शहरं
Join us  
Trending Stories
1
Corona Virus : धोक्याची घंटा! कोरोना थैमान घालणार?, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
2
CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनचा नवी खेळी
3
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
4
“शिष्टमंडळ पाठवून काही फायदा नाही, चीन, श्रीलंका, तुर्कस्थानात कुणाला पाठवले का?”: संजय राऊत
5
चेक बाउन्स झाला तर आता काही खरं नाही! सरकारचे नवे नियम, दुप्पट दंड ते तुरुंगापर्यंतची शिक्षा!
6
कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती
7
IPL 2025: सीएसकेच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू संजय बांगर धोनीवर भडकले, म्हणाले...
8
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
9
“मुंबईकर उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवतील, मविआच्या ५० जागाही येणार नाही”; भाजपाचा दावा
10
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
11
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
12
मल्टीबॅगर शेअर, 75 देशांमध्ये Tejas चा व्यवसाय; आता मिळाली ₹1526 कोटींची ऑर्डर
13
अबुझमाडमध्ये २७ नक्षल्यांना कंठस्नान; पाेलीस शहीद, १ काेटी बक्षीस असलेल्या बसवा राजूचा खात्मा
14
तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार
15
इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...
16
पूजा खेडकर हिला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
17
Jyoti Malhotra : "पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
18
सोनिया आणि राहुल गांधी यांना झाला १४२ कोटींचा फायदा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचा कोर्टात आरोप   
19
मुलांचं लग्न जमवताना एकमेकांच्या प्रेमात पडले व्याही आणि विहीण! लग्नासाठी कोर्टात पोहोचले पण... 
20
डॉक्टर की कसाई...! ५० जणांच्या हत्येनंतरही हात थरथरले नाहीत; अंगावर काटा आणणारी थरारक घटना

एक लाख कोटीच्या घोटाळ्याची अफवा

By admin | Updated: October 24, 2016 03:08 IST

पालिकेमधील १ लाख कोटी रूपयांचा घोटाळा लपविण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा डाव असे संदेश सोशल मीडियामधून पसरविले जात आहेत

नामदेव मोरे, नवी मुंबईपालिकेमधील १ लाख कोटी रूपयांचा घोटाळा लपविण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा डाव असे संदेश सोशल मीडियामधून पसरविले जात आहेत. वास्तविक यात तथ्य नसून नवी मुंबईची बदनामी करण्याचा डाव आहे. पालिकेच्या स्थापनेपासून १२ हजार २२७ कोटी रूपये उत्पन्न मिळविले आहे. या उत्पन्नामधून मोरबे धरण विकत घेण्यापासून ते शाळा, रस्ते बांधण्यापर्यंत अनेक विकासकामे केली असून १,५६५ मालमत्ता पालिकेच्या मालकीच्या झाल्या असून त्यांची किंमत २५ हजार कोटीपेक्षा जास्त आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठराव दाखल करण्याचे निश्चित झाल्यापासून महापालिकेची मोठ्याप्रमाणात बदनामी सुरू झाली आहे. मुंढे हे प्रामाणिक अधिकारी आहेत यामध्ये कोणालाच शंका नाही पण त्यांचा प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी महापालिका कशी भ्रष्टाचारी आहे, हे बिंबवण्यासाठी त्यांचे समर्थक धडपडत आहेत. सोशल मीडियामधून भ्रष्टाचाराचे खोटे मेसेज पसरविले जात आहेत. यामध्ये सर्वात हास्यास्पद मेसेज १ लाख कोटी रूपये भ्रष्टाचाराचा आहे. स्थापनेपासून पालिकेच्या गंगाजळीमध्ये फक्त १२२२७ कोटी रूपये जमा झाले असताना १ लाख कोटी रूपयांचा घोटाळा कसा होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. घोटाळे दाखविण्याच्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत केलेल्या चांगल्या कामांकडे दुर्लक्ष होत आहे. राज्यातील प्रत्येक शहरामध्ये गतवर्षी दुष्काळामुळे आठवड्यातून दोन ते तीन दिवस पाणी दिले जात असताना नवी मुंबईमध्ये मात्र रोज नियमित पाणीपुरवठा केला जात होता. मुंबई, ठाणे व कल्याणसारख्या शहरामध्ये कचरा टाकण्यासाठी डंपिंग ग्राऊंड नसताना नवी मुंबईमध्ये मात्र अत्याधुनिक पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. जिल्हा परिषदेच्या गळक्या शाळांच्या जागेवर भव्य इमारती उभ्या राहिल्या. प्रत्येक नोडमध्ये उद्याने निर्माण झाली. चांगले रस्ते, पाणीपुरवठ्याची सोय करण्यात आली असून या सर्व कामांकडे दुर्लक्ष होत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजावर भ्रष्टाचाराचे आरोप यापूर्वीही अनेक वेळा झाले आहेत. पण या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे अनेकवेळा उघडकीस आले आहे. आतापर्यंत झालेल्या कामकाजामध्ये चुकीचे झालेच नाही असा दक्ष नागरिकांचा दावा नाही. पण ज्या पद्धतीने काही दिवसांपासूून भ्रष्टाचाराविषयी बातम्या पेरल्या जात आहेत त्या शहराची बदनामी करणाऱ्या असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. कोणत्याही कामात गैरव्यवहार झाला असेल तर त्याविषयी कायदेशीरपणे चौकशी झाली पाहिजे. कामाचे लेखा परीक्षण झाले पाहिजे. लेखा परीक्षणामध्ये घोटाळा झाल्याचे निदर्शनास आल्यास रीतसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी. जे जबाबदार असतील त्या सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत पण सर्व पालिकाच भ्रष्टाचारी असल्याच्या अफवा पसरवून शहरवासीयांची बदनामी करणे थांबविण्याची मागणी केली जात आहे. २५ वर्षांमध्ये २५ हजार कोटीची मालमत्ता संकलित पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मोरबे धरण विकत घेतले. मोरबे धरण परिसरातील १५०० एकर जमिनीची मालकी १२ लाख ८३ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर १५६ उद्याने व ६७ मोकळ्या जागापालिकेच्या मालकीच्या १५६५ मालमत्ता शहरात शाळांसाठी ७० इमारतीरूग्णालय, नागरी आरोग्य केंद्र व समाज मंदिराच्या इमारतीचे बांधकामअत्याधुनिक मलनि:सारण केंद्रांची उभारणीडंपिंग ग्राऊंडसाठी ६५ एकर जमीन ताब्यात चांगली कामे दुर्लक्षित महापालिकेने आतापर्यंत केलेली चांगली कामे दुर्लक्षित केली जात आहे. २४ वर्षांमध्ये चांगले काहीच झाले नाही, फक्त घोटाळेच झाले असे वातावरण तयार होत असून ते शहराच्या हिताचे नसल्याचे मत नगरसेवकांनी व्यक्त केले आहे. आयुक्तांच्या विरोधात होणाऱ्या अविश्वास ठरावाच्या सभेमध्ये या सर्वांचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.