शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

द्रुतगती महामार्गावरील अपघातात एक ठार

By admin | Updated: June 13, 2016 04:49 IST

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातांचे सत्र अद्यापही सुरूच आहे.

खालापूर/ मोहोपाडा/ लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातांचे सत्र अद्यापही सुरूच आहे. रविवारी सायंकाळी महामार्गावरील रिस गावाच्या हद्दीत झालेल्या अपघातात एक जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले. तसेच खंडाळा एक्झिट येथे एक सिमेंटचा ट्रँकर उलटून महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.रिस गावाच्याजवळ पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या मारुती इको कारचा टायर फुटल्याने मागून येणाऱ्या स्विफ्ट व इंडिका कार इकोवर आदळून हा अपघात झाला. यात राजेश बागडे (३२) हे जागीच ठार झाले, तर हार्दिक निमले (२५), सरिता मोतीराम घस्ती (२७, रा. मीरा रोड), मोतीराम पुनाराम घस्ती (रा. मीरा रोड), शिरीन शेख (१५), रु बिना शेख (३५, रा. शिवाजीनगर) हे पाच जण गंभीर जखमी झाले. त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच हर्ष घस्ती (७, रा. मीरा रोड), ओम शिव (३५, वाहनचालक), मुंबईतील गोरेगाव येथे राहाणारे दिलीप पालगडकर (७२), सलोनी पालगडकर (१५), आर्यन पालगडकर (८), अमर पालगडकर (४२) हे किरकोळ जखमी झाले.रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा सिमेंटचा टँकर खंडाळा एक्झिट येथील वळण असलेल्या उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या मधोमध उलटला. त्यामुळे दुतर्फा सुमारे आठ ते दहा किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी सात वाजता टँकर दोन क्रेनच्या साहाय्याने बाजूला ओढत आधी मुंबईकडे जाणारी तर साडेसात वाजता पुण्याकडे जाणारी लेन सुरू करण्यात आली. (लोकमत न्यूज नेटवर्क)>४ दिवसांत ९६७ वाहनांवर कारवाईपुणे : द्रुतगती महामार्गावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ९६७ वाहनांवर प्रादेशिक परिवहन आणि महामार्ग पोलिसांनी कारवाई करून चार दिवसांत ६ लाख ९९ हजार ३७० रुपयांचा दंड वसूल केला आहे. या महामार्गावर नुकतेच पनवेलजवळ झालेल्या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला होता़ त्याअगोदर उद्योगपती डी़ एस़ कुलकर्णी यांच्या मोटारीलाही अपघात झाला होता. त्यामुळे या महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून परिवहन मंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारीच या मार्गाची पाहणी केली. तसेच तपासणी पथकांनाही कडक कारवाईचे आदेश दिले होते.>वऱ्हाडी टेम्पोला उलटून २४ जखमीजाफराबाद (जि. जालना) : तालुक्यातील काळेगाव येथील लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अपघात होऊन २४ जण जखमी झाले. ही घटना पिंपळखुटा गावाजवळ रविवारी दुपारी घडली. पाच जणांची प्रकृती गंभीर असून, त्यात लहान मुलांची संख्या अधिक आहे. काळेगाव येथील साहेबराव लक्ष्मण जाधव यांच्या मुलीच्या विवाहासाठी वऱ्हाडी घेऊन हा टेम्पो शेलगाव अटोळ (ता.चिखली जि.बुलढाणा) येथे निघाला होता. वाळूच्या डंपरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात टेम्पो उलटला. जखमींना जालना येथील सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी पाच गंभीर जखमी झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल चव्हाण, डॉ. पांडुरंग टेकाळे यांनी सांगितले. (वार्ताहर)