शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
2
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
3
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
4
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
5
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
6
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
7
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
8
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
9
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
10
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
11
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
12
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
13
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
14
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
15
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
16
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
17
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
18
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
19
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
20
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

निर्गुंतवणुकीतून सरकार उभारू शकते एक लाख कोटी रुपये

By admin | Updated: May 9, 2014 23:58 IST

अर्थसंकल्पीय महसुलाची चणचण भासत असल्यामुळे सार्वजनिक उद्योगांच्या निर्गुंतवणुकीचा मार्ग अवलंबावा लागण्याची शक्यता दिसत आहे.

नवी दिल्ली : नव्याने अधिकारारूढ होणार्‍या सरकारला आर्थिक मंदीमुळे तसेच अर्थसंकल्पीय महसुलाची चणचण भासत असल्यामुळे सार्वजनिक उद्योगांच्या निर्गुंतवणुकीचा मार्ग अवलंबावा लागण्याची शक्यता दिसत आहे.देशातील १० प्रमुख सार्वजनिक उद्योगांच्या १० टक्के समभागांची विक्री केली तरी सरकार एक लाख कोटी रुपये उभारू शकते असे स्पष्ट झाले आहे. असोसिएटेड चेंबर्स आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज आॅफ इंडिया (असोचेम)ने जाहीर केलेल्या एका अभ्यासात ही बाब उघड झाली आहे. देशातील शेअर बाजार हे परकीय वित्तसंस्थांकडून होत असलेली जोरदार खरेदी तसेच आगामी काळात स्थिर सरकार येण्याच्या अपेक्षेने वाढत आहेत. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील दहा प्रमुख कंपन्यांच्या भांडवलाचे बाजारमूल्य ११ लाख कोटी रुपयांहून अधिक होत आहे. निवडणुकीचे निकाल अपेक्षित लागल्यास यामध्ये आणखी १५ ते २० टक्कयांनी वाढ होण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. भांडवलाच्या बाजारमूल्याच्या प्रमाणात ओएनजीसी ही सार्वजनिक क्षेत्रातील अव्वल कंपनी ठरत आहे.या कंपनीचे बाजार भांडवलमूल्य २.८७ लाख कोटी रुपये आहे. त्यापाठोपाठ कोल इंडिया (१.८६ लाख कोटी) आणि भारतीय स्टेट बॅँक (१.५ लाख कोटी) यांचा क्रमांक लागत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. एनटीपीसी (९५ हजार कोटी) आणि इंडियन आॅईल कॉर्पाेरेशन (६६हजार ५०० कोटी) यांचा क्रमांक लागतो. भारतीय अर्थव्यवस्था मंदीचा मुकाबला करीत असल्यामुळे करांच्या महसुलामध्ये घट होत आहे. त्यामुळे सरकारला महसूल वाढीसाठी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा लागेल, असे मत असोचेमचे अध्यक्ष राणा कपूर यांनी व्यक्त केले.सध्या शेअर बाजारत तेजी असल्याने त्याचा लाभ घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. २०१३-१४ या आर्थिक वर्षात सरकारला निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून फारशी रक्कम उभारता आली नाही. मंदीची परिस्थिती हे त्यासाठीचे महत्वाचे कारण ठरले आहे.याचा परिणाम सरकारला आपल्या नियोजित खर्चामध्ये कपात करावी लागली. त्याचे नकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर पडले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)

देशाच्या एकूण देशांतर्गत उत्पादनापैकी सरकारी खर्च हा महत्त्वाचा असतो. ४शेअर बाजारामध्ये तेजी असल्याने अनेक सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांचे दरही तेजीत. 

पहिल्या दहा कंपन्यांपेक्षाही अनेक सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांच्या किमतीही वधारल्या आहेत.