव, सहकामगार आयुक्त के.व्ही. दैफ ळकर, माथाडी बोर्ड निरीक्षक पी.एस. सोनवणे, पी. एच. चव्हाण, जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे, राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस प्रकाश शिंदे, सुनील यादव, कृष्णा जगदाळे आदि उपस्थित होते.
 
कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व बाजार समित्यांची पाहणी पणन मंडळाच्या समितीच्या वतीने करण्यात येत आहेत. कोणत्याही परिस्थितीत १५ दिवसांत शासनाला याचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. यानंतर लेव्ही व बाजार समित्यांचे इतर प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात येणार आहेत. यामुळे आता व्यापारी किंवा कामगार अशा कोणत्याही घटकाने संप पुकारून शेतकर्‍यांचे नुकसान करू नये. 
- मिलिंद आकरे, 
कार्यकारी संचालक, पणन मंडळ, पुणे