शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी एकच निविदा - रावते

By admin | Updated: July 28, 2016 04:32 IST

राज्यातील सर्व बसस्थानके आणि आगारांच्या स्वच्छतेसाठी एकच निविदा काढण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत केली.

मुंबई : राज्यातील सर्व बसस्थानके आणि आगारांच्या स्वच्छतेसाठी एकच निविदा काढण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत केली. सकाळी सभागृहाच्या विशेष सत्रात अर्धा तास चर्चा घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे ख्वाजा बेग यांनी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील बसस्थानकाच्या दुरावस्थेचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना रावते म्हणाले की, राज्यातील अस्वच्छ बसस्थानकांमुळे प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे लवकरात लवकर एकच निविदा काढून स्वच्छतेची कामे केली जातील. तसेच तंबाखूमुक्त एसटीसाठी यापूर्वीच स्थानकांवरील तंबाखू विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, विक्रेत्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी त्यांना अन्य वस्तू विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. तसेच बस चालक, वाहक आणि एस.टी. कर्मचा-यांना तंबाखू न खाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे रावते म्हणाले. राज्यात ५५६ बसस्थानकांच्या नुतनीकरणाचा निर्णय घेण्यात आला असून टप्याटप्याने ही कामे केली जातील. तसेच चालक-वाहक आणि कर्मचा-यांच्या सोयीसाठी आगार परिसरात विश्रामगृहाची उत्तम सोय करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता या पुढील सर्व कामे एस.टी. महामंडळाकडून करण्याचे धोरण राबविण्यात येणार असून बांधा वापरा आणि हस्तांतरित करा योजना रद्द केल्याचे रावते यांनी स्पष्ट केले. तर, आर्णी बसस्थानकासाठी ४४ लाख ५६ हजार ५५६ रुपये प्रस्तावित खर्च असून स्थानकातील रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. या कामाला लवकरच सुरुवात होईल, असेही रावते म्हणाले. (प्रतिनिधी)