शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

द्रुतगती महामार्गावरील अपघातात एक ठार

By admin | Updated: June 13, 2016 04:49 IST

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातांचे सत्र अद्यापही सुरूच आहे.

खालापूर/ मोहोपाडा/ लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातांचे सत्र अद्यापही सुरूच आहे. रविवारी सायंकाळी महामार्गावरील रिस गावाच्या हद्दीत झालेल्या अपघातात एक जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले. तसेच खंडाळा एक्झिट येथे एक सिमेंटचा ट्रँकर उलटून महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.रिस गावाच्याजवळ पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या मारुती इको कारचा टायर फुटल्याने मागून येणाऱ्या स्विफ्ट व इंडिका कार इकोवर आदळून हा अपघात झाला. यात राजेश बागडे (३२) हे जागीच ठार झाले, तर हार्दिक निमले (२५), सरिता मोतीराम घस्ती (२७, रा. मीरा रोड), मोतीराम पुनाराम घस्ती (रा. मीरा रोड), शिरीन शेख (१५), रु बिना शेख (३५, रा. शिवाजीनगर) हे पाच जण गंभीर जखमी झाले. त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच हर्ष घस्ती (७, रा. मीरा रोड), ओम शिव (३५, वाहनचालक), मुंबईतील गोरेगाव येथे राहाणारे दिलीप पालगडकर (७२), सलोनी पालगडकर (१५), आर्यन पालगडकर (८), अमर पालगडकर (४२) हे किरकोळ जखमी झाले.रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा सिमेंटचा टँकर खंडाळा एक्झिट येथील वळण असलेल्या उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या मधोमध उलटला. त्यामुळे दुतर्फा सुमारे आठ ते दहा किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी सात वाजता टँकर दोन क्रेनच्या साहाय्याने बाजूला ओढत आधी मुंबईकडे जाणारी तर साडेसात वाजता पुण्याकडे जाणारी लेन सुरू करण्यात आली. (लोकमत न्यूज नेटवर्क)>४ दिवसांत ९६७ वाहनांवर कारवाईपुणे : द्रुतगती महामार्गावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ९६७ वाहनांवर प्रादेशिक परिवहन आणि महामार्ग पोलिसांनी कारवाई करून चार दिवसांत ६ लाख ९९ हजार ३७० रुपयांचा दंड वसूल केला आहे. या महामार्गावर नुकतेच पनवेलजवळ झालेल्या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला होता़ त्याअगोदर उद्योगपती डी़ एस़ कुलकर्णी यांच्या मोटारीलाही अपघात झाला होता. त्यामुळे या महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून परिवहन मंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारीच या मार्गाची पाहणी केली. तसेच तपासणी पथकांनाही कडक कारवाईचे आदेश दिले होते.>वऱ्हाडी टेम्पोला उलटून २४ जखमीजाफराबाद (जि. जालना) : तालुक्यातील काळेगाव येथील लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अपघात होऊन २४ जण जखमी झाले. ही घटना पिंपळखुटा गावाजवळ रविवारी दुपारी घडली. पाच जणांची प्रकृती गंभीर असून, त्यात लहान मुलांची संख्या अधिक आहे. काळेगाव येथील साहेबराव लक्ष्मण जाधव यांच्या मुलीच्या विवाहासाठी वऱ्हाडी घेऊन हा टेम्पो शेलगाव अटोळ (ता.चिखली जि.बुलढाणा) येथे निघाला होता. वाळूच्या डंपरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात टेम्पो उलटला. जखमींना जालना येथील सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी पाच गंभीर जखमी झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल चव्हाण, डॉ. पांडुरंग टेकाळे यांनी सांगितले. (वार्ताहर)