शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
3
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
4
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
5
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
6
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
7
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
8
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
9
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
10
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
11
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
12
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
13
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
14
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
15
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
16
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
17
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
18
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
19
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
20
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर

साहित्य संमेलनासाठी एक कोटींचा निधी अशक्यच

By admin | Updated: January 16, 2017 03:18 IST

साहित्य संमेलनाला सध्या मिळणारा २५ लाखांचा सरकारी निधी वाढवून एक कोटी रुपये करण्याच्या मागणीबाबत सरकार सकारात्मक आहे.

जान्हवी मोर्ये,

डोंबिवली- साहित्य संमेलनाला सध्या मिळणारा २५ लाखांचा सरकारी निधी वाढवून एक कोटी रुपये करण्याच्या मागणीबाबत सरकारकडून सकारात्मक विचार सुरू असल्याची ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ‘लोकमत’कडे दिली. मात्र, नोटाबंदी व निवडणूक आचारसंहितेमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या डोंबिवलीमधील साहित्य संमेलनास तावडे यांच्या घोषणेचा लागलीच लाभ होण्याची शक्यता दिसत नाही. अर्थात, संमेलनासाठी निधी कमी पडू देणार नाही, या तावडे यांच्या हमीवर आयोजकांची भिस्त राहणार आहे. ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी राज्य सरकारकडून मिळणारा २५ लाखांचा निधी अपुरा असून तो वाढवून एक कोटी रुपये करण्याची मागणी आयोजक आगरी युथ फोरमने केली आहे. याबाबत, तावडे यांना विचारले असता निधी वाढवून एक कोटी रुपये करण्याच्या मागणीचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. मात्र, वाढीव निधी सरकारने दिला, तरी तो डोंबिवलीतील साहित्य संमेलनास नव्हे तर पुढील साहित्य संमेलनास मिळण्याची शक्यता आहे. संमेलनास गेल्या २० वर्षांपासून २५ लाखांचा निधी राज्य सरकारकडून दिला जात आहे. महागाई वाढल्याने निधी कमी पडत आहे. राज्याचा अर्थसंकल्प हजारो कोटी रुपयांचा आहे. ठाण्यात फेब्रुवारी २०१६ मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पार पडले. या संमेलनासही राज्य सरकारकडून २५ लाख रुपयांचाच निधी मिळाला. नाट्य संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी हा निधी दुप्पट करून ५० लाख रुपये करण्याची मागणी केली होती. त्यामुळे साहित्य संमेलनास मिळणारा निधी १ कोटी रुपये करण्याची मागणी आहे. तावडे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड येथील संमेलनाच्या आयोजनात डी.वाय. पाटील यांचा पुढाकार होता. त्यांनी राज्य सरकारकडून मिळणारा निधी सरकारला देणगी स्वरूपात परत केला. ही चांगली बाब असली तरी निधीची रक्कम वाढवण्यासंदर्भात सकारात्मक विचार केला जाईल. राज्य सरकारकडून संमेलनास काही कमी पडू दिले जाणार नाही. मात्र, अ.भा. मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकारी उज्ज्वला मेहंदळे यांनी सांगितले की, सरकारने निधी वाढवून देण्याचा निर्णय घेतला तरी त्याची अंमलबजावणी डोंबिवलीतील संमेलनापासून होणार नाही. वाढीव निधी पुढील संमेलनाला मिळेल. >‘संमेलनात सहभागी शिक्षकांना भरपगारी रजा’संमेलनात मराठी भाषा शिकवणारे शिक्षक सहभागी होणार असल्याने राज्यातील मराठी शाळांना संमेलनाच्या तीन दिवसांच्या कालावधीत सुटी देण्याची मागणी स्वागताध्यक्ष वझे यांनी केली असल्याकडे मंत्री तावडे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, संमेलनात सहभागी होणाऱ्या शिक्षकांची सुटी ही भरपगारी असेल. राज्यभरातील जवळपास ५०० शिक्षक साहित्य संमेलनात सहभागी होणे अपेक्षित आहे.