शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

कांद्याचे वाटोळे !

By admin | Updated: July 4, 2014 06:15 IST

कोणतीही पर्यायी व्यवस्था व हमीभाव न देता बाजार समितीच्या कायद्यातून मुक्तता करत कांदा-बटाट्याचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश केल्याने महागाईवर नियंत्रण येईल का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे

योगेश बिडवई , मुंबईकोणतीही पर्यायी व्यवस्था व हमीभाव न देता बाजार समितीच्या कायद्यातून मुक्तता करत कांदा-बटाट्याचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश केल्याने महागाईवर नियंत्रण येईल का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. शहरी मतदारांवर डोळा ठेवून सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे कांदा उत्पादकांचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही, असा संताप शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. बाजार समिती कायद्यातून कांदा मुक्त करून त्याची खुल्या बाजारात विक्री करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. मात्र त्याबाबतचे आदेश राज्याच्या पणन विभागाला गुरुवारी संध्याकाळपर्यंत मिळालेले नव्हते. पणन विभागाच्या कार्यालयात विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कार्यालयातून फोन येत होते. फेब्रुवारी, मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे कांद्याचे नुकसान झाले. आता अपुऱ्या पावसामुळे कांद्याची नव्याने लागवड झालेली नाही. मात्र देशभर कांदा पोहोचविण्याची सरकारी व्यवस्था अधिक मजबूत करण्यापेक्षा किमान निर्यात मूल्य प्रतिटनामागे ५०० डॉलर करणे आणि बाजार समितीच्या कायद्यातून कांदा मुक्त करण्याने त्याचे दर कमी होतील, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. कांदा बाजार समितीत नाही विकायचा मग कोठे विकायचा, असा सवाल चांदवडचे शेतकरी प्रकाश जाधव यांनी केला आहे. ते म्हणाले, व्यापारी बांधावर आमचा कांदा खरेदी करतील, पण आम्हाला पूर्ण दाम देण्याची हमी कोण देणार? पैसे बुडल्यास कोणाकडे दाद मागायची. यासाठी काही पर्यायी व्यवस्था निर्माण केली आहे का? कांदा मुक्त करणे म्हणजे केवळ फुकाच्या गप्पा आहेत, असेही जाधव म्हणाले. गेल्या वर्षीपर्यंत १२०० रुपये किलो असणारे कांद्याचे बियाणे आता ३,५०० रुपयांवर गेले आहे. खते, औषधांचे दर तिप्पट झाले. पेट्रोल, डिझेल महागले आहेत. त्यामुळे कांद्याचे भाव चार पैशाने वाढले असतील, तर एवढा गदारोळ का, असा सवाल निफाडचे कांदा उत्पादक जनार्दन जगताप यांनी केला.