शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

जो देशाला तोडेल, त्याला मी फोडेन!

By admin | Updated: May 2, 2017 04:55 IST

भाजपा सरकार संविधान बदलणार, अशा खोट्या आरोळ्या विरोधक देत असतात. मग मी कशाला तिथे आहे? डॉ. बाबासाहेबांच्या

पनवेल : भाजपा सरकार संविधान बदलणार, अशा खोट्या आरोळ्या विरोधक देत असतात. मग मी कशाला तिथे आहे? डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच देश आहे. जो देशाला तोडेल, त्याला मी फोडेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर सामाजिक न्याय मंत्रालयाची जबाबदारी दिली असून, वाटेल ते झाले, तरी मी समाजाला न्याय देणार, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी के ले.खारघर येथे रविवारी प्रीती ठोकळे यांनी आयोजित महापुरु षांच्या संयुक्त जयंती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्र माला माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर हेही उपस्थित होते. रामदास आठवले यांनी आपल्या काव्यमय विनोदी शैलीत, तर कधी गंभीर होत उपस्थितांची मने जिंकली. भाजपा सरकारच्या नोटाबंदीचे जोरदार समर्थन आठवले यांनी केले. जेव्हा क्र ांती होते, तेव्हा त्रास होतोच, असे सांगितले. याचा अर्थ, एटीएमच्या लाइनमध्ये उभ्या असलेल्या जनतेला त्रास व्हावा, असे नाही, तर सर्वांना सांगून हा निर्णय घेतला असता, तर काय झाले असते ते सर्वांना माहीत आहेच. त्यामुळे केंद्र सरकारने तडकाफडकी निर्णय घेतला ते योग्यच केले, असे ते म्हणाले. ‘भीम’ अ‍ॅपची नवी संकल्पना केंद्र सरकारने सुरू केली असून, तिचाही लाभ घ्या, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारके उभी करायला घेतली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘महासत्ता भारत’ बनवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली समर्थ महाराष्ट्र घडवायचा आहे, असे आ. प्रशांत ठाकू र यांनी सांगितले. या कार्यक्र माला आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, भाजपा ज्येष्ठ नेते अभिमन्यू पाटील, शंकर ठाकूर, अनंता तोडेकर, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष लीना गरड, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)देशाविरोधात लढणाऱ्यांच्या मी नेहमीच विरोधात उभा राहिलो आहे. सध्या सुरू करण्यात आलेले ‘भीम’ अ‍ॅप ही केंद्र सरकारची नवी संकल्पना अतिशय चांगली आहे. उपयुक्त आहे. त्यामुळे तिचा वापर सर्वांनी करायलाच हवा, असे आवाहनही आठवले यांनी या वेळी केले.