शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात एक ठार

By admin | Updated: May 21, 2016 02:32 IST

पामबीच मार्गावर अपघातामध्ये पनवेलच्या बारमालकाच्या मृत्यूची घटना शुक्रवारी पहाटे घडली आहे.

नवी मुंबई : पामबीच मार्गावर अपघातामध्ये पनवेलच्या बारमालकाच्या मृत्यूची घटना शुक्रवारी पहाटे घडली आहे. कोपरखैरणेत राहणाऱ्या बारबालांना सोडण्यासाठी जात असताना हा अपघात घडला. यावेळी बारमालक व बारबाला तिघेही मद्यधुंद अवस्थेत होते.सुधीर शेट्टी (३५) असे मयत बारमालकाचे नाव आहे. पनवेलमधील सुकापूर परिसरातील एस.बी. नाईट बार ते चालवत होते, असे समजते. शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ते दोन बारबालांना घेवून कोपरखैरणेला जात होते. पिंकी दास व खातुना बी. अशी दोघींची नावे आहेत. त्या एस.बी. नाईट बारमधील कामगार असून कोपरखैरणेला राहणाऱ्या आहेत. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत त्या कामानिमित्त थांबल्यानंतर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास शेट्टी स्वत: त्यांना मोटारसायकलने घरी सोडण्यासाठी चालले होते. या दरम्यान त्यांची होंडा ग्लॅमर मोटारसायकल (एमएच ४३ एई १०७९) पामबीच मार्गावर नेरुळ पोलीस ठाणे हद्दीत आली असता अपघात झाला. अपघातावेळी शेट्टी स्वत: मोटारसायकल चालवत होते, तर दोन्ही बारबाला मागे बसलेल्या होत्या. शेट्टी यांनी मर्यादेपेक्षा जास्त वेगात दुचाकी चालवल्यामुळे त्यांचा ताबा सुटला. त्यामध्ये मोटारसायकल रस्त्याच्या दुभाजकाला आदळून तिघेही गंभीर जखमी झाले होते. सदर अपघाताची माहिती मिळताच नेरुळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना नेरुळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी शेट्टी यांना मृत घोषित केले, तर दोन्ही बारबालांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे वरिष्ठ निरीक्षक अधिकराव पोळ यांनी सांगितले. अपघातावेळी तिघेही मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे शेट्टी यांचा मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचेही पोळ यांनी सांगितले. त्यानुसार स्वत:च्या मृत्यूला जबाबदार व अपघाताला कारणीभूत ठरल्यामुळे मयत शेट्टी यांच्याविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच शेट्टी यांच्या निधनाबद्दल हळहळ बार मालकांकडून व्यक्त होत आहे.एस. बी. नाईट बारवर यापूर्वी आॅक्टोबर २०१५ मध्ये पोलिसांनी छापा टाकून कारवाई केलेली आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या बारमध्ये अल्पवयीन मुलींचा वापर होत असल्याची तक्रार त्यावेळी एका समाजसेवी संघटनेने केलेली. तर पनवेल परिसरातील चर्चेतल्या बारपैकी एस.बी. नाईट हा एक बार असून बारबालांना घरी सोडण्यासाठी शेट्टी स्वत: मोटारसायकलने का गेले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.