शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
3
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
4
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
5
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
6
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
7
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
8
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
9
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
10
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
11
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
12
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
13
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
14
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
15
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
16
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
17
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
18
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
19
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
20
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष

एका महिन्याचे वीज बिल ४६ हजार

By admin | Updated: April 5, 2017 03:31 IST

डहाणू तालुक्यातील रायतळी येथील आदिवासी शेतकऱ्याला एका महिन्याचे घरगुती वीजवापराचे बील ४६,८६९ रुपये आले आहे

कासा : डहाणू तालुक्यातील रायतळी येथील आदिवासी शेतकऱ्याला एका महिन्याचे घरगुती वीजवापराचे बील ४६,८६९ रुपये आले आहे. आलेले आव्वाच्या सव्वा बील भरण्यास गरीब शेतकरी असमर्थ ठरल्याने त्याचे मीटर काढण्यात आले आहे. दरम्यान, त्याने महावितरणला दिलेली कैफियत वजा गाऱ्हाणे न एकताच आधी बील भरा मग काय ते बघू अशी भूमिका कंपनीने घेतली आहे.ककडया जिव्या दांडेकर या शेतीवर उपजिवीका करणाऱ्या आदिवासी शेतकऱ्याकडून साधारण दोनशे ते अडिचशे रुपये आकारणी होते. २९ ते ३० युनिट एवढा त्याचा दरमहा वापर आहे. असा रेकॉड महावितरण दफ्तरी नोंद आहे. मात्र, आॅक्टोबर महिन्यात त्यास अचानक ४६ हजार ८६९ रुपये येवढ्या वीज देयकाची आकारणी करण्यात आली. असल्याने तो विवंचनेत पडला आहे. एवढी मोठी रक्कम उभ्या आयुष्यात एकत्र न पाहिलेल्या या शेतकऱ्याने हे बील कसे फेडावे असा प्रश्न उभा आहे.बऱ्याचदा महावितरणचे कर्मचारी कार्यालयत बसूनच रिडिंग नोंदणी करुन बील पाठवत असतात. अशी प्रकरणे अनेक वेळा उघड झाली असल्याचे वीज ग्राहकांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. मात्र, असा निश्काळजी व कामचुकारपणा उघड करुनही त्या बाबत तक्रार केल्यावर कायद्यावर बोट ठेऊन आधी वीज देयकाची पुर्तता करा. मग बघू अशी भाषा असते. हा प्रश्न खरं तर ग्राहक न्यायालयात मांडला गेल्यास न्याय मिळेल असा विचार पिडित शेतकरी करीत असल्याचे वृत्त आहे. महावितरणचा कारभार यामुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तालुक्यात ग्राहकांमधुन संताप व्यक्त होतो आहे. (वार्ताहर)>शाळेलगत असलेला ट्रान्सफॉर्मर कोसळण्याच्या स्थितीत बोईसर : येथील दीजय नगर मधील सी. बी. संखे इंग्लिश मीडियम शाळेलगत असलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या स्ट्रक्चरचे सर्व खांब गंजून जीर्ण झाल्याने ट्रान्सफॉर्मर स्ट्रक्चरसह कोसळण्याच्या स्थितीत असल्याने मोठी दुर्घटणा होण्याची शक्यता आहे. ट्रान्सफॉर्मर कोसळल्यास दिजय नगर अंधारात बुडणार आहे. या संदर्भात स्थानिकांनी दिलेल्या पत्राला महावितरणने केराची टोपली दाखिवली आहेदीजय नगर या माठ्या रहिवासी संकुलाला २०० केव्हीए क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मर मधून विजचा पुरवठा होत असून त्या ट्रान्सफॉर्मरचे स्ट्रक्चर आणि त्या लगत असलेले चॅनलचे लोखंडी खांब पूर्णपणे गंजल्याने त्या खंबांची चाळण झाली आहे. ट्रांन्सफार्मरलगतच शाळा असल्याने विद्यार्थ्यांबरोबरच नागरिकांना त्यापासून धोका आहे. या संदर्भात ८ ते १० महिन्या पूर्वी येथील रहिवाशांनी महावितरणला पत्राद्वारे निवेदन दिले आहे.