शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील दीड लाख लोकांचे जगणे झाले 'जीवनदायी'

By admin | Updated: November 19, 2014 23:14 IST

राजीव गांधी आरोग्य योजना : कोल्हापूर चौथ्या क्रमांकावर, वर्षभरात १२ हजार १३८ रुग्णांची सेवा

गणेश शिंदे - कोल्हापूर --राजीव गांधी आरोग्य योजना : कोल्हापूर चौथ्या क्रमांकावर, वर्षभरात १२ हजार १३८ रुग्णांची सेवाउपचारासाठी पैसे नाहीत म्हणून एखाद्यावर मृत्यूला जवळ करण्याची वेळ येऊ नये म्हणून काँग्रेस आघाडी सरकारने सुरू केलेल्या ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने’मुळे राज्यातील तब्बल दीड लाख रुग्णांचे प्राण वाचले आहेत. शासनाने त्यांच्यावर सुमारे चारशे कोटी रुपये खर्च केले आहेत. योजनेबाबत काही त्रुटी जरुर असल्या तरी त्याचा फायदा गोरगरिबांना होत आहे. या योजनेला गुरुवारी (दि. २० नोव्हेंबर) एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या योजनेचा लेखाजोखा ‘लोकमत’ने तपासला.या योजनेत कोल्हापूर जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. वर्षात राज्यात १२ हजार १३८ रुग्णांवर तब्बल ३४ कोटी ७० लाख ३४ हजार रुपये खर्च झाले. सर्वाधिक मुंबईमध्ये १९ हजार ५१६ रुग्णांवर ६४ कोटी ६३ लाख ९५ हजार; तर कमीमध्ये नंदूरबार जिल्ह्याचा नंबर लागतो. नंदूरबारमध्ये वर्षभरात केवळ ६५ रुग्णांवर सात लाख ९५४ रुपये खर्च झाले आहेत. अडीच वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारने राज्यात सर्वप्रथम रायगड, सोलापूर, नांदेड, गडचिरोली, मुंबई, मुंबई उपनगर या जिल्ह्यात ही योजना सुरू केली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित २७ जिल्ह्यांत २० नोव्हेंबर २०१३ पासून ती सुरू झाली. राज्यात वर्षभरात एकूण एक लाख ५२ हजार २५५ रुग्णांवरील उपचारांसाठी ३९७ कोटी ९७ लाख रुपये खर्च झाले. ही सेवा देणाऱ्या रुग्णालयांना एक लाख ५९ रुग्णांचा परतावा म्हणून नॅशनल इन्श्युरन्स कंपनीकडून २४७ कोटी २७ लाख रुपये मिळाले. या योजनेमधून कुटुंबातील एकाला दीड लाख रुपये खर्च मिळतो. किडनी प्रत्यारोपणासाठी अडीच लाखांची तरतूद राज्य शासनाने केली आहे. कोल्हापूर शहरातील २३ रुग्णालये, गडहिंग्लज, महागाव, जयसिंगपूर, इचलकरंजी व वडगाव प्रत्येकी एक अशा २८ रुग्णालयांत ही सेवा सुरू झाली. करवीर आघाडीवर, तर गगनबावडा पिछाडीवर...करवीर तालुका विधानसभा निवडणुकीच्या मतदानाबरोबर या योजनेमध्ये करवीर तालुका आघाडीवर असल्याचे खर्चाच्या आकडेवारीवरून दिसून येते. करवीरमध्ये ३८५१ रुग्णांवर दहा कोटी ३७ लाख २९ हजार ६७५ रुपये, तर गगनबावडा तालुक्यात सर्र्वाधिक कमी म्हणजे केवळ ३४ लाख २५ हजार ८०० रुपये ९३ रुग्णांवरील उपचारांसाठी खर्च झाले आहेत. दरम्यान, ग्रामीण भागात याचा फायदा होत असल्याने रुग्णालयांची संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.कॅन्सर, डायलेसिस रुग्णांवर सर्वाधिक उपचारया योजनेत ९७१ विविध आजारांवर उपचार करता येतात. कार्डियाक (हृदयरोग, हृदयविकार) ,किडनी (मूत्रपिंड), स्त्रियांचे आजार, फुप्फुस, आदी आजारांचा यांत समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कॅन्सर (कर्करोग) व डायलेसिसचे सुमारे १२००, तर जननमूत्र (किडनी स्टोन) ८००, कार्डियाक ७०० अशा रुग्णांनी उपचार घेतले आहेत. त्याचबरोबर बर्न (भाजून जखमी) सुमारे २५ , मेंदू / हाडाचे विकार ६०, डोळ्यांच्या विकारांचे शंभर, तर लहान मुलांच्या शस्त्रक्रियेवरील उपचार दीडशेजणांनी घेतले आहेत.राज्यात पहिल्या पाचमध्ये जिल्ह्याचा क्रमांक आला, ही बाब गौरवास्पद आहे. याचे कारण म्हणजे, या योजनेबाबत झालेली जनजागृती होय.- डॉ. अशोक देठे, जिल्हा समन्वयक, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, कोल्हापूर.