शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चासाठी कांदा मार्केट बंद राहणार!

By admin | Updated: September 20, 2016 03:09 IST

कोकण भवनवर २१ सप्टेंबरला होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी एपीएमसीमधील कांदा - बटाटा मार्केट बंद ठेवण्यात येणार

नवी मुंबई : कोकण भवनवर २१ सप्टेंबरला होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी एपीएमसीमधील कांदा - बटाटा मार्केट बंद ठेवण्यात येणार आहे. इतर मार्केटमधीलही माथाडी कामगार व व्यापारी मोर्चात सहभागी होणार असून एपीएमसीमधून ट्रक, कार व मोटारसायकल रॅलीने सर्व जण मोर्चात सहभागी होणार आहेत. रायगड जिल्ह्यातील मराठा समाजाचा मोर्चा कोकणभवनवर काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये नवी मुंबईमधील मराठा समाजाच्या सर्व संघटना, व्यापारी, कामगार यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. वाशीतील मराठा भवन व एपीएमसीच्या माथाडी भवनमध्ये झालेल्या नियोजन बैठकीला शेकडो नागरिकांनी हजेरी दाखविली होती. याशिवाय सानपाडा, नेरूळ, सीवूड व इतर शहरात सर्वच नोडमध्ये मराठा समाजातील नागरिकांनी बैठका घेवून सर्वांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. माथाडी कायद्याचे जनक अण्णासाहेब पाटील यांनी मराठा महासंघाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी चळवळ उभी केली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे त्यांचे स्वप्न होते. यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बहुतांश सर्व माथाडी कामगार कोकणभवनवर काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होणार आहेत. कांदा - बटाटा मार्केटमधील व्यापाऱ्यांनी स्वत:हून मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये मार्केटमधून १५० मोटारसायकल, २०० कार व २० ट्रकची रॅली एपीएमसीमधून आंदोलनस्थळापर्यंत रॅली काढली जाणार आहे. खारघर उत्सव चौकातून सर्वजण पायी कोकणभवनपर्यंत मूक मोर्चात सहभागी होणार आहेत. माथाडी कामगारांप्रमाणे शहरातील मराठा समाजाच्या सर्व संघटना, बांधकाम व्यावसायिक, डॉक्टर, वकील व इतर घटकांनी मोर्चाच्या तयारीसाठी बैठका सुरू केल्या आहेत. नवी मुंबईमधून एक लाखपेक्षा जास्त नागरिकांनी मोर्चासाठी उपस्थित राहावे यासाठी तयारी सुरू केली आहे. प्रत्येक नागरिकाने मोर्चात सहभागी व्हावे यासाठी सोशल मीडियातून आवाहन केले जात आहे. नागरिकांनी फोन करून व घरोघरी जावूनही मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून ग्रुप तयार करूनही मोर्चाच्या तयारीविषयी माहिती दिली जात आहे. राज्यभर होत असलेल्या मोर्चातील गर्दीचे व्हिडीओ व छायाचित्र पाठवून सहभागी होण्याचे आवाहन केले जात असल्याने कोकण भवनमधील मोर्चामध्येही प्रचंड गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)>मोर्चासाठी जय्यत तयारीमराठा क्रांती मोर्चासाठी येणारी वाहने उभी करण्यापासून ते मोर्चा शिस्तबद्धपणे काढण्यासाठीची तयारी सुरू आहे. शेकडो स्वयंसेवक यासाठी प्रयत्न करत आहेत. मोर्चासाठी कडक आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. कुठेही घोषणाबाजी केली जावू नये. मोर्चाचे गांभीर्य जाईल अशाप्रकारे वर्तन कोणीही करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.