शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

एक रुपया पर्यावरणासाठी !

By admin | Updated: March 11, 2015 03:39 IST

निसर्ग, पर्यावरण, जलस्त्रोत, वने आणि शेती या मुलभूत स्त्रोतांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात आजवरच्या इतिहासातील सर्वात कमी तरतू

पुणे : निसर्ग, पर्यावरण, जलस्त्रोत, वने आणि शेती या मुलभूत स्त्रोतांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात आजवरच्या इतिहासातील सर्वात कमी तरतूद केल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला आहे. त्याविरोधात ‘जीविधा’ संस्थेने पंतप्रधानांना निषेध पत्र पाठविण्याबरोबरच पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीला १ रूपया पाठविला जाणार आहे. नरेंद्र मोदी सरकारने पर्यावरणीय मंजुऱ्या धाब्यावर बसवून विनाशकारी २४० उद्योग प्रकल्पांना मान्यता दिल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय अर्थसंकल्पात पर्यावरणासाठीच्या तरतूदीमध्ये कपातच होत असल्याचे आढळून आले आहे. एकूण अंदाजपत्रकीय रकमेच्या ०़०१ टक्क्यांहूनही कमी निधीची तरतूद पर्यावरणासाठी करण्यात येत आहे. भारताच्या ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या केवळ ०़०१२ टक्के इतकाच त्याचा हिस्सा आहे. वन्यजीवन, जलस्त्रोत, वने यांच्या संवर्धन आणि रक्षणासाठी निधी उपलब्ध न करता, चुकीच्या आणि दिखाऊ गोष्टींना अंदाजपत्रकात अग्रक्रम देण्यात आला आहे. त्यातच केंद्र सरकारने भारताचे पाच अत्यंत मुलभूत पर्यावरणरक्षक कायदे बदलून घेण्यासाठी सुब्रमण्यम समिती नेमून तिच्या विघातक शिफारशी स्वीकारण्यात आल्या आहेत. त्याविरुद्धचा आवाज पंतप्रधानांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे सकारात्मक निषेध आंदोलन सुरू केल्याची माहिती ‘जीविधा’चे संस्थापक अध्यक्ष राजीव पंडित यांनी दिली.ते म्हणाले, पी. चिदम्बरम यांनी २०१३-१४ च्या अंदाजपत्रकात निसर्ग-पर्यावरणासाठी २,४३० कोटींची तरतूद केली होती. त्यात अरुण जेटली यांनी २०१४-१५च्या अंतरिम लेखानुदानातील तरतुदीमध्ये अधिकच कपात करत ती १,७८१़६० कोटी इतकी केली. यंदाच्या अर्थसंकल्पात ती १,६८१़६० कोटीपर्यंत आणली. गतवर्षीपेक्षा त्यात १५ टक्के कपात झाल्याचे माहिती अधिकारातून पुढे आल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरणाच्या मोहिमेत नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले. (प्रतिनिधी)