शहरं
Join us  
Trending Stories
1
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
2
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
3
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
4
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
5
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
6
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
7
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
8
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
9
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
10
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला
11
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट
12
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
13
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
14
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
15
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
16
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
17
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
18
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
19
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
20
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं

एका महिन्याचे वीज बिल ४६ हजार

By admin | Updated: April 5, 2017 03:31 IST

डहाणू तालुक्यातील रायतळी येथील आदिवासी शेतकऱ्याला एका महिन्याचे घरगुती वीजवापराचे बील ४६,८६९ रुपये आले आहे

कासा : डहाणू तालुक्यातील रायतळी येथील आदिवासी शेतकऱ्याला एका महिन्याचे घरगुती वीजवापराचे बील ४६,८६९ रुपये आले आहे. आलेले आव्वाच्या सव्वा बील भरण्यास गरीब शेतकरी असमर्थ ठरल्याने त्याचे मीटर काढण्यात आले आहे. दरम्यान, त्याने महावितरणला दिलेली कैफियत वजा गाऱ्हाणे न एकताच आधी बील भरा मग काय ते बघू अशी भूमिका कंपनीने घेतली आहे.ककडया जिव्या दांडेकर या शेतीवर उपजिवीका करणाऱ्या आदिवासी शेतकऱ्याकडून साधारण दोनशे ते अडिचशे रुपये आकारणी होते. २९ ते ३० युनिट एवढा त्याचा दरमहा वापर आहे. असा रेकॉड महावितरण दफ्तरी नोंद आहे. मात्र, आॅक्टोबर महिन्यात त्यास अचानक ४६ हजार ८६९ रुपये येवढ्या वीज देयकाची आकारणी करण्यात आली. असल्याने तो विवंचनेत पडला आहे. एवढी मोठी रक्कम उभ्या आयुष्यात एकत्र न पाहिलेल्या या शेतकऱ्याने हे बील कसे फेडावे असा प्रश्न उभा आहे.बऱ्याचदा महावितरणचे कर्मचारी कार्यालयत बसूनच रिडिंग नोंदणी करुन बील पाठवत असतात. अशी प्रकरणे अनेक वेळा उघड झाली असल्याचे वीज ग्राहकांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. मात्र, असा निश्काळजी व कामचुकारपणा उघड करुनही त्या बाबत तक्रार केल्यावर कायद्यावर बोट ठेऊन आधी वीज देयकाची पुर्तता करा. मग बघू अशी भाषा असते. हा प्रश्न खरं तर ग्राहक न्यायालयात मांडला गेल्यास न्याय मिळेल असा विचार पिडित शेतकरी करीत असल्याचे वृत्त आहे. महावितरणचा कारभार यामुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तालुक्यात ग्राहकांमधुन संताप व्यक्त होतो आहे. (वार्ताहर)>शाळेलगत असलेला ट्रान्सफॉर्मर कोसळण्याच्या स्थितीत बोईसर : येथील दीजय नगर मधील सी. बी. संखे इंग्लिश मीडियम शाळेलगत असलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या स्ट्रक्चरचे सर्व खांब गंजून जीर्ण झाल्याने ट्रान्सफॉर्मर स्ट्रक्चरसह कोसळण्याच्या स्थितीत असल्याने मोठी दुर्घटणा होण्याची शक्यता आहे. ट्रान्सफॉर्मर कोसळल्यास दिजय नगर अंधारात बुडणार आहे. या संदर्भात स्थानिकांनी दिलेल्या पत्राला महावितरणने केराची टोपली दाखिवली आहेदीजय नगर या माठ्या रहिवासी संकुलाला २०० केव्हीए क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मर मधून विजचा पुरवठा होत असून त्या ट्रान्सफॉर्मरचे स्ट्रक्चर आणि त्या लगत असलेले चॅनलचे लोखंडी खांब पूर्णपणे गंजल्याने त्या खंबांची चाळण झाली आहे. ट्रांन्सफार्मरलगतच शाळा असल्याने विद्यार्थ्यांबरोबरच नागरिकांना त्यापासून धोका आहे. या संदर्भात ८ ते १० महिन्या पूर्वी येथील रहिवाशांनी महावितरणला पत्राद्वारे निवेदन दिले आहे.